शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:35 IST

कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली.

ठळक मुद्दे...त्यांची आयुष्यभराची मिळकत पूराने केली गिळंकृत, हजारो पुस्तके नष्ट उमाकांत राणिंगा, गोपाळ गावडे यांच्या दुर्मिळ ग्रंथांचा झाला लगदा

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूरात आलेल्या महापूरामुळे ज्येष्ठ मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा तसेच प्रा. गोपाळ गावडे यांनी आयुष्यभर जमा केलेली दुर्मिळ आणि जपून ठेवलेल्या पुस्तकांची मिळकत गिळंकृत झाली.उमाकांत राणिंगा यांचे शाहुपुरीतील कुंभार गल्लीत घर आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीचे दुकान गेले पाच दिवस सात फूट पाण्यात होते. वैयक्तिक ग्रंथालयात त्यांनी पाच हजाराहून अधिक ग्रंथसंपदा जतन करुन ठेवली होती.

यापैकी विश्वकोष, ज्ञानकोष, चरित्रकोष, स्मृतिकोष, चित्राव शास्त्रींचे प्राचीन ग्रंथ, मध्ययुगीन चरित्रग्रंथ, समरांगण सूत्रधार आदि सुमारे अडीच हजार दुर्मिळ ग्रंथसंपदा पूराच्या पाण्यात भिजल्याने त्याचा लगदा झाला आहे. यातील दोन हजार पुस्तके वाचण्यायोग्य असली तरी त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे.

याशिवाय गणेशोत्सवासाठी खरेदी केलेले इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे चार लाखांचे नुकसान झाले आहे, ते वेगळेच. यासोबत घरातील कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर, डिजिटल कॅमेरा, हार्डडिस्क आणि सर्व कागदपत्रे खराब झाली आहेत.

मूळचे चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील डॉ. गोपाळ गावडे कोल्हापूरातील महावीर महाविद्यालयात बीएड विभागात प्राध्यापक आहेत. पंचगंगा नदीकाठाजवळील शुक्रवार पेठेत शंकराचार्य मठाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या घरात आठ फूट पाणी शिरले. विद्यार्थी असल्यापासून जमा केलेली ३000 हून अधिक पुस्तके त्यांच्या वैयक्तिक ग्रंथालयात होती.१९८९, २00५ सालच्या दोन्ही महापूराचा अनुभव घेतल्याने गावडे यांनी पाणी वाढू लागले तसे ही पुस्तके पाच फुटाच्यावर तीन रॅकमध्ये ठेवली. मात्र या महापूराने ती गिळंकृत केली. नेसत्या वस्त्रानीशी सहकाऱ्यांच्या घरात स्थलांतरीत झालेल्या गावडे यांनी न राहवून मंगळवारी भर पावसात पोहत घर गाठले आणि पुस्तके आणखी उंचावर ठेवली, परंतु पाणी जास्त वाढल्याने सांसारिक साहित्यासह पुस्तकांचेही नुकसान झाले.सर्व्हिस रेकार्ड धोक्यातया महापूरात गावडे सरांचे सर्व शासकीय रेकॉर्डही नष्ट झाले आहे. पंचनाम्यात फर्निचर, टीव्ही, फ्रीजसह त्यांची २९ वर्षाच्या नोकरीच्या आॅर्डर्स, प्रोफेसर पदाचा प्रस्ताव, प्रशस्तीपत्रे, सन्मानचिन्हे, रेशन, आधार, पॅन, मतदान ओळखपत्रे, एटीएम व गॅसचे कार्ड, मुलांची आणि त्यांची मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, प्लॉट आणि फ्लॅटची कागदपत्रे, एलआयसीच्या पॉलिसींचा लगदा झाला आहे. 

टीव्ही, फ्रीज, फर्निचर या वस्तू पुन्हा मिळविता येतीलही; परंतु ४0 वर्षांत जमा केलेल्या आवडीच्या आणि गरजेच्या पुस्तकांची हानी कशी भरून निघणार? कितीही पैसे भरले तरी कुठून कुठून जमा केलेल्या या पुस्तकांचा सत्यानाश झाला आहे.-डॉ. गोपाळ गावडे,प्राध्यापक, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरliteratureसाहित्य