शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Kolhapur: 'अन्नधान्य वितरण'चा मनस्ताप, नागरिकांचे हेलपाटे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 7, 2025 16:34 IST

सर्व्हरचा ताप, मनुष्यबळाचा अभाव

इंदुमती गणेशकोल्हापूर : येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातील काम तीन महिने थांब अशी स्थिती आहे. गेले दाेन महिने आरसीएमएस आणि आधार सर्व्हरने मान टाकली आहे. कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी धरून मोजून चार जण, नागरिकांचे येणारे अर्ज महिन्याला २ हजार, मदतनिसांवर भार त्यामुळे कोणताही अर्ज किमान दोन-तीन महिन्यांआधी निकालीच निघत नाही असाच या कार्यालयाचा अनुभव आहे. त्याचा नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे. हेलपाटे मारून त्यांचा जीव मेटाकुटीस येत आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर हे कार्यालय स्वतंत्र करून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.

या कार्यालयात लोकांना फारच हेलपाटे मारावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ला समजली होती. म्हणून प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन नेमकी वस्तुस्थिती समजून घेतली. सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या साडे चार लाख होती. आता १४ वर्षांनंतर ती साडे सहा ते सात लाखांवर गेली आहे. शासनाने महसूल अंतर्गत अन्नधान्य वितरण कार्यालयाला दिलेले मनुष्यबळ ४ लाख लोकसंख्येचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढायला हवी होती. प्रत्यक्षात २०२२ च्या आकृतीबंधात आहे हे मनुष्यबळदेखील कमी केले आहे. एक अर्ज निकाली लागायला किमान २ ते ३ महिने लागतात.

ऑनलाइन कारभार कमी, त्रासच जास्तधान्यवाटपात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व कामकाज ऑनलाइन आणले ही बाब चांगली असली तरी त्यात काम कमी आणि त्रासच जास्त आहे. आरसीएमएस ही यंत्रणा गेले दोन महिने बंद-चालू होत आहे. ती सुरू झाली तोपर्यंत आधार लींकिंग सर्व्हर बंद पडला आहे. हे दोन्ही सर्व्हर एकाचवेळी सुरू राहतील त्याचवेळी ऑनलाइन काम करता येते. सोमवारी आरसीएमएसमध्ये सुरू होते; पण, आधार बंद पडली होती.

सध्याचे मनुष्यबळ

  • प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी
  • एक पुरवठा निरीक्षक (हेच सध्या गोदामाचे काम बघतात.)
  • दोन क्लार्क
  • चार जण येथे मदतनीस म्हणून काम करतात.
  • एक महिला उमेदवार आहे.

या कार्यालयातील एका एजंट कम मदतनीस कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला की वरून फोन येतो. किंवा संघटनांना हाताशी धरून आंदोलनाचा स्टंट केला जातो. आणखी एका व्यक्तीबाबत अशाच अनेक तक्रारी होत्या त्याला काढून टाकण्यात आले आहे. मूळ पोस्टिंग करमणूक विभागाची असलेले प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून नितीन धापसे पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील एजंटगिरी रोखण्याचा आणि कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही.

मदतनिसांची मदतयेथे काम करीत असलेल्या दोन जणांना तुम्ही कर्मचारी किंवा एजंट आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही दोन्हीही नाही. मदतनीस म्हणून काम करतो. मिळतील तेवढे मानधन, रक्कम घेतो.

धान्यासाठी सर्वाधिक अर्जया कार्यालयाकडे नवीन रेशन कार्ड काढणे, नाव कमी - जास्त करणे, पत्ता बदलणे यासह विविध दुरुस्त्या असे विविध प्रकारचे अर्ज येतात. पण, सर्वाधिक अर्ज हे धान्य सुरू करण्याचे व ऑनलाइन शिधापत्रिका करून १२ अंकी नंबरसाठीचे येतात. या अर्जावर आरोग्य सुविधा मिळत असल्याने १२ अंकीसाठीच्या अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

शिधापत्रिकांच्या कामात सर्व्हरचा मोठा अडथळा होत आहे. अर्ज आल्यापासून तीन दिवसांत शिधापत्रिका द्यायची योजना आहे. मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. तुलनेने येणाऱ्या अर्जांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे यंत्रणा कमी पडते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्यात मर्यादा येतात. - नितीन धापसे पाटील, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग