शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

सावळागोंधळ!, भटक्यांसाठी वसतिगृहातील साहित्याची निविदाही नाही

By संदीप आडनाईक | Updated: September 14, 2024 13:48 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यात भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे सुरू आहेत. ...

संदीप आडनाईककोल्हापूर : राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यात भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे सुरू आहेत. यासाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे; मात्र त्यांना कर्मचारी, आवश्यक साहित्याचा पुरवठा सरकारने केलेला नाही, साधी निविदाही प्रसिद्ध झालेली नाही. मुलींच्या वसतिगृहात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही, आहार कसा असावा हे निश्चित नाही तसेच यापूर्वी खासगी कंपनीकडून नेमलेल्या कर्मचाऱ्यांचेही वेतनही अद्याप अदा केलेले नाही. वसतिगृह प्रवेशाचा सावळागोंधळ सुरू आहे.या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे; परंतु अजूनही या जागा भरल्या जात नाहीत. वसतिगृहात जागा आहेत, याची इतर जिल्ह्यातील अनेक ओबीसी, भटके विमुक्त, एस.बी.सी. विद्यार्थी आणि पालकांना माहितीच होत नाही. यासाठी सर्वच जिल्ह्यांतील दैनिकातून प्रसिद्धी देणे आणि सामंजस्यासाठी स्थानिक ओबीसी संघटनांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या वसतिगृहांना लागणाऱ्या साहित्याचा म्हणजेच पलंग, गादी, उशी, ब्लॅकेट, फॅन आदी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सरकारने केलेला नाही, त्याची साधी निविदाही काढलेली नाही.मुलींच्या वसतिगृहासाठीचा आवश्यक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती अजूनही केलेली नाही. या विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा आणि कोणता असावा हेही शासनाने निश्चित केलेले नाही. वसतिगृहे हा संवेदनशील विषय असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी एस २ इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या खासगी कंपनीकडून दि. २४ एप्रिल २०२४ रोजी कर्मचारी नियुक्त केले आहेत, ते कर्मचारी रुजूही झाले. दि. २० जुलै २०२४ रोजी शासनासोबतचा या कंपनीचा करार संपला, तरीही दि.२१ जुलैनंतरही हे कर्मचारी आजअखेर कामावर आहेत. मे, जून आणि जुलै २०२० पासून केलेल्या कामाचे वेतनही त्यांना मिळालेले नाही. गेल्या ४५ दिवसांपासून ते मस्टर आणि सहीशिवाय काम करत आहेत, त्यांना नियमित न केल्यास त्यांच्या या काळातील वेतनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

मुलींच्या वसतिगृहासाठी अर्ज केला, पण अद्याप प्रत्यक्ष प्रवेश दिलेला नाही. दोन महिन्यापूर्वी अभ्यासक्रम सुरू झाला, पण मूळ गावाहून या जिल्ह्यात प्रवास करून यावे लागते. महाविद्यालयाला सोयीच्या ठिकाणची वसतिगृहे मुलींसाठी सुरक्षित राहतील. -तनुजा तानाजी परीट, सहसचिव, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीGovernmentसरकार