शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जमिनी घेतल्या पण पाण्याचा थेंबही नाही

By admin | Updated: December 15, 2015 23:39 IST

उपसाबंदीने स्थिती : चित्री प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा

आजरा : चित्री प्रकल्पाने बाधीत शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु उपसाबंदी व खंडित केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे चित्रीतील पाणी केवळ पहात बसण्याची वेळ चित्री लाभक्षेत्रातील आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. गडहिंग्लजऐवजी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘चित्री’चे पाणी सोडताना विचार केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मान्यता असताना परोली येथे एकच बंधारा बांधण्यात आला आहे. परोली बंधारा ते चांदेवाडी बंधारा यामध्ये कमीत कमी ५ कि. मी. अंतर असून येथे कोठे डोह अथवा बंधारा नाही. त्यामुळे चित्री धरणातून पाण्याचा प्रवाह अखंड असेल तरच शेतकरी पिकांना पाणी देऊ शकतो. पाटबंधारे खात्याने चांदेवाडीपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्राचा विचार करून लागणारे पाणी प्रवाही ठेवले, तरच शेतकरी पिके घेऊ शकणार आहेत. प्रकल्पात जमिनी गेल्या पण प्रकल्पाचा पाणीसाठा शिल्लक जमिनीला पाणी देऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने चांदेवाडी बंधाऱ्याच्या बॅक वॉटरपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चित्री प्रकल्पाने बुडीत क्षेत्रासाठी पुनर्वसनासाठी आजरा तालुक्यातील जमिनी गेल्या असून, आजरा तालुक्यातील शेतकरी, भूमीहिन, अल्पभूधारक झाले आहेत. तेव्हा आजरा तालुक्यातील लागणाऱ्या पाण्याचा प्रथम विचार करावा. गडहिंग्लज तालुक्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार करून पाटबंधारे विभाग नियोजन करत असेल व यामुळे शेतकऱ्यांकडून काही वाईट गोष्टी घडल्यास त्याला संपूर्णपणे पाटबंधारे विभाग जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. सचिन इंजल, विजय सरनोबत, अनंत मायदेव, परेश पोतदार, केरबा पारपोलकर, विष्णू मांजरेकर, सखाराम सावंत, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)लाईट नाही.. पाणी आहे..चित्रीमध्ये पाणी सोडण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंंिडत करण्याची वेळ एकच असल्याने चित्रीचे पाणी सोडले तरीही वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नसल्याने ‘पाटबंधारे’ने शेतकऱ्यांची थट्टा चालविल्याचा आरोप विनय सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.