शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

..तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंकेसारखी होईल - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:19 IST

कधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वेळीच योग्य निर्णय घेऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंका देशासारखी होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.देशात आज कमालीची महागाई वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. मोदी सरकार विरोधात जनतेत कमालीचा रोष आहे. त्याकडे दुर्लक्ष होण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परंतु कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पोट निवडणुकीत भाजपचा पराभव करुन तुमची धोरणे चुकत असल्याचा संदेश मोदींना दिला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

महागाई वाढायला केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांनी लावलेली एक्साईज ड्युटी कारणीभूत आहेत. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने केवळ पेट्रोलियम पदार्थापासून कर रुपाने २४ लाख कोटी रुपये महसुल जनतेच्या खिशातून वसुल केला आहे. तो इतका यापूर्वी कोणत्याच सरकारने वसुल केला नव्हता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ईडीचा वापर ब्लॅकमेलींगसाठीकधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे. दहशतवादी गटांना अर्थसहाय्य करण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून ईडीचा कायदा काँग्रेस सरकारने केला. पण त्याचा काँग्रेस काळात केवळ ३० ते ४० केसीस दाखल झाल्या होत्या. मात्र मोदी सरकार त्याचा ब्लॅकमेलींगसाठी उपयोग करत आहे. कारवाई करा, पण ती सुडाच्या भावनेने करु नका. चौकशी करा पण ती शेवटपर्यंत न्या. एकाचीही सरळ चौकशी नाही. एकाही गुन्ह्यात कोणाला शिक्षा झाली नाही. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना शरण आणण्यासाठीच त्याचा वापर केला जात आहे. असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

तर श्रीलंका होईल

मोदींनी नुकतीच केंद्रातील सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत सचिवांनी मोदींना आपल्या धोरणात बदल केले नाहीत तर आपल्या देशाची अवस्था श्रीलंका असा इशाराच सचिवांनी दिला आहे. कोविडच्या आधी देशाचा विकास दर ४.२ इतका असल्याचे सांगितले गेले. परंतु तो मायनस होता. महागाई वाढल्याने अर्थव्यवस्थेला घरघर लागली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणInflationमहागाईNarendra Modiनरेंद्र मोदी