शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

सूतगिरण्यांचा खडखडाट जुलैपासून थांबणार, सुताचे दर कमी असल्याने व्यवसाय आतबट्ट्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 16:13 IST

कापसाच्या दरात तिप्पट वाढ

राजाराम लोंढेकोल्हापूर : कापसाचे वाढलेले दर आणि त्या प्रमाणात सुताला न मिळणाऱ्या दरामुळे सुताचा व्यवसाय आर्थिक अरिष्टात सापडला आहे. त्यात राज्य सरकारच्या पातळीवर फारशी मदत मिळत नसल्याने हा व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील १६० सूतगिरण्या १ जुलैपासून बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने घेतला आहे.कोरोनानंतर सूत गिरण्यांना थोडे चांगले दिवस आले होते. मात्र, गेल्या वर्षापासून पुन्हा अडचणी येत असून, कापसाचे दर एक लाखाच्या पुढे गेले आणि त्या पटीत सुताला दर मिळेना. राज्यातील सर्वच सूतगिरण्या निम्म्याहून कमी क्षमतेने चालत आहेत. वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार थांबत नाहीत. तोटा वाढू लागल्याने सरकारने वेळीच मदत केली नाही तर १ जुलैपासून उत्पादन बंद करण्याचा इशारा वस्त्रोद्योग महामंडळाने सरकारला दिला आहे.

सोलर करा, पण तारण काय द्यायचे?सरकारने सूतगिरण्यांना सोलर प्रकल्प उभा करण्यास सांगितले असून, तो पूर्ण झाल्यानंतर सरकार अनुदान देणार आहे. सूतगिरण्यांच्या जमिनीवर अगोदरच बोजा असल्याने साेलरसाठी वित्तीय संस्था कर्ज कशा देणार? असा प्रश्न सूतगिरण्यांसमोर आहे.

कापसाच्या दरात तिप्पट वाढमागील दोन वर्षांत कापसाचा दर साधारणत: ३३ ते ४५ हजार रुपये ‘खंडी’ (३५६ किलो) वरून १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यात शेतकऱ्यांपेक्षा व्यापारीच अधिक फायदा मिळवत असून, यावर सरकारने नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

या आहेत सूतगिरण्यांच्या मागण्या  

  • खेळते भांडवल संपल्याने कर्जासाठी थकहमी द्यावी.
  • वीजबिलातील प्रति युनिट ३ रुपयांची सवलत कायम ठेवावी.
  • कापूस खरेदीसाठी अनुदान द्यावे.

सूतगिरण्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. याबाबत राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मंगळवारी बैठक होणार आहे. - अशोक स्वामी (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर