शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

शहरातील १० तलावांची चोरी, असंख्य विहिरीही गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:49 IST

कोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर शहर तलाव आणि विहरींची शहर म्हणून ओळखले जात असे; परंतु काळानुसार शहरातील नागरी वस्ती वाढली ...

कोल्हापूर : एकेकाळी कोल्हापूर शहर तलाव आणि विहरींची शहर म्हणून ओळखले जात असे; परंतु काळानुसार शहरातील नागरी वस्ती वाढली आणि अनेक तलाव आणि विहिरींची चोरी झाली. पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या शहरातील तलाव कचरा, खरमाती टाकून बुजविले गेले. सध्या त्याठिकाणी इमारती, बाजारपेठा भरविल्या जात आहेत. काही ठिकाणी क्रीडांगणे तयार झाली आहेत. नागरिकांच्या कृतघ्नपणामुळे शहरातील मोठ्या स्वरूपाचे किमान १० ते १२ तलाव तसेच २० हून अधिक विहिरी गायब झाल्या आहेत.

कोल्हापूर शहराला एक पौराणिक पार्श्वभूमी लाभली आहे. एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून देशात कोल्हापूर शहराचा नावलौकिक आहे. शहराला लागून वाहणारी पंचगंगा नदी आणि शहरातील विविध भागात असलेले तलाव, खासगी तसेच सार्वजनिक विहिरी हेच या शहराच्या संपन्नतेचे प्रतीक होते. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत, खुदाई करताना लागणारे पाण्याचे उमाळे त्याची आजही साक्ष देते.

शहरातील रंकाळा, कळंबा, कोटीतिर्थ, राजाराम तलाव या चार तलावांचे अस्तित्व आजही असून त्यांचे जनत व संवर्धन चांगल्या पद्धतीने केले आहे. परंतु काळाच्या ओघात वरुणतिर्थ, कपिलतिर्थ, रावणेश्वर, सिद्धाळा, पद्माळा, खंबाळा, खाराळा, फिरंगाई, कुंभारतळे, ससूरबाग या तलावांचे अस्तित्व संपले आहे. अंबाबाई मंदिराजवळील काशीकुंडची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तर मातीच्या ढिगाऱ्यात मुजलेला पौराणिक महात्म्य लाभलेल्या मणकर्णिका कुंडाची पुन्हा एकदा खुदाई करून त्याचे नुकतेच संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. बुजविलेल्या तलावाच्या ठिकाणी व्यापारी संकुल, क्रीडांगणे, भाजी मार्केट उभारली गेली आहेत.

हे घ्या पुरावे .....

१. खंबाळा तलाव - ताराबाई रोडवरील बाबुजमाल दर्ग्याच्या समोर खंबाळा तलावाचे अस्तित्व होते. कालांतराने हा तलाव बुजविण्यात आला आहे. त्याठिकाणी पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली होती. आता तेथे बहुमजली पार्किंग इमारत बांधली जात आहे. त्याच्या खुदाईवेळी तलावाचे अवशेष पाहायला मिळाले. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. अनेक वस्तू सापडल्या. आता ही इमारत पूर्ण झाल्यावर तलावाचे अस्तित्व कायमचे मिटणार आहे.

२. वरुणतिर्थ - आज ज्या ठिकाणी गांधी मैदान तयार करण्यात आले आहे, त्याठिकाणी मोठे तळं होतं. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत असलेले तळ्यात आजूबाजूने सुद्धा पाणी येत होते. या परिसरात छोटी छोटी मंदिरांचे अस्तित्व सुद्धा होते. सध्या तलावात भर टाकून बुजवून त्याठिकाणी खेळाचे मैदान करण्यात आले आहे. परंतु पावसाळ्यात हा तलाव आपलं मूळ स्वरूप दाखवित असतो. यंदाच्या पावसाळ्यात तर या ठिकाणी बारा फुट पाणी साचून राहिले होते.

३. मुळे विहीर-शहरात कुठंही आग लागली की, ती विझविण्यासाठी पाणी, घेण्यासाठी अग्निशमनचे बंब या मुळे विहिरीवर धाव घ्यायचे. प्रशस्त बांधकाम आणि बारा महिने पाणी असलेल्या या विहिरीचा वापर शहरातील पाणीटंचाईच्या काळात सुद्धा होत होता. परंतु पुरेशा देखभालीअभावी या विहिरीची पडझड झाली आहे.

कोट-

कोल्हापूर सहा खेड्यांचं गाव होतं. शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे जागेची उपलब्धता व्हावी म्हणून असलेली तळी, कुंड बुजविण्यात आली. स्थानिक प्रशासनास त्याची योग्य निगा राखता आली नाही. त्यामुळे दलदल झाली. दलदलीपासून सुटका व्हावी म्हणून त्याठिकाणी खरमाती टाकून बुजविण्यात आली. त्यावेळी स्थानिक प्रशासनाला या विहिरी, तलाव यांचे महत्व समजले नाही.

ॲड. प्रसन्न मालेकर, जलस्त्रोतांचे अभ्यासक

कोट -

पूर्वीच्या काळी शहर गावठाणाची हद्द खूपच छोटी होती. नागरी वस्ती वाढेल तसे गावठाणाच्या बाहेर विकास व्हायला लागला. नागरी वस्ती वाढायला लागली. त्यावेळी गावाच्या बाहेर गावाच्या काठांवर असणारी तळी, कुंड त्या त्या काळाच्या गरजेनुसार, नियोजनानुसार त्यावेळच्या प्रशासनाने बुजविली हे वास्तव आहे.

-नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता महानगरपालिका, कोल्हापूर