शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या निम्म्या जागांवर ‘महाविकास’ आघाडीवर, शरद पवार यांनी विविध सर्वेक्षणांचा दिला दाखला

By विश्वास पाटील | Updated: February 21, 2024 14:16 IST

एकाबाजूला अबकी बार..चारसौ पार ची गॅरंटी दिली जात असतानाच त्याचवेळेला विविध पक्षांचे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत. कारण त्यांना लोकसभा निवडणूकीतील यशाबद्दल खात्री वाटत नाही.

कोल्हापूर : एकीकडे भाजप ४०० हून अधिक जागा जिंकण्याच्या घोषणा करीत असला तरी विविध वाहिन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील निम्म्या जागा महाविकास आघाडी जिंकेल, असे स्पष्ट चित्र समोर आले आहे. याचमुळे अपेक्षित यश मिळणार नसल्याच्या अस्वस्थेतूनच राज्यासह देशभरात भाजप फोडोफाेडीवर भर देत असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

ईडी, सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणांचा यासाठी वापर सुरू असून ‘मोदी है तो मुमकीन है’ असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला. कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले पवार रवाना होण्यापूर्वी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत इंडिया आघाडीची बैठक झालेली नाही. कारण त्या-त्या राज्यातील प्रमुख पक्ष आणि त्यांचे घटक पक्ष यांच्यात चर्चा सुरू आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला व्यक्तिश: फार आश्चर्य वाटले नाही. कारण श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणाचा उल्लेख आल्यानंतर त्यांना ती धमकावणी वाटली आणि त्यांनी निर्णय घेतला.भाजप सत्तेसाठी कशा पद्धतीने कोणत्या थराला जाऊन सत्तेचाच गैरवापर करतेय, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंदीगड महापालिकेचे आहे; परंतु कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना संपवायचे असे केंद्र सरकारचे धोरण दिसत आहे. पवार म्हणाले, पक्ष काढला मी आणि तो चिन्हासह दुसऱ्याच्या हातात देऊन टाकला. सात दिवसांत आम्हाला चिन्ह द्यावं, असं न्यायालयानं निवडणूक आयोगाला ताशेरे ओढून सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत शंकामराठा आरक्षणाच्या टिकण्याबाबत माझ्या मनात शंका आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी जे आरक्षण दिले होते ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. घटनातज्ज्ञ उल्हास बापटही हे आरक्षण टिकणार नाही म्हणत आहेत. त्यामुळे माझ्याही मनात शंका आहे.

सोडून गेलेले ९५ टक्के पराभूतमहाराष्ट्रात १९८० साली महाराष्ट्रात माझे ५९ आमदार निवडून आले होते. निवडणुकीनंतर मी १० दिवस परदेशात सुटीवर गेलो. परत आलो तर त्यातील ५३ जणांनी मला सोडले होते. त्यानंतर जे काय करायचं ते मी केलं. पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक झाली. त्यावेळी सोडून गेलेल्यांपैकी ९५ टक्के पराभूत झाले. इतिहासाची पुनरावृत्ती नेहमीच होत असते. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोण उभे राहणार आहे, हे अजून ‘त्यांनी’ जाहीर केलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तुरुंगापेक्षा भाजप बरा..काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. कारण भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांना धमकावण्यासाठीच तो उल्लेख केला होता. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा, असे आता लोकच म्हणून लागल्याची टीका पवार यांनी केली.

सुप्रिया लोकसभा लढवतेमुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी पवार यांची धडपड असल्याची टीका भाजप नेते अमित शाह करतात, पण सुप्रिया लोकसभेत काम करते हे त्यांना कदाचित माहीत नसावे, असा टोला त्यांनी लगावला. बारामती मतदारसंघातून चर्चा काहीही असली तरी अजून विरोधकांनी कुणाच्याही नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. ती करतील तेव्हा पाहू, असे सांगून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्नाला अनुलेखाने मारले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSharad Pawarशरद पवारBJPभाजपा