शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

धरणाला जमीन देऊन आम्ही उपाशी; वरची गावे मात्र तुपाशी

By भीमगोंड देसाई | Updated: August 7, 2023 16:54 IST

आंबेओहळ धरणाची स्थिती : वर्षापूर्वी पूर्ण, अजूनही पुनर्वसन अपूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : दीर्घकाळ अर्धवट राहिलेले आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, अजूनही सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. या धरणाच्या पाण्याचा फायदा घेणारे शेतकरी तुपाशी आणि धरणासाठी जमीन दिलेले शेतकरी उपाशीच राहिले आहेत. पुनर्वसनासाठी शासकीय यंत्रणेकडे हेलपाटे मारून त्यांच्या चपला तुटत आहेत.आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा आहे. तरीही आंबेओहळ धरणातील सर्व बाधीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. धरणाला सन १९९८ मध्ये मंजुरी मिळाली. तब्बल २३ वर्षांनी धरण पूर्ण झाले. राजकीय इच्छाशक्ती, रखडलेल्या पुनर्वसनासह विविध कारणांनी अनेक वर्षे धरणाचे काम अपूर्ण राहिले होते. गेल्या वर्षी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण अजूनही शंभर टक्के पुनर्वसन झालेले नाही.

धरणाचे नाव : आंबेओहळ, ता. आजरा.धरणासाठी ५१४ शेतकऱ्यांची जमिनीधरणासाठी ५१४ शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पोलिस बळाचा वापर करून जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या आहेत.मोबदला मिळाला अन् खर्चही झालाजमीन धरणात गेल्याने मोबदल्यापोटी २२ कोटी ६६ लाख वाटप करण्यात आले आहेत. मात्र, अनेकांचे पैसे विविध कारणांसाठी खर्च झाले आहेत.धरणाच्या पाण्याखालचे क्षेत्र किती ?प्रकल्प पाणीसाठ्याची क्षमता १२५० द.ल.घ.फू. इतकी आहे. यातून गडहिंग्लज तालुक्यातील २६१५ हेक्टर, तर आजरा तालुक्यातील १३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.१३२ शेतकऱ्यांचे पुनर्वसन प्रलंबितधरणासाठी जमिनी दिलेल्या ५१४ पैकी १३२ शेतकऱ्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. त्यांनी पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पण, त्यांचे पुनर्वसन बेदखलच केले आहे.धरण उशाला, कोरड घशालाधरणात पाणी साठत आहे. मात्र, ते उपसून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याची योजना नाही. लाभक्षेत्रातील सर्व जमिनीला पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. धरणापासून जवळ असलेल्या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण