शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
2
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
3
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
4
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
5
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
6
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
7
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!
8
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
9
Tarot Card: पुढच्या आठवड्यात येणार गणपती बाप्पा, कुठल्याही परिस्थितीत, तोच दाखवेल मार्ग सोप्पा
10
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
11
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
12
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
13
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
14
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
15
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
16
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
17
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
18
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
19
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
20
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं

दस्त नोंदणी वाढली, पण कार्यालये कमी होणार: कर्मचाऱ्यांवरील ताण वाढणार

By विश्वास पाटील | Updated: September 21, 2024 13:40 IST

स्वइमारतच नाही

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तांची संख्या वाढत असल्याचे मान्य करणाऱ्या राज्य सरकारने त्यासाठी नवीन कार्यालये सुरू करण्याऐवजी प्रत्येक कार्यालयाने दस्त नोंदणी करण्याच्या मानक संख्येत शुक्रवारी वाढ केली. शहरी भागातील जिथे ८ हजार वार्षिक दस्त होत होते त्यांनी आता १२ हजार दस्त नोंदणी करावी लागणार आहे. दस्ताची संख्या वाढल्यास काही कार्यालये बंद करावी लागतील अशी भीती कर्मचाऱ्यांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात किमान ८ हजार दस्तनोंदणीची संख्या शासन आदेशाने निश्चित केली. महसूल व वनविभागाने हा आदेश काढला आहे.वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतीच्या हस्तांतरणाच्या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यातील विविध दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे राज्य सरकारनेच या आदेशात मान्य केले आहे. कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात वर्षाला सरासरी ८ हजारांहून जास्त दस्त नोंदणी झाल्यास त्या कार्यक्षेत्रात नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची आवश्यकता असल्याने नवीन कार्यालयाची निर्मिती व त्यासाठीची आवश्यक पदनिर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत राज्याच्या विकासाचे चक्र मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या शहरांपुरतेच मर्यादित न राहता सगळीकडेच गतिमान झाले आहे. त्यामुळे दस्त संख्या वाढल्याने नागरिक, लोकप्रतिनिधींकडून नवीन कार्यालये सुरू करण्याची मागणी होत आहे. सरकारने त्या मागणीला फाट्यावर मारून पुन्हा आहे त्याच कार्यालयातील दस्त नोंदणीची संख्या मात्र वाढवली आहे. बहुतांशी कार्यालयात लिपिक संख्या कमी आहे. संगणक ऑपरेटरचे काम खासगी कंपनीकडे दिले आहे.

कोणते व्यवहार वाढले..?

  • खरेदी-विक्री
  • तारण गहाण खत
  • बक्षीस व मृत्युपत्र
  • वटमुखत्यारपत्र
  • विक्रीचा करार

स्वइमारतच नाहीराज्यातील बहुतांशी दुय्यम निबंधक कार्यालये खासगी जागेत आहेत. तिथे चांगल्या सुविधा नाहीत. एक व्यवहार असला तरी किमान आठ ते दहा लोक कार्यालयात येतात. त्यांना बसायला जागा नसते. एक व्यवहार होण्यासाठी सरासरी तासाचा वेळ लागतो. या सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला शासन तयार नाही.

  • राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालये : ५२०
  • वर्षाला सरासरी दस्त नोंदणी : प्रत्येकी ८०००
  • शहरी व ग्रामीण भागातही प्रत्यक्ष दस्त नोंदणी सोबतच्या ई-रजिस्ट्रेशन प्रणालीवर लिव्ह ॲण्ड लायसन्स व नोटीस इंटिमेशन फायलिंगच्या प्रमाणात वाढ. 
  • कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालये : एकूण १८
  • कोल्हापूर शहर : ०४
  • इचलकरंजी,कागल तालुका : प्रत्येकी : ०२
  • तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी : ०१
  • कोल्हापूर शहरातील चार, शिरोळ व हातकणंगलेमधील प्रत्येकी एक अशा सहा कार्यालयांतच सरासरी ८ हजार दस्त नोंदणी
  • इतर कार्यालयांत दस्त नोंदणी कमी.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार