शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

राज्यात आठ वर्षांत एकही नवे ग्रंथालय नाही, वाचनसंस्कृती जपण्याच्या केवळ घोषणाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 12:58 IST

तत्कालीन राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडी सरकारने नवीन ग्रंथालयांवर बंदी घातली आणि नंतर भाजप शिवसेना युतीने त्याचे प्रामाणिक पालन केले

समीर देशपांडेकोल्हापूर : मराठी भाषेच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्रातच गेल्या आठ वर्षांत एकही नवीन ग्रंथालय स्थापन झालेले नाही, याबद्दल काहीच वाटत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तत्कालीन राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आघाडी सरकारने नवीन ग्रंथालयांवर बंदी घातली आणि नंतर भाजप शिवसेना युतीने त्याचे प्रामाणिक पालन केले. त्यामुळे ही बंदी अजूनही कायम आहे.२८ डिसेंबर, २०११च्या मंत्रिमंडळ बैठकीत ग्रंथालयांना अनुदान वाढविण्याच्या निर्णयावेळी पडताळणी करण्याचा निर्णय झाला. २१ मे ते २५ मे, २०१२ या काळात राज्यात एकाच वेळी महसूल विभागाने पडताळणी केली. यामध्ये ५,७८४ ग्रंथालये अटी व शर्तींची पूर्तता करत असल्याचे आढळले.५,७८८ ग्रंथालये सुचना देऊन सुधारणा होण्यायोग्य असल्याचे आणि ३६० ग्रंथालये दर्जावनत करण्यायोग्य असल्याचे आढळले. ९१४ ग्रंथालयांची मान्यता रद्द करण्याजोगी असल्याचाही अहवाल देण्यात आला.यानंतर, ६ मार्च, २०१३ साली तत्कालीन आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने ‘पुढील आदेश होईपर्यंत कोणत्याही नवीन ग्रंथालयाला मान्यता देऊ नये व दर्जावाढ करू नये,’ असा ठराव केला. या निर्णयानुसार दोन्ही काँग्रेसच्या सरकारने त्यावेळी एकही ग्रंथालय सुरू करू दिले नाही.मराठी भाषा आणि ग्रंथालयांविषयी आस्था असल्याचे दाखवणाऱ्या शिवसेना भाजपचे सरकार आले. पाच वर्षे सत्तेत राहिले, परंतु त्यांनी नवीन ग्रंथालयांबाबत चकार शब्दही काढला नाही.‘गाव तेथे ग्रंथालय’ योजनेला हरताळशासनाने या आधीच ‘गाव तेथे ग्रंथालय’ योजना जाहीर केली होती, परंतु राज्यात २८ हजार ग्रामपंचायती असताना, निम्म्याहून कमी म्हणजे १२ हजार ८४६ ग्रंथालये त्यावेळी अस्तित्वात होती. ही बंदी घालून शासनाने आपल्याच घोषणेला हरताळ फासला आहे.‘ऑनलाइन’ची केवळ हवाआता कोणी वाचायला जात नाही. सर्व जण मोबाइलवरच वाचतात, असे सांगितले जाते, परंतु ज्या गावात सातत्याने वीज, इंटरनेट सुविधा नाहीत, तिथे ऑनलाइनची केवळ हवाच आहे. अजूनही गावागावात सकाळी वृत्तपत्रे वाचण्यासाठी, पुस्तके वाचण्यासाठी ग्रंथालयांचाच आधार आहे, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर