शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबा विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यास मंजुरी, ५०० कोटींच्या कामांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:36 IST

अपर सचिवांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, प्राधिकरणाचा मसुदा विधी न्यायकडे पाठवणार

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्याला बुधवारी राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली. मुंबईत वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील २७२ कोटी, तसेच अभिसरणातील कामांचे २२७ कोटी अशा ५०० कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे अंतिम करण्यासाठी पाठवण्याचे ठरले. यानंतर पुढील काही आठवड्यात मुख्य सचिवांची उच्चाधिकार समिती व शेवटी मुख्यमंत्र्यांसमोर आराखड्याचे सादरीकरण होऊन पहिल्या टप्प्याला अंतिम मंजुरी मिळेल.

जोतिबा मंदिराच्या विकासासाठी १७०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, तो त्रुटींच्या पूर्ततेनंतर दोन महिन्यांपूर्वी शासनदरबारी पाठवण्यात आला होता. अधिवेशनापूर्वी पन्हाळ्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरण स्थापन करू, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता शासन दरबारी हालचालींना वेग आला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत झालेल्या बैठकीत आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जोतिबा आराखड्याचा पहिला टप्पा २७२ कोटींचा आहे. तर इतर विभागांचे म्हणजे रस्ते, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग अशा विविध विभागांशी संबंधित अभिसरणातील कामांचे २२७ कोटी अशा एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी जोतिबा आराखड्याचे सादरीकरण केले, तसेच आराखड्याबाबत असलेल्या शंकांचे निरसन केले.यानंतर पुढील काही आठवड्यांत हा आराखडा मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेसाठी जाईल. त्यांची मंजुरी मिळाली की, मुख्यमंत्र्यांसमोर आराखडा सादर केला जाईल. त्यांची मंजुरी मिळाली की, तशी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

पहिल्या टप्प्यातील विकासकामेडोंगरावरील सर्व ७ तलावांचे जतन संवर्धन व सुशोभीकरण, पार्किंग, केदारविजय बागेचे सुशोभीकरण, ॲम्पी थिएटर, डोंगरावर जाणाऱ्या चारही बाजूंच्या पायवाटा दुरुस्तीकरण, बसस्थानक, सांडपाणी व्यवस्थापन, पाणपोई, कम्युनिटी किचन, डॉर्मेटरी, सांस्कृतिक हॉल, स्वच्छतागृह.

पहिल्या दोन टप्प्यात स्थलांतर नाही..जोतिबा आराखड्याच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये डोंगराचे जतन, संवर्धन, मूलभूत सोयीसुविधा, सुशोभीकरणाचा समावेश असल्याने सुरुवातीला कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतर होणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाGovernmentसरकार