शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न जास्त, लोकसभेचे उत्तर बनले अवघड; कोल्हापूर, हातकणंगलेत उमेदवार शोधताना राष्ट्रवादीची दमछाक

By विश्वास पाटील | Updated: July 24, 2022 08:14 IST

हातकणंगले मतदारसंघात तर राष्ट्रवादीला शून्यापासून सुरुवात करावी लागेल, अशी स्थिती

विश्वास पाटील

कोल्हापूर : राजकीय संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्या प्रश्नांची यादी मोठी असल्यानेच कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा पर्याय शोधणे राष्ट्रवादीला अवघड जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांना तयारीला लागा दोन्ही मतदारसंघांत उमेदवारांचा शोध घ्या, असे आदेश दिले आहेत; परंतु सध्यातरी या कोल्हापूर मतदारसंघात पक्षाकडे लढण्यासाठी स्वत: मुश्रीफ सोडल्यास दुसरे तगडे नावच नाही. हातकणंगले मतदारसंघात तर राष्ट्रवादीला शून्यापासून सुरुवात करावी लागेल, अशी स्थिती आहे. माजी खासदार संभाजीराजे हा एक चांगला पर्याय होता पण राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी व त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाली आहे. ती कितपत सांधते यावर पुढील घडामोडी अवलंबून असतील.

दोन्ही जागांवर कोण उमेदवार असावेत, जिल्ह्याच्या राजकारणाचा पुरोगामी ढाचा कायम राहण्यासाठी कोण उमेदवार उपयुक्त ठरू शकेल यासाठीची पडद्याआडची मोर्चेबांधणी मात्र सुरू झाली आहे. राजकीय चित्र थोडे स्पष्ट झाल्यावर या घडामोडी आकार घेतील असे चित्र दिसते. दोन्ही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीने या दोन्ही जागा लढवण्याची मानसिकता सुरू केली आहे. खरे तर एकेकाळी कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता.

पक्षाचे २००४ ला दोन्ही खासदारांसह तीन आमदार होते; परंतु २००९ ला लोकसभेच्या दोन्ही जागांवर पराभव झाला. पुन्हा २०१४ ला कोल्हापूरची जागा जिंकली; पण २०१९ ला दोन्ही जागा शिवसेनेने काढून घेतल्या. आता पक्षाचे दोनच आमदार आहेत. हातकणंगले मतदारसंघातील शिराळा व वाळव्यात पक्षाचे आमदार आहेत; परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी व शाहूवाडीमध्ये पक्षाचे अस्तित्व शोधावे लागते. त्यामुळे एकवेळ कोल्हापुरात ताकदीचा उमेदवार देणे शक्य आहे; परंतु हातकणंगलेमध्ये पुन्हा माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी जुळवून घ्यावे लागेल किंवा नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल.

लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करायला किंवा उमेदवार म्हणून नावे निश्चित करायलाही मर्यादा यामुळेच येत आहेत की या निवडणुकीसाठी अजून तब्बल दोन वर्षांचा अवधी आहे. त्यापूर्वी जिल्ह्यात जिल्हा परिषद, कोल्हापूर महापालिका, नगरपालिका, काही साखर कारखाने यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तिथे कोण कुणाची सोबत करतो यालाही महत्त्व आहे. सध्याच्या घडीला दोन्ही काँग्रेस एका बाजूला दिसत आहेत. शिवसेनेचा संघर्ष शिवेसेनेशीच सुरू आहे. तो यापुढेही राहणार अशीच स्थिती आहे. भाजप पुन्हा सत्तेत आल्याने कार्यकर्ते चार्ज झाले आहेत, हे खरे असले तरी त्यांनाही शिंदे गटाचे ओझे पुन्हा आपल्या मानगुटीवर पडणार का, ही धास्ती आहे.

महाडिक घराणे पूर्णांशाने भाजपवासी झाले आहे, शिवाय भाजपने अगोदरच आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे यांना सोबत घेतले आहे. आता खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र यड्रावकर व आमदार प्रकाश आबिटकर यांची नव्याने भर पडली आहे. यांच्यामुळे मूळ पक्षाची ताकद या गटांना मिळणाऱ्या संधीमध्ये विभागणार आहे. असे झाले की पक्षाची जरूर ताकद वाढते; पण हाडाचे कार्यकर्ते बाजूला फेकले जातात व नव्याने आलेले सत्तेची फळे चाखतात असेच घडते. जे शिवसेनेत अनुभवायला आले. संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी गळ्यात उपरणे टाकून मोर्चेच काढायचे व मंडलिक-माने यांनी खासदार व्हायचे अशातला व्यवहार होतो.

संभ्रमावस्था निर्माण करणारे प्रश्न असे :१.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयात १ ऑगस्टला स्वतंत्र घटनापीठापुढे सुनावणी होणार आहे. त्याचा निर्णय काय लागतो हे महत्त्वाचे आहे.

२.मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळणार का आणि ते धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार का, यालाही महत्त्व आहे.

३.मुख्यमंत्री शिंदे यांचा गट आगामी लोकसभेला भाजपसोबत युती करून लढणार आहे का?

४.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहणार की मुख्यमंत्र्यांचा गट व शिवसेना एकत्र येऊन भाजपसोबत त्यांची आघाडी होणार.

५.लोकसभेच्या दोन्ही जागा भाजप शिंदे गटाला देण्यास तयार होईल का? ते भाजपच्या कार्यकर्त्यांना रुचेल का?

६.माजी मुख्यमंत्री ठाकरे हे जरी महाविकास आघाडीसोबत राहिले तरी जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेनेलाच मिळणार, की कोल्हापूरच्या जागेवर राष्ट्रवादी हक्क सांगणार?

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारHasan Mushrifहसन मुश्रीफSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती