शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

Kolhapur: प्रतिष्ठा जाते लयाला, तरीही वरकमाईची हाव सुटेना; मुख्याध्यापकाच्या लाचेने शिक्षणातील अब्रू चव्हाट्यावर

By उद्धव गोडसे | Updated: April 18, 2025 17:24 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : लाच घेताना सापडल्यानंतर शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांची बेअब्रू होते. निलंबनाची कारवाई होऊन कुटुंबीयांना समाजात तोंड दाखवायला ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : लाच घेताना सापडल्यानंतर शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांची बेअब्रू होते. निलंबनाची कारवाई होऊन कुटुंबीयांना समाजात तोंड दाखवायला जागा उरत नाही. मिळवलेली प्रतिष्ठा लयाला जाते. तरीही वरकमाई करण्याची हाव सुटत नाही. सर्वच क्षेत्रांत लाचखोरी बोकाळल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत आहे. महापालिकेच्या शेलाजी वन्नाजी विद्यालयातील मुख्याध्यापकाने शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेतल्याने शिक्षण क्षेत्राची अब्रू चव्हाट्यावर आली.भौतिक सुविधांची न संपणारी हाव आणि सुखलोलुपता माणसांच्या गरजा वाढवत आहेत. समाधानाची वृत्ती हरवत चालल्याने कुठे थांबावे याच्या मर्यादाच उरल्या नाहीत. यातच वाढत्या महागाईने वरकमाईला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रांत लाचखोरी बोकाळली आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये शिपायांपासून ते क्लास वन अधिकाऱ्यांपर्यंत बऱ्याच जणांचा पगारापेक्षा वरकमाईवर डोळा असतो. त्यामुळेच नियमित होणारी कामेही अडवून ठेवली जातात. शासकीय कामांचे ठेके देणे, त्यांची बिले काढण्यातही हात ओले केले जातात. खासगी क्षेत्रही याला अपवाद राहिलेले नाही. खरेदी-विक्रीत ढपला मारणे, खोटी बिले तयार करणे यांसाठी आमिषे दाखवली जातात.

साडेतीन महिन्यांत नऊ सापळेगेल्या साडेतीन महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात नऊ सापळे रचून कारवाया केल्या. यात नऊ लोकसेवकांसह पाच खासगी एजंटना अटक केली. लाचखोरांच्या विरोधात तक्रारी करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नेहमीच केले जाते. मात्र, अजूनही तक्रारींचे प्रमाण कमी आहे.

ज्ञानमंदिरे डागाळलीशिक्षण आणि संस्कारांचे धडे देणाऱ्या शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांनाही लाचेची कीड लागली आहे. शिक्षकभरतीपासून पदोन्नती, पगारपत्रके तयार करणे, भत्ते, बिले काढणे अशा अनेक कामांमध्ये लाच घेतली जाते. विद्यापीठांमध्ये तर पीएच.डी.चे प्रबंध तपासून शेरा मारण्यासाठीही लाच घेतल्याची प्रकरणे घडली आहेत.

पैसे द्या, नाहीतर हेलपाटे माराकोणतेही सरकारी कार्यालय असो; तिथे पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, हे वास्तव आहे. मुख्यमंत्र्यांनी परवा कामाचा निपटारा व्हावा यासाठी १०० दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला होता; परंतु त्यामध्ये भ्रष्टाचारविरहित प्रशासन हा मुद्दा नव्हता.

खरे तर ही समाजाला लागलेली कीड आहे; परंतु त्याबद्दच सरकारी पातळीवर काही केले जात नाही. अनेकांना पैसे द्यायचे नसतात; परंतु ते दिले नाहीत तर मग कामासाठी हेलपाटे मारावे लागतात. तो मनस्ताप नको म्हणून लोक हतबल होतात. एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने प्राधिकरणाकडे रीतसर बांधकाम परवान्यासाठी फाइल सादर केली; परंतु मी पैसे देणार नाही यावर ते ठाम होते. दीड वर्षानंतर, ‘लोकमत’ने त्यांच्या विषयाला वाचा फोडल्यावर मगच त्यांना परवाना मिळाला!

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBribe Caseलाच प्रकरणEducation Sectorशिक्षण क्षेत्र