शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

धरणाला जमीन देऊन आम्ही उपाशी; वरची गावे मात्र तुपाशी

By भीमगोंड देसाई | Updated: August 7, 2023 16:54 IST

आंबेओहळ धरणाची स्थिती : वर्षापूर्वी पूर्ण, अजूनही पुनर्वसन अपूर्ण

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : दीर्घकाळ अर्धवट राहिलेले आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरण वर्षापूर्वी पूर्ण झाले. मात्र, अजूनही सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. या धरणाच्या पाण्याचा फायदा घेणारे शेतकरी तुपाशी आणि धरणासाठी जमीन दिलेले शेतकरी उपाशीच राहिले आहेत. पुनर्वसनासाठी शासकीय यंत्रणेकडे हेलपाटे मारून त्यांच्या चपला तुटत आहेत.आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा आहे. तरीही आंबेओहळ धरणातील सर्व बाधीत शेतकऱ्यांचे पुनर्वसन झालेले नाही. धरणाला सन १९९८ मध्ये मंजुरी मिळाली. तब्बल २३ वर्षांनी धरण पूर्ण झाले. राजकीय इच्छाशक्ती, रखडलेल्या पुनर्वसनासह विविध कारणांनी अनेक वर्षे धरणाचे काम अपूर्ण राहिले होते. गेल्या वर्षी धरणाचे काम पूर्ण झाले आहे. पण अजूनही शंभर टक्के पुनर्वसन झालेले नाही.

धरणाचे नाव : आंबेओहळ, ता. आजरा.धरणासाठी ५१४ शेतकऱ्यांची जमिनीधरणासाठी ५१४ शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पोलिस बळाचा वापर करून जबरदस्तीने काढून घेण्यात आल्या आहेत.मोबदला मिळाला अन् खर्चही झालाजमीन धरणात गेल्याने मोबदल्यापोटी २२ कोटी ६६ लाख वाटप करण्यात आले आहेत. मात्र, अनेकांचे पैसे विविध कारणांसाठी खर्च झाले आहेत.धरणाच्या पाण्याखालचे क्षेत्र किती ?प्रकल्प पाणीसाठ्याची क्षमता १२५० द.ल.घ.फू. इतकी आहे. यातून गडहिंग्लज तालुक्यातील २६१५ हेक्टर, तर आजरा तालुक्यातील १३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.१३२ शेतकऱ्यांचे पुनर्वसन प्रलंबितधरणासाठी जमिनी दिलेल्या ५१४ पैकी १३२ शेतकऱ्यांचे अजूनही पुनर्वसन झालेले नाही. त्यांनी पुनर्वसनासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. पण, त्यांचे पुनर्वसन बेदखलच केले आहे.धरण उशाला, कोरड घशालाधरणात पाणी साठत आहे. मात्र, ते उपसून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याची योजना नाही. लाभक्षेत्रातील सर्व जमिनीला पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. धरणापासून जवळ असलेल्या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण