शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:53 IST

सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाहीखासदार राजू शेट्टींचा इशारा: ऊस आणि विजेचा बिलांचा हिशेब पूर्ण करा

कोल्हापूर : सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा सर्वपक्षीय शेतकरी मेळावा गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार शेट्टी म्हणाले, सरकारने आतापर्यंत किती वेळा आश्वासने दिली आणि किती वेळा मोडली याची मोजदाद करणे आम्ही सोडून दिले आहे.

शेतकऱ्यांविषयी नुसता खेळखंडोबा सुरू असल्यानेच रस्त्यावर उतरावे लागत आहे. उसाच्या एफआरपीत २०० रुपयांची वाढ झाल्याचे सांगणारे सरकार एफआरपीचा बेस वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक करते. हेच सरकार एफआरपी अधिक २०० रुपये पहिली उचल देऊ म्हणते आणि प्रत्यक्ष देण्याची वेळ आल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते.

विजेच्या बाबतीतही गेली साडेचार वर्षे नुसतीच आश्वासने दिली जात आहेत. सत्यशोधन समितीचा अहवाल स्वीकारण्याचे नैतिक धाडसही सरकारकडे राहिलेले नाही. वीज थकबाकीची किती रक्कम शेतकरी देणे लागतो आणि सरकार किती याचा हिशेब द्या, ते जमत नसेल तर शेतकऱ्यांकडे पैसे मागण्याचा नैतिक अधिकारही ‘महावितरण’ला राहिलेला नाही.२१ चे चक्का जाम आंदोलन ताकदीने करावीज व एस.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकार हतबल होते. मग शेतकरी इतके वेळा रस्त्यावर उतरतात, तरीही सरकार का हतबल होत नाही, याचा शेतकऱ्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्यात मेळ नसल्यानेच सरकार त्याचा गैरफायदा उठवीत आहे. हे होऊ द्यायचे नसेल तर २१ रोजीच्या कोल्हापुरात पंचगंगा पुलावरील महामार्गावर चक्का जाम आंदोलनात ताकदीने उतरा, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.सरकार आहे की दलाल?विजेच्या विक्रीदरात भराभर वाढ होत असताना कारखान्यांनी तयार केलेल्या विजेचे खरेदीदर मात्र कमी होत आहेत, यामागचे गौडबंगाल काय, अशी विचारणा करीत खासदार शेट्टी यांनी कमी दराने वीज घेऊन ती जास्त दराने विकणारे हे सरकार आहे की दलाल, हे आधी सरकारने जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले. शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणाऱ्यांनी वीजचोऱ्या करणाऱ्यांना आधी पकडावे. वीजचोऱ्या करणारेच आमदार आणि मंत्रीही झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर