शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर कोल्हापुरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. मागील हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी ६५ टक्के म्हणजेच ११ लाख ४१ हजार टन साखर शिल्लक असल्याने कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्वाधिक साखर १ लाख ५८ हजार टन ‘जवाहर’ कारखान्याकडे असून ‘कुंभी’कडे ९१ हजार टन साखर पडून असून, हंगाम तोंडावर आल्याने या साखरेचे करायचे काय? असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

गेले तीन-चार हंगाम साखर कारखानदारी दुष्टचक्रातून जात आहे. साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,१०० आणि ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर असल्याने गणित बिघडल्याने कारखानदारांची दमछाक होत आहे. मागील २०२०-२१ हा हंगाम सुरु करण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ६ लाख ७७ हजार ५५६ टन साखर शिल्लक होती. त्यामध्ये १७ लाख ५५ हजार ७७० टन साखरेचे उत्पादन झाले. त्यातून १ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१पर्यंत १२ लाख ९२ हजार २३८ टन साखरेची विक्री झाली. त्यामुळे आता तब्बल ११ लाख ४१ हजार ८७ टन साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. राज्याला ३० ते ३५ लाख टन साखर वर्षाला लागते. त्यामुळे राज्याला किमान सहा महिने पुरेल इतकी साखर सध्या कोल्हापुरात पडून आहे.

प्रत्येक कारखान्याला अडीच कोटी व्याजाचा भुर्दंड

साखर गोडावूनमध्ये पडून असली तरी त्यावर व्याज सुरु आहे. पोत्याला (१०० किलो) दिवसाला १ रुपया व्याजापोटी द्यावा लागतो. त्यामुळे केवळ व्याजावर प्रत्येक कारखान्याला किमान दोन ते अडीच कोटींचा भुर्दंड पडतो. बँकांकडे शिल्लक असलेली १० टक्के उचल ही व्याजपोटीच जाते.

दीड लाख टन साखर उघड्यावर

दोन वर्षांच्या साखरेने गोडावून फुल्ल झाल्याने मागील हंगामात कारखान्यांनी उघड्यावर साखर ठेवली होती. अनेक कारखान्यांची या पावसातही साखर तशीच आहे. साधारणत: दीड लाख टन साखर उघड्यावर असून, पावसामुळे त्याचे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

निर्यात कोटा २५ लाख टन वाढवणे गरजेचे

केंद्राने राज्यासाठी साखरेचा ६० लाख टन निर्यात कोटा दिला होता. तो संपला असून, साखरेची गोडावून मोकळी करण्यासाठी किमान २५ लाख टन निर्यात कोटा देण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

कोट-

साखरेची समस्या पाहता, १५० रूपये वाहतूक अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखर २,७५० रुपये क्विंटल आहे. केंद्राने साडेतीनशे रुपये अनुदान दिले तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ञ)

कारखानानिहाय शिल्लक साखर टनात -

कारखाना साखर

वारणा ६५,१४०

भोगावती ५५,७२२

राजाराम ४०,६४७

शाहू ७२,६९६

दत्त, शिरोळ ८३,२८२

बिद्री ७४,७८०

नलवडे, गडहिंग्लज ३४,६९७

जवाहर १,५८,५८२

मंडलिक, हमीदवाडा ३७,७७३

कुंभी ९१,७९२

पंचगंगा ५९,०५७

शरद ४४,१७९

गायकवाड, सोनवडे ७,१३६

डी. वाय. पाटील ३०,१५३

गुरुदत्त ४८,८४०

इको केन १८,०२५

हेमरस ४०,६३४

रिलायबल २०,२७५

घोरपडे ४७,५३१

डालमिया ७४,५३७

इंदिरा २९,७४१

एकूण ११,४१,०८७