शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सावळागोंधळ!, भटक्यांसाठी वसतिगृहातील साहित्याची निविदाही नाही

By संदीप आडनाईक | Updated: September 14, 2024 13:48 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यात भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे सुरू आहेत. ...

संदीप आडनाईककोल्हापूर : राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यात भटक्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे सुरू आहेत. यासाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे; मात्र त्यांना कर्मचारी, आवश्यक साहित्याचा पुरवठा सरकारने केलेला नाही, साधी निविदाही प्रसिद्ध झालेली नाही. मुलींच्या वसतिगृहात महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही, आहार कसा असावा हे निश्चित नाही तसेच यापूर्वी खासगी कंपनीकडून नेमलेल्या कर्मचाऱ्यांचेही वेतनही अद्याप अदा केलेले नाही. वसतिगृह प्रवेशाचा सावळागोंधळ सुरू आहे.या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली आहे; परंतु अजूनही या जागा भरल्या जात नाहीत. वसतिगृहात जागा आहेत, याची इतर जिल्ह्यातील अनेक ओबीसी, भटके विमुक्त, एस.बी.सी. विद्यार्थी आणि पालकांना माहितीच होत नाही. यासाठी सर्वच जिल्ह्यांतील दैनिकातून प्रसिद्धी देणे आणि सामंजस्यासाठी स्थानिक ओबीसी संघटनांना सहभागी करून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, या वसतिगृहांना लागणाऱ्या साहित्याचा म्हणजेच पलंग, गादी, उशी, ब्लॅकेट, फॅन आदी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सरकारने केलेला नाही, त्याची साधी निविदाही काढलेली नाही.मुलींच्या वसतिगृहासाठीचा आवश्यक महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती अजूनही केलेली नाही. या विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा आणि कोणता असावा हेही शासनाने निश्चित केलेले नाही. वसतिगृहे हा संवेदनशील विषय असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी एस २ इन्फोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या खासगी कंपनीकडून दि. २४ एप्रिल २०२४ रोजी कर्मचारी नियुक्त केले आहेत, ते कर्मचारी रुजूही झाले. दि. २० जुलै २०२४ रोजी शासनासोबतचा या कंपनीचा करार संपला, तरीही दि.२१ जुलैनंतरही हे कर्मचारी आजअखेर कामावर आहेत. मे, जून आणि जुलै २०२० पासून केलेल्या कामाचे वेतनही त्यांना मिळालेले नाही. गेल्या ४५ दिवसांपासून ते मस्टर आणि सहीशिवाय काम करत आहेत, त्यांना नियमित न केल्यास त्यांच्या या काळातील वेतनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे.

मुलींच्या वसतिगृहासाठी अर्ज केला, पण अद्याप प्रत्यक्ष प्रवेश दिलेला नाही. दोन महिन्यापूर्वी अभ्यासक्रम सुरू झाला, पण मूळ गावाहून या जिल्ह्यात प्रवास करून यावे लागते. महाविद्यालयाला सोयीच्या ठिकाणची वसतिगृहे मुलींसाठी सुरक्षित राहतील. -तनुजा तानाजी परीट, सहसचिव, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीGovernmentसरकार