शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

समस्या सोडविणारे दूर गेल्याने जग चिंताग्रस्त, शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:43 IST

डॉ. संजय डी. पाटील यांचा दिमाखदार सोहळ्यात एकसष्टीनिमित्त सत्कार

कोल्हापूर : समस्या सोडविणारे आणि समस्याग्रस्त यांच्यात जगभर मोठी दरी निर्माण झाली आहे. ज्यांच्याकडे समस्या सोडविण्याची भूमिका आहे अशांना ही समस्या आपली आहे, असे वाटतच नाही. ते नेहमी गिऱ्हाईक म्हणूनच त्यांच्याकडे पाहत असून, समस्या सोडविणाऱ्यांमधील आत्मीयता संपल्यानेच जग चिंताग्रस्त बनले आहे, असे प्रतिपादन शांततेचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांनी मंगळवारी येथे केले.डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार शाहू छत्रपती अध्यक्षस्थानी होते. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, शांतादेवी पाटील, कुलगुरू डाॅ. डी. टी. शिर्के, सुमेधा सत्यार्थी, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, डॉ. पी. डी. पाटील, वैजयंती पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी ‘ट्रान्सफार्मिंग हायर एज्युकेशन : अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन’ या ग्रंथाचे व ध्यासपर्व या डॉ. संजय डी. पाटील यांच्यावरील जीवनगौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

डॉ. सत्यार्थी म्हणाले, भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्यासाठी अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. बालशिक्षण, बालहक्क आणि बालमजुरी या क्षेत्रात देशात सुरू असलेले काम प्रशंसनीय आहे. स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवापर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल. सध्या कधी नव्हे इतके जग अत्याधुनिक बनले आहे, ते श्रीमंत आहे, गतीने धावत आहे. मात्र, त्याच्याइतकेच हे जग संकटात व समस्याग्रस्तही बनले आहे.खासदार शाहू छत्रपती म्हणाले, संजय डी. पाटील यांनी शिक्षणाबरोबरच कृषी, आरोग्य क्षेत्रातही मोठे काम केले आहे. वडिलांचा शैक्षणिक, सामाजिक वारसा त्यांनी खऱ्या अर्थाने पुढे नेला.

शाहूंच्या कार्याचा गौरवडॉ. सत्यार्थी यांनी राजर्षी शाहू छत्रपती यांच्या कार्याचा सुरुवातीला गौरव केला. ते म्हणाले, उत्तर भारतात ६० वा वाढदिवस दणक्यात साजरा करतात, इकडे मात्र एकसष्टी करतात. तसेही महाराष्ट्र सगळ्याच बाबतीत देशात एक पाऊल पुढेच आहे. सव्वाशे वर्षांपूर्वी देशात बालशिक्षणाचा कायदा करून राजर्षी शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थाने प्रगतीचे पाऊल टाकले होते. देशात कोल्हापूर, बडोदा व केरळ या तीनच प्रदेशांमध्ये अशा प्रकारचा कायदा केला गेला. साखर, उद्योग-व्यवसायात कोल्हापूरची भूमी समृद्ध आहे. आता शिक्षणाच्या क्षेत्रातही कोल्हापूर केंद्रबिंदू बनले आहे.

यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डॉ. के. प्रथापन, डॉ. प्रभात रंजन, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. भालबा विभुते, डॉ. आर. के. शर्मा, अमित विक्रम, प्रताप चव्हाण पाटील, मेघराज काकडे, देवराज पाटील, सुप्रियाताई चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, राजश्री काकडे, भारत पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील उपस्थित होते. आर. के. मुदगल यांनी प्रास्ताविक केले. राधिका ढणाल यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. शर्मा यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर