शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

..तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंकेसारखी होईल - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:19 IST

कधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वेळीच योग्य निर्णय घेऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंका देशासारखी होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.देशात आज कमालीची महागाई वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. मोदी सरकार विरोधात जनतेत कमालीचा रोष आहे. त्याकडे दुर्लक्ष होण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परंतु कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पोट निवडणुकीत भाजपचा पराभव करुन तुमची धोरणे चुकत असल्याचा संदेश मोदींना दिला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

महागाई वाढायला केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांनी लावलेली एक्साईज ड्युटी कारणीभूत आहेत. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने केवळ पेट्रोलियम पदार्थापासून कर रुपाने २४ लाख कोटी रुपये महसुल जनतेच्या खिशातून वसुल केला आहे. तो इतका यापूर्वी कोणत्याच सरकारने वसुल केला नव्हता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ईडीचा वापर ब्लॅकमेलींगसाठीकधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे. दहशतवादी गटांना अर्थसहाय्य करण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून ईडीचा कायदा काँग्रेस सरकारने केला. पण त्याचा काँग्रेस काळात केवळ ३० ते ४० केसीस दाखल झाल्या होत्या. मात्र मोदी सरकार त्याचा ब्लॅकमेलींगसाठी उपयोग करत आहे. कारवाई करा, पण ती सुडाच्या भावनेने करु नका. चौकशी करा पण ती शेवटपर्यंत न्या. एकाचीही सरळ चौकशी नाही. एकाही गुन्ह्यात कोणाला शिक्षा झाली नाही. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना शरण आणण्यासाठीच त्याचा वापर केला जात आहे. असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

तर श्रीलंका होईल

मोदींनी नुकतीच केंद्रातील सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत सचिवांनी मोदींना आपल्या धोरणात बदल केले नाहीत तर आपल्या देशाची अवस्था श्रीलंका असा इशाराच सचिवांनी दिला आहे. कोविडच्या आधी देशाचा विकास दर ४.२ इतका असल्याचे सांगितले गेले. परंतु तो मायनस होता. महागाई वाढल्याने अर्थव्यवस्थेला घरघर लागली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणInflationमहागाईNarendra Modiनरेंद्र मोदी