शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गरजेचे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवईंचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 19:27 IST

कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

कोल्हापूर-ओरोस : ज्या प्रमाणे जिल्हा न्यायालयांची निर्मिती झाली त्या प्रमाणात खंडपीठाची स्थापना होणे आवश्यक आहे. कोल्हापूर येथे सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ स्थापन होणे आवश्यक आहे, ही मागणी योग्य असून त्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे अशी निसंदिग्ध ग्वाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश भूषण गवई यांनी आज, शनिवारी दिली.खंडपीठ कृती समितीतर्फे त्यांना कोल्हापूर येथे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या सहा जिल्ह्याकरीता खंडपीठ व्हावे याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते.बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, तसेच सिंधुदुर्गनगरी ओरस (जि.सिंधुदूर्ग) येथे शनिवारी वकिलांची एक दिवसीय कार्यशाळा झाली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना गवई यांनी कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीचे स्वत:हून जोरदार समर्थन केले. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश सुरेंद्र तावडे, न्यायाधिश प्रकाश नाईक हे देखील उपस्थित होते.कृती समितीतर्फे अध्यक्ष ॲड.गिरीश खडके यांच्या हस्ते न्यायाधीश गवई यांचा करवीर निवासिनी महालक्ष्मीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील पदाधिकारी उपस्थित होते.शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड विवेक घाटगे, उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, कृती समितीचे उपाध्यक्ष ॲड सुधीर चव्हाण, सचिव अॅड विजयकुमार ताटे, सहसचिव ॲड संदीप चौगले, ॲड रविंद्र जानकर तसेच वकीलवर्ग उपस्थित होते

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय