शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख, पोलिस अवघे २७००; कामाचा प्रचंड ताण 

By उद्धव गोडसे | Updated: December 18, 2023 13:21 IST

उद्धव गोडसे कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४२ लाख एवढी आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या २७०० पोलिसांकडे ...

उद्धव गोडसेकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ४२ लाख एवढी आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अवघ्या २७०० पोलिसांकडे आहे. वाढती गुन्हेगारी, मोर्चे, आंदोलने, अतिविशेष व्यक्तींचे दौरे आणि सततचे बंदोबस्त यामुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमालीचा वाढला आहे. परिणामी, त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यात दोन अधिकाऱ्यांना आलेले हृदयविकाराचे झटके हा त्याचाच परिणाम असल्याचे दिसत आहे.

पोलिसांचे काम आता पूर्वीसारखे निवांतपणाचे राहिले नाही. दहा ते बारा तासांची ड्युटी, पोलिस ठाण्यातील कामांचा वाढता ताण, प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करणे, कोर्टातील वाऱ्या, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे पोलिसांची मानसिक आणि शारीरिक कुचंबणा होत आहे. याचे परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत.गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात याची तीव्रता वाढली आहे. प्रलंबित गुन्ह्यांची निर्गत करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. यातच विविध प्रकारची आंदोलने, सण-समारंभ, मंत्र्यांचे दौरे, सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेजमुळे उद्भवणारे धार्मिक तणावाचे प्रसंग पोलिसांच्या कामात भर घालत आहेत. ऐनवेळी लागणाऱ्या कामांमुळे हातचे काम सोडून पोलिसांना पळावे लागले. परिणामी, मूळ कामे रखडत असल्याने वरिष्ठांची बोलणी खावी लागतात. वरिष्ठांना योग्य उत्तर दिले नाही तर कारवाईची टांगती तलवार असते, त्यामुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे.

निलंबनाची भीतीपोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून पोलिस दलातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्रुटी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही चौकशा लावल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण, आर्थिक गुन्हे अन्वेषण अशा महत्त्वाच्या शाखांमधील कर्मचाऱ्यांवर कारवाया केल्या आहेत. यामुळे वरिष्ठांच्या तावडीत सापडल्यास निलंबनाची कारवाई होऊ शकते, अशी भीती कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.

तणावाचे व्यवस्थापन आवश्यकमानसिक ताणतणावांचा परिणाम आरोग्यावर होऊ नये, यासाठी तणावाचे व्यवस्थापन करता येणे गरजेचे आहे. कोणत्या कामांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो किंवा वाढू शकतो याचा अंदाज घेऊन ती कामे प्राधान्याने आणि चोख पद्धतीने केली जावीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद आणि समन्वय ठेवून काम केल्यास तणाव कमी होतो, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ कालिदास पाटील यांनी दिला.

बंदोबस्त वाढलेसण-समारंभ, मंत्र्यांचे दौरे, जातीय दंगली, ऊस दर आंदोलन, आरक्षण मागणीची आंदोलने यामुळे पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्यात बरेच मनुष्यबळ अडकून पडते. काहीवेळा बाहेरच्या जिल्ह्यातही बंदोबस्तासाठी जावे लागते. याच पोलिसांना त्यांच्याकडील अन्य कामांचाही निपटारा करावा लागतो मात्र, त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यातच वरिष्ठांकडून दबाव वाढत राहतो, त्यामुळे पोलिसांची मानसिकता बिघडते.

असा करा ताण हलका

  • नियमित व्यायाम आणि आहाराकडे लक्ष द्या
  • वरिष्ठांचे आदेश आणि प्राधान्य क्रमानुसार कामांचे नियोजन करा
  • कामात चुका राहू नयेत, याची खबरदारी घ्यावी
  • अशक्य किंवा वेळ लागणाऱ्या कामांबद्दल स्पष्ट बोलावे
  • वरिष्ठ आणि सहकाऱ्यांसोबत संवाद असावा
  • कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवावे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस