शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जमिनी घेतल्या पण पाण्याचा थेंबही नाही

By admin | Updated: December 15, 2015 23:39 IST

उपसाबंदीने स्थिती : चित्री प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा

आजरा : चित्री प्रकल्पाने बाधीत शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या परंतु उपसाबंदी व खंडित केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे चित्रीतील पाणी केवळ पहात बसण्याची वेळ चित्री लाभक्षेत्रातील आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. गडहिंग्लजऐवजी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांना ‘चित्री’चे पाणी सोडताना विचार केला जावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.मान्यता असताना परोली येथे एकच बंधारा बांधण्यात आला आहे. परोली बंधारा ते चांदेवाडी बंधारा यामध्ये कमीत कमी ५ कि. मी. अंतर असून येथे कोठे डोह अथवा बंधारा नाही. त्यामुळे चित्री धरणातून पाण्याचा प्रवाह अखंड असेल तरच शेतकरी पिकांना पाणी देऊ शकतो. पाटबंधारे खात्याने चांदेवाडीपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्राचा विचार करून लागणारे पाणी प्रवाही ठेवले, तरच शेतकरी पिके घेऊ शकणार आहेत. प्रकल्पात जमिनी गेल्या पण प्रकल्पाचा पाणीसाठा शिल्लक जमिनीला पाणी देऊ शकत नाही, अशी अवस्था आहे. प्रशासनाने चांदेवाडी बंधाऱ्याच्या बॅक वॉटरपर्यंत पाणी परवाना दिलेल्या क्षेत्रापर्यंत पाण्याचा प्रवाह सतत चालू ठेवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.चित्री प्रकल्पाने बुडीत क्षेत्रासाठी पुनर्वसनासाठी आजरा तालुक्यातील जमिनी गेल्या असून, आजरा तालुक्यातील शेतकरी, भूमीहिन, अल्पभूधारक झाले आहेत. तेव्हा आजरा तालुक्यातील लागणाऱ्या पाण्याचा प्रथम विचार करावा. गडहिंग्लज तालुक्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा विचार करून पाटबंधारे विभाग नियोजन करत असेल व यामुळे शेतकऱ्यांकडून काही वाईट गोष्टी घडल्यास त्याला संपूर्णपणे पाटबंधारे विभाग जबाबदार राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत दिलेल्या निवेदनावर अ‍ॅड. सचिन इंजल, विजय सरनोबत, अनंत मायदेव, परेश पोतदार, केरबा पारपोलकर, विष्णू मांजरेकर, सखाराम सावंत, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)लाईट नाही.. पाणी आहे..चित्रीमध्ये पाणी सोडण्याची वेळ आणि वीजपुरवठा खंंिडत करण्याची वेळ एकच असल्याने चित्रीचे पाणी सोडले तरीही वीजपुरवठ्याअभावी शेतकऱ्यांना पाणी उचलता येत नसल्याने ‘पाटबंधारे’ने शेतकऱ्यांची थट्टा चालविल्याचा आरोप विनय सबनीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.