शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

Kolhapur: 'अन्नधान्य वितरण'चा मनस्ताप, नागरिकांचे हेलपाटे

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 7, 2025 16:34 IST

सर्व्हरचा ताप, मनुष्यबळाचा अभाव

इंदुमती गणेशकोल्हापूर : येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत असलेल्या शहर अन्नधान्य वितरण कार्यालयातील काम तीन महिने थांब अशी स्थिती आहे. गेले दाेन महिने आरसीएमएस आणि आधार सर्व्हरने मान टाकली आहे. कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी धरून मोजून चार जण, नागरिकांचे येणारे अर्ज महिन्याला २ हजार, मदतनिसांवर भार त्यामुळे कोणताही अर्ज किमान दोन-तीन महिन्यांआधी निकालीच निघत नाही असाच या कार्यालयाचा अनुभव आहे. त्याचा नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे. हेलपाटे मारून त्यांचा जीव मेटाकुटीस येत आहे. ही परिस्थिती सुधारायची असेल तर हे कार्यालय स्वतंत्र करून मनुष्यबळ वाढविण्याची गरज आहे.

या कार्यालयात लोकांना फारच हेलपाटे मारावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ला समजली होती. म्हणून प्रत्यक्ष कार्यालयास भेट देऊन नेमकी वस्तुस्थिती समजून घेतली. सन २०११ च्या जनगणनेनुसार कोल्हापूर शहराची लोकसंख्या साडे चार लाख होती. आता १४ वर्षांनंतर ती साडे सहा ते सात लाखांवर गेली आहे. शासनाने महसूल अंतर्गत अन्नधान्य वितरण कार्यालयाला दिलेले मनुष्यबळ ४ लाख लोकसंख्येचे आहे. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढायला हवी होती. प्रत्यक्षात २०२२ च्या आकृतीबंधात आहे हे मनुष्यबळदेखील कमी केले आहे. एक अर्ज निकाली लागायला किमान २ ते ३ महिने लागतात.

ऑनलाइन कारभार कमी, त्रासच जास्तधान्यवाटपात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व कामकाज ऑनलाइन आणले ही बाब चांगली असली तरी त्यात काम कमी आणि त्रासच जास्त आहे. आरसीएमएस ही यंत्रणा गेले दोन महिने बंद-चालू होत आहे. ती सुरू झाली तोपर्यंत आधार लींकिंग सर्व्हर बंद पडला आहे. हे दोन्ही सर्व्हर एकाचवेळी सुरू राहतील त्याचवेळी ऑनलाइन काम करता येते. सोमवारी आरसीएमएसमध्ये सुरू होते; पण, आधार बंद पडली होती.

सध्याचे मनुष्यबळ

  • प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी
  • एक पुरवठा निरीक्षक (हेच सध्या गोदामाचे काम बघतात.)
  • दोन क्लार्क
  • चार जण येथे मदतनीस म्हणून काम करतात.
  • एक महिला उमेदवार आहे.

या कार्यालयातील एका एजंट कम मदतनीस कर्मचाऱ्याच्या विरोधात अनेक तक्रारी आहेत. त्याच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला की वरून फोन येतो. किंवा संघटनांना हाताशी धरून आंदोलनाचा स्टंट केला जातो. आणखी एका व्यक्तीबाबत अशाच अनेक तक्रारी होत्या त्याला काढून टाकण्यात आले आहे. मूळ पोस्टिंग करमणूक विभागाची असलेले प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून नितीन धापसे पाटील यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील एजंटगिरी रोखण्याचा आणि कारभारात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्याप पूर्ण यश मिळालेले नाही.

मदतनिसांची मदतयेथे काम करीत असलेल्या दोन जणांना तुम्ही कर्मचारी किंवा एजंट आहात का, असे विचारले असता ते म्हणाले, आम्ही दोन्हीही नाही. मदतनीस म्हणून काम करतो. मिळतील तेवढे मानधन, रक्कम घेतो.

धान्यासाठी सर्वाधिक अर्जया कार्यालयाकडे नवीन रेशन कार्ड काढणे, नाव कमी - जास्त करणे, पत्ता बदलणे यासह विविध दुरुस्त्या असे विविध प्रकारचे अर्ज येतात. पण, सर्वाधिक अर्ज हे धान्य सुरू करण्याचे व ऑनलाइन शिधापत्रिका करून १२ अंकी नंबरसाठीचे येतात. या अर्जावर आरोग्य सुविधा मिळत असल्याने १२ अंकीसाठीच्या अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

शिधापत्रिकांच्या कामात सर्व्हरचा मोठा अडथळा होत आहे. अर्ज आल्यापासून तीन दिवसांत शिधापत्रिका द्यायची योजना आहे. मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. तुलनेने येणाऱ्या अर्जांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे यंत्रणा कमी पडते. प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्यात मर्यादा येतात. - नितीन धापसे पाटील, शहर अन्न धान्य वितरण अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग