शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:53 IST

सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे... तोपर्यंत अमित शहांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाहीखासदार राजू शेट्टींचा इशारा: ऊस आणि विजेचा बिलांचा हिशेब पूर्ण करा

कोल्हापूर : सरकार मुर्दाड झाले आहे, अर्ज-विनंत्यांची भाषा त्यांना कळत नाही. त्यांचे देव असलेले अमित शहा २४ रोजी कोल्हापुरात येत आहेत. हा दौरा सुरळीत पार पडावा, असे सरकारला वाटत असेल तर दौऱ्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या थकीत उस आणि विजेच्या बिलांचा हिशेब द्यावा; नाही तर मुख्यमंत्र्यांसह येणाऱ्या अमित शहांना कोल्हापुरात पायदेखील ठेवू देणार नाही, असा इशारा ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचा सर्वपक्षीय शेतकरी मेळावा गुरुवारी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना खासदार शेट्टी म्हणाले, सरकारने आतापर्यंत किती वेळा आश्वासने दिली आणि किती वेळा मोडली याची मोजदाद करणे आम्ही सोडून दिले आहे.

शेतकऱ्यांविषयी नुसता खेळखंडोबा सुरू असल्यानेच रस्त्यावर उतरावे लागत आहे. उसाच्या एफआरपीत २०० रुपयांची वाढ झाल्याचे सांगणारे सरकार एफआरपीचा बेस वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक करते. हेच सरकार एफआरपी अधिक २०० रुपये पहिली उचल देऊ म्हणते आणि प्रत्यक्ष देण्याची वेळ आल्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडते.

विजेच्या बाबतीतही गेली साडेचार वर्षे नुसतीच आश्वासने दिली जात आहेत. सत्यशोधन समितीचा अहवाल स्वीकारण्याचे नैतिक धाडसही सरकारकडे राहिलेले नाही. वीज थकबाकीची किती रक्कम शेतकरी देणे लागतो आणि सरकार किती याचा हिशेब द्या, ते जमत नसेल तर शेतकऱ्यांकडे पैसे मागण्याचा नैतिक अधिकारही ‘महावितरण’ला राहिलेला नाही.२१ चे चक्का जाम आंदोलन ताकदीने करावीज व एस.टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकार हतबल होते. मग शेतकरी इतके वेळा रस्त्यावर उतरतात, तरीही सरकार का हतबल होत नाही, याचा शेतकऱ्यांनीच विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्यात मेळ नसल्यानेच सरकार त्याचा गैरफायदा उठवीत आहे. हे होऊ द्यायचे नसेल तर २१ रोजीच्या कोल्हापुरात पंचगंगा पुलावरील महामार्गावर चक्का जाम आंदोलनात ताकदीने उतरा, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.सरकार आहे की दलाल?विजेच्या विक्रीदरात भराभर वाढ होत असताना कारखान्यांनी तयार केलेल्या विजेचे खरेदीदर मात्र कमी होत आहेत, यामागचे गौडबंगाल काय, अशी विचारणा करीत खासदार शेट्टी यांनी कमी दराने वीज घेऊन ती जास्त दराने विकणारे हे सरकार आहे की दलाल, हे आधी सरकारने जाहीर करावे, असे खुले आव्हान दिले. शेतकऱ्यांची वीजजोडणी तोडणाऱ्यांनी वीजचोऱ्या करणाऱ्यांना आधी पकडावे. वीजचोऱ्या करणारेच आमदार आणि मंत्रीही झाले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. 

 

टॅग्स :Amit Shahअमित शाहRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर