शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
4
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
5
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
6
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
7
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
8
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
9
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
10
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
11
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
12
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
13
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
14
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
15
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
16
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
17
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
18
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
19
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
20
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 

Kolhapur: उभारले पिलर, पण ठरेना जागेचा दर; सात वर्षांपासून बावड्यातील राजाराम पुलाचे काम रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 18:05 IST

नाबार्डकडून १७ कोटींचा निधी झाला होता मंजूर

कोल्हापूर : दोन शेतकऱ्यांना ५० गुंठे जमिनीसाठी बाजारभावानुसार दर हवा आहे, तो द्यायला प्रशासन तयार नसल्याने राजाराम बंधाऱ्याला समांतर पुलाचे काम गेल्या सात वर्षांपासून रखडलेले आहे. वडणगेच्या बाजूची पाच गुंठ्याची रक्कम अदा केली असली तरी उर्वरित पाच गुंठ्याची आणि कसबा बावड्याकडील बाजूची ४५ गुंठ्यासाठी बाजारभावाने केलेली मागणी मान्य नसल्याने हे काम बंद आहे.कसबा बावड्याहून वडणगेकडे जाणाऱ्या राजाराम बंधाऱ्याला समांतर पूल बांधण्यात येत आहे. ७.५ मीटर रुंद आणि १९२ मीटर लांब असलेल्या या पुलाच्या कामाची २४ महिन्यांची मुदत जानेवारी २०१९ मध्ये संपली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादनासंदर्भात अनेक बैठका झाल्या, परंतु यातून तोडगा निघालेला नाही.सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल आल्यानंतर विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत सक्तीचे भूसंपादन होणार आहे. मात्र तोपर्यंत या कामाचे घोंगडे भिजतच राहणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र अद्याप अहवाल आला नसल्यामुळे पुढील कार्यवाही झालेली नाही. या पुलाच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या जोड रस्त्यांसाठी दोन्हीकडच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन होणे बाकी होते. यापैकी वडणगेच्या बाजूला २५० मीटर जोड रस्त्यासाठी वडणगे परिसरातील शेतकऱ्यांच्या बाजूच्या जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया आता मार्गी लागली आहे. येथील शेतकरी विजय निवृत्ती रणदिवे यांना पाच गुंठ्यासाठी ३ लाख ४६ हजार मिळालेले आहेत. मात्र पुलालगतच्या पाच गुंठ्याच्या जागेसाठी त्यांनी बाजारभावाने केलेली मागणी सरकारला मान्य नाही. त्यामुळे वडणगेच्या बाजूचे भूसंपादन रखडलेले आहे. कसबा बावड्याच्या बाजूला १८५ मीटर भूसंपादन बाकी आहे. या बाजूचे शेतकरी जयदीप विलास जामदार यांनी त्यांच्या ४५ गुंठे जागेचा दर बाजारभावाने मागणी केली आहे. यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना जोपर्यंत भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत या कामाला प्रारंभ होणार नाही. एकूण सातपैकी डिसेंबरअखेर या पुलाचे सहा पिलर उभारले आहेत. जमीन ताब्यात मिळताच काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती या बांधकामाचे कंत्राटदार राहुल पटेल यांनी सांगितले.

बावडा-वडणगे परिसरातील नागरिकांची सोयदरवर्षीच्या पूरस्थितीत कोल्हापूर शहराला जोडणारा कसबा बावडा येथील राजाराम बंधारा रस्ता पाण्याखाली जातो. याठिकाणी या काळात १८ फूट पाणीपातळी वाढते. दोन महिने या काळात या मार्गावर होणारी बावडा-वडणगे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होते. हा पूल झाल्यास कसबा बावड्याहून वडणगे मार्गे रत्नागिरी महामार्गाकडे आणि वडणगे परिसरातून बावडा मार्गे औद्योगिक वसाहतीकडे कामासाठी ये-जा करणाऱ्या तसेच परिसरातील २० ते २५ गावांचा संपर्क तुटतो. यामुळे दोन महिने वाहनधारकांची मोठी सोय होणार आहे. पावसाळ्यात हा मार्ग बंद राहिल्याने सर्वांनाच लांबचा पल्ला टाकून यावे लागते.

नाबार्डकडून १७ कोटींचा निधी झाला होता मंजूरया पुलास पर्यायी आणि समांतर पुलासाठी नाबार्डकडून २०१७ मध्ये १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. परंतु हे काम भूसंपादनामुळे रखडलेले आहे.

जमिनीचे दर सव्वाचार पट अधिककाम सुरू केले तेव्हा २०१७ मध्ये या जमिनींचे दर कमी होते. परंतु त्यावेळीही संबंधित दोन्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या जागा हस्तांतरित करण्यास विरोध केला होता. आता या कामासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी सव्वाचार पट दराने जमिनीचे मूल्यांकन केले आहे. ऑक्टोबर महिन्याअखेर भूसंपादनाचा हा विषय मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या पुलाच्या कामासाठी वाढीव निधीची तरतूदही नाबार्डकडून करण्यात आली आहे.

या जमिनी संपादित करण्यापूर्वी आमच्यापैकी कोणाशीही प्रशासनाने चर्चा केली नव्हती. बाजारभावाच्या दुपटीने दर देण्याचा नियम असताना संबंधित अधिकारी ग्रामीण दराने रक्कम देण्याची भाषा करत आहेत. यासंदर्भात कोणतीही नोटीस दिलेली नाही. -जयदीप जामदार, शेतकरी, कसबा बावडा 

गेल्या चार वर्षांपासून अधिकाऱ्यांकडून चर्चा थांबलेली आहे. बाजारभावाने दर मागण्याचा आमचा हक्कही डावलला जातो आहे. शेतीची किंमत आणि व्यवसायासाठीचा दर यांची सांगड घातली जात नाही. -विजय रणदिवे, शेतकरी, वडणगे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर