शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: जोतिबा विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यास मंजुरी, ५०० कोटींच्या कामांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:36 IST

अपर सचिवांच्या बैठकीत शिक्कामोर्तब, प्राधिकरणाचा मसुदा विधी न्यायकडे पाठवणार

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थानच्या आराखड्यातील पहिल्या टप्प्याला बुधवारी राज्य शासनाने तत्त्वत: मंजुरी दिली. मुंबईत वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, कोल्हापूरचे पालक सचिव राजगोपाल देवरा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील २७२ कोटी, तसेच अभिसरणातील कामांचे २२७ कोटी अशा ५०० कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. प्राधिकरणाचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे अंतिम करण्यासाठी पाठवण्याचे ठरले. यानंतर पुढील काही आठवड्यात मुख्य सचिवांची उच्चाधिकार समिती व शेवटी मुख्यमंत्र्यांसमोर आराखड्याचे सादरीकरण होऊन पहिल्या टप्प्याला अंतिम मंजुरी मिळेल.

जोतिबा मंदिराच्या विकासासाठी १७०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, तो त्रुटींच्या पूर्ततेनंतर दोन महिन्यांपूर्वी शासनदरबारी पाठवण्यात आला होता. अधिवेशनापूर्वी पन्हाळ्यात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरण स्थापन करू, अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता शासन दरबारी हालचालींना वेग आला आहे. त्याचे पहिले पाऊल म्हणून बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत झालेल्या बैठकीत आराखड्याच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, अभियंता सुयश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जोतिबा आराखड्याचा पहिला टप्पा २७२ कोटींचा आहे. तर इतर विभागांचे म्हणजे रस्ते, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग अशा विविध विभागांशी संबंधित अभिसरणातील कामांचे २२७ कोटी अशा एकूण ५०० कोटींच्या आराखड्यात तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी जोतिबा आराखड्याचे सादरीकरण केले, तसेच आराखड्याबाबत असलेल्या शंकांचे निरसन केले.यानंतर पुढील काही आठवड्यांत हा आराखडा मुख्य सचिवांच्या उच्चाधिकार समितीकडे मान्यतेसाठी जाईल. त्यांची मंजुरी मिळाली की, मुख्यमंत्र्यांसमोर आराखडा सादर केला जाईल. त्यांची मंजुरी मिळाली की, तशी अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

पहिल्या टप्प्यातील विकासकामेडोंगरावरील सर्व ७ तलावांचे जतन संवर्धन व सुशोभीकरण, पार्किंग, केदारविजय बागेचे सुशोभीकरण, ॲम्पी थिएटर, डोंगरावर जाणाऱ्या चारही बाजूंच्या पायवाटा दुरुस्तीकरण, बसस्थानक, सांडपाणी व्यवस्थापन, पाणपोई, कम्युनिटी किचन, डॉर्मेटरी, सांस्कृतिक हॉल, स्वच्छतागृह.

पहिल्या दोन टप्प्यात स्थलांतर नाही..जोतिबा आराखड्याच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये डोंगराचे जतन, संवर्धन, मूलभूत सोयीसुविधा, सुशोभीकरणाचा समावेश असल्याने सुरुवातीला कोणत्याही प्रकारे नागरिकांचे स्थलांतर होणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba TempleजोतिबाGovernmentसरकार