शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
5
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
6
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
7
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
8
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
9
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
10
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
11
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
12
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
13
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
14
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
15
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
16
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
17
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
18
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
19
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
20
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली धक्काबुक्की, तणावाचे वातावरण

By उद्धव गोडसे | Updated: November 20, 2024 20:12 IST

कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उप-शहरप्रमुख राहुल माळी याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही गटाचे ...

कोल्हापूर : कसबा बावडा येथे उद्धवसेनेचे उप-शहरप्रमुख राहुल माळी याला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. यानंतर दोन्ही गटाचे सुमारे एक हजार कार्यकर्ते आमने-सामने आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. आमदार सतेज पाटील यांनी समजूत काढत जमावाला शांत केले.

तसेच शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना दुसरीकडे जाण्याचे आवाहन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, टाकाळा, लोणार वसाहत, सदर बाजार येथे झालेल्या किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.उद्धवसेनेचे राहुल माळी (रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा) यांनी रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिल्याचा व्हिडिओ काही व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हायरल केला होता. याबाबत बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याला एका तरुणाने फोन करून धमकावले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास माळी हा भगवा चौकात आला असता, शिवसेनेचे कार्यकर्ते सुनील जाधव यांच्या कार्यालयासमोर पोहोचला. त्यावेळी जाधव आणि माळी यांनी एकमेकांना गद्दार, दुगल असे संबोधल्याने वादाला सुरुवात झाली. आदर्श सुनील जाधव याने माळी याची गळपट पकडून धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच कार्यकर्त्यांनी भगवा चौकात धाव घेऊन गर्दी केली. त्याचवेळी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी आलेले राजेश क्षीरसागर आणि सत्यजीत कदम हे भगवा चौकातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. जमावाने हॉटेलच्या बाहेर गर्दी करताच आमदार सतेज पाटील भगवा चौकात पोहोचले. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्याशी चर्चा करून क्षीरसागर आणि कदम यांना दुसरीकडे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार टिके यांच्या विनंतीनुसार क्षीरसागर आणि कदम निघून गेले.त्यानंतर आमदार पाटील यांनी संतप्त जमावाची समजूत काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर १० मिनिटे ठिय्या मारला. काही वेळाने कार्यकर्ते निघून गेले. मात्र, या घटनेने सुमारे तासभर कसबा बावडा येथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

अनर्थ टळलादत्त मंदिर कॉर्नर येथील बलभीम विद्यालयाजवळ तरुणांची गर्दी झाली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून क्षीरसागर आणि कदम हे सुनील जाधव आणि त्यांचा मुलगा आदर्श यांना आपल्या गाडीत घेऊन ते निघून गेले. काही तरुणांनी क्षीरसागर यांच्या गाडीचा पाठलाग केला. कवडे गल्लीच्या कोप-यावर गाडी थांबल्यानंतर जमावाने क्षीरसागर यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आमदार सतेज पाटील यांनी भगवा चौकात धाव घेऊन जमावाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे वळविल्याने अनर्थ टळला. 

प्रत्येक गोष्टीचा हिशोब करूमी राहुलच्या पाठीशी भक्कम आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा हिशोब करू, असे आमदार पाटील यांनी सांगताच तरुणांनी जल्लोष केला. संतप्त जमाव प्रचंड आक्रमक होता. वेळीच त्यांची समजूत घातली नसती तर अनर्थ विपरित घडले असते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024