शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर चांगल्या दर्जाचा रस्ता झाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 10:16 IST

गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असून, निधी मिळताच चांगल्या दर्जाचा रस्ता केला जाईल. दरम्यान, तात्पुरता पर्याय म्हणून येथे पॅचवर्क करू, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्देगंगावेश ते शिवाजी पूल मार्गावर चांगल्या दर्जाचा रस्ता झाला पाहिजे‘आखरी रास्ता कृती समिती’ आक्रमक

कोल्हापूर : गंगावेश ते शिवाजी पूल या मार्गावर पॅचवर्क नको तर तातडीने चांगल्या दर्जाचा रस्ता करा, अशी मागणी ‘आखरी रास्ता कृती समिती’च्या वतीने मंगळवारी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्याकडे केली. यावेळी महापौर लाटकर यांनी रस्त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली असून, निधी मिळताच चांगल्या दर्जाचा रस्ता केला जाईल. दरम्यान, तात्पुरता पर्याय म्हणून येथे पॅचवर्क करू, अशी ग्वाही दिली.कृती समितीचे किशोर घाटगे म्हणाले, शिवाजी पूल ते गंगावेश हा मार्ग शहरातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. येथे नेहमी पुराचे पाणी येत असल्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य बनलेले आहे. सध्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या रस्त्याची डागडुजी न करता तो नव्याने करावा. यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, माजी नगरसेवक राजू लाटकर उपस्थित होते. तर कृती समितीचे राकेश पाटील, किशोर घाटगे, अरविंद ओतारी, डॉ. झुंझारराव पाटील, महेश कामत, सनी अतिग्रे, सुनील पाटील, मंदार जाधव, मोहसिन मणेर, सुरेश कदम, रियाज बागवान, दिग्विजय काटकर उपस्थित होते.सिमेंटचा रस्ता करणार : महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकरराज्य शासनाकडे महापुरामुळे खराब झालेले रस्ते करण्यासाठी १८0 कोटींचा निधी मिळावा, असा प्रस्ताव पाठविला आहे. यामध्ये शिवाजी पूल ते गंगावेश या रस्त्याचाही समावेश आहे. निधी मिळताच येथील रस्ते करण्यात येणार आहेत. यामध्ये सतत पुराचे पाणी असणाऱ्या पंचगंगा नदी ते पंचगंगा हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता सिमेंटचा होणार आहे. उर्वरित डांबरी रस्ता करण्यात येणार आहे.आता पुन्हा येणार नाही, थेट आंदोलनखराब रस्त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. रस्ता करण्यासाठी निवेदन, रास्ता रोको आंदोलन केले; मात्र काम सुरू झालेले नाही; त्यामुळे आता पुन्हा महापालिकेत रस्त्यासाठी येणार नाही, तर थेट आंदोलनच केले जाईल. महापालिकेला घेराओच घालू, असा इशारा किशोर घाटगे यांनी दिला. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अशोक जाधव यांनी महापौरांच्या केबिनमध्ये येऊन आंदोलकांची समजूत काढली.

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर