शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:53 IST

सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाहीखासदार राजू शेट्टींचा इशारा: ऊस आणि विजेचा बिलांचा हिशेब पूर्ण करा

कोल्हापूर : सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा सर्वपक्षीय शेतकरी मेळावा गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार शेट्टी म्हणाले, सरकारने आतापर्यंत किती वेळा आश्वासने दिली आणि किती वेळा मोडली याची मोजदाद करणे आम्ही सोडून दिले आहे.

शेतकऱ्यांविषयी नुसता खेळखंडोबा सुरू असल्यानेच रस्त्यावर उतरावे लागत आहे. उसाच्या एफआरपीत २०० रुपयांची वाढ झाल्याचे सांगणारे सरकार एफआरपीचा बेस वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक करते. हेच सरकार एफआरपी अधिक २०० रुपये पहिली उचल देऊ म्हणते आणि प्रत्यक्ष देण्याची वेळ आल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते.

विजेच्या बाबतीतही गेली साडेचार वर्षे नुसतीच आश्वासने दिली जात आहेत. सत्यशोधन समितीचा अहवाल स्वीकारण्याचे नैतिक धाडसही सरकारकडे राहिलेले नाही. वीज थकबाकीची किती रक्कम शेतकरी देणे लागतो आणि सरकार किती याचा हिशेब द्या, ते जमत नसेल तर शेतकऱ्यांकडे पैसे मागण्याचा नैतिक अधिकारही ‘महावितरण’ला राहिलेला नाही.२१ चे चक्का जाम आंदोलन ताकदीने करावीज व एस.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकार हतबल होते. मग शेतकरी इतके वेळा रस्त्यावर उतरतात, तरीही सरकार का हतबल होत नाही, याचा शेतकऱ्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्यात मेळ नसल्यानेच सरकार त्याचा गैरफायदा उठवीत आहे. हे होऊ द्यायचे नसेल तर २१ रोजीच्या कोल्हापुरात पंचगंगा पुलावरील महामार्गावर चक्का जाम आंदोलनात ताकदीने उतरा, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.सरकार आहे की दलाल?विजेच्या विक्रीदरात भराभर वाढ होत असताना कारखान्यांनी तयार केलेल्या विजेचे खरेदीदर मात्र कमी होत आहेत, यामागचे गौडबंगाल काय, अशी विचारणा करीत खासदार शेट्टी यांनी कमी दराने वीज घेऊन ती जास्त दराने विकणारे हे सरकार आहे की दलाल, हे आधी सरकारने जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले. शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणाऱ्यांनी वीजचोऱ्या करणाऱ्यांना आधी पकडावे. वीजचोऱ्या करणारेच आमदार आणि मंत्रीही झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर