शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

..तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंकेसारखी होईल - पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:19 IST

कधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटले असून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच जनतेला महागाईचे तीव्र चटके बसत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. वेळीच योग्य निर्णय घेऊन अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न झाला नाही तर भारताची अवस्था शेजारच्या श्रीलंका देशासारखी होईल, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.देशात आज कमालीची महागाई वाढली आहे. रोज पेट्रोल-डिझेल, गॅसच्या किंमती वाढत आहेत. सर्वसामान्य जनतेचे जगणे हैराण झाले आहे. मोदी सरकार विरोधात जनतेत कमालीचा रोष आहे. त्याकडे दुर्लक्ष होण्यासाठी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणून निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परंतु कोल्हापूरची स्वाभिमानी जनता पोट निवडणुकीत भाजपचा पराभव करुन तुमची धोरणे चुकत असल्याचा संदेश मोदींना दिला जाईल, असे चव्हाण म्हणाले.

महागाई वाढायला केंद्र सरकारची धोरणे आणि त्यांनी लावलेली एक्साईज ड्युटी कारणीभूत आहेत. गेल्या सात वर्षात मोदी सरकारने केवळ पेट्रोलियम पदार्थापासून कर रुपाने २४ लाख कोटी रुपये महसुल जनतेच्या खिशातून वसुल केला आहे. तो इतका यापूर्वी कोणत्याच सरकारने वसुल केला नव्हता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

ईडीचा वापर ब्लॅकमेलींगसाठीकधी नव्हे इतका सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन राज्यातील नेत्यांना ब्लॅकमेलींग केले जात आहे. दहशतवादी गटांना अर्थसहाय्य करण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून ईडीचा कायदा काँग्रेस सरकारने केला. पण त्याचा काँग्रेस काळात केवळ ३० ते ४० केसीस दाखल झाल्या होत्या. मात्र मोदी सरकार त्याचा ब्लॅकमेलींगसाठी उपयोग करत आहे. कारवाई करा, पण ती सुडाच्या भावनेने करु नका. चौकशी करा पण ती शेवटपर्यंत न्या. एकाचीही सरळ चौकशी नाही. एकाही गुन्ह्यात कोणाला शिक्षा झाली नाही. आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना शरण आणण्यासाठीच त्याचा वापर केला जात आहे. असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

तर श्रीलंका होईल

मोदींनी नुकतीच केंद्रातील सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत सचिवांनी मोदींना आपल्या धोरणात बदल केले नाहीत तर आपल्या देशाची अवस्था श्रीलंका असा इशाराच सचिवांनी दिला आहे. कोविडच्या आधी देशाचा विकास दर ४.२ इतका असल्याचे सांगितले गेले. परंतु तो मायनस होता. महागाई वाढल्याने अर्थव्यवस्थेला घरघर लागली असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणInflationमहागाईNarendra Modiनरेंद्र मोदी