शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

बाकीचे आता आलेले, त्यामुळे मंत्रिपद मलाच मिळणार; राजेश क्षीरसागर यांचा विश्वास

By विश्वास पाटील | Updated: November 28, 2024 23:37 IST

क्षीरसागर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला आहे...

कोल्हापूर : शिवसेना स्थापन झाल्यापासूनचा मी केडरमधील कार्यकर्ता आहे, बाकीचे आता आलेले आहेत. त्यामुळेच मलाच मंत्रिपद मिळेल असा विश्वास शिंदेसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे या पक्षात मंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र स्पष्ट झाले. पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळायला हवे असा दावा करून त्यांनी खळबळ उडवून दिली.क्षीरसागर म्हणाले, विधानसभा निवडणुकीत काॅमन मॅन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा चेहरा चालला, त्यामुळे महायुतीचा विजय झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी मोदी शहा यांनी घेतलेला निर्णय मान्य असेल सांगितल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग सुखकर झाला आहे. शिंदेसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मंत्रिपद मिळतील अशी खात्री आहे. १० पैकी १० जागा महायुतीच्या येणार हे मी आधी पासून म्हणत होतो. लोकसभेनंतर हिंदू देखील एकवटले आणि त्यांनी दाखवून दिले एकत्र आल्यावर हिंदू काय करू शकतो. जिल्ह्यात शिंदेसेनेचा १ खासदार ३ आमदार आणि २ पाठिंबा असलेले आमदार आहेत.ज्याचे जास्त आमदार त्याला पालकमंत्री पद फॉर्मुला आहे. मी ही तिसऱ्या टर्मचा आमदार आहे.. गेली पाच वर्ष नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष या मंत्री पदाच्या दर्जाचा कार्यभार व्यवस्थित सांभाळला आहे. मित्रा संस्थेच्या उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शाश्वत परिषदेसारख्या संकल्पनांद्वारे कोल्हापूर जिल्ह्यात विकासाची वाटचाल सुरू केली आहे. यामुळे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आम्ही आग्रही आहोत असा दावा आमदार क्षीरसागर यांनी केला आहे.

वास्तव काय..? शिंदेसेनेचे क्षीरसागर, प्रकाश आबिटकर आणि चंद्रदिप नरके हे आमदार झाले आहेत. त्यातील क्षीरसागर व नरके हे एकदा पराभूत होवून आता तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. आबिटकर यांनी हॅट्रटिक केली आहे. गेल्या निवडणूकीनंतरही त्यांचे नांव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले होते. पण ऐनवेळेला राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मध्येच मुसंडी मारल्याने आबिटकर राज्यमंत्रिपदापासून वंचित राहिले. यड्रावकर हे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे त्यांचेही नांव राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. पद एक आणि स्पर्धक चार अशी सध्या स्थिती आहे. त्यात कोण बाजी मारतो याची उत्सुकता आहे. कोल्हापूर शहराचे राजकारण, महापालिका निवडणूक आणि माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध यामुळे क्षीरसागर या स्पर्धेत पुढे असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना