शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
2
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
3
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
4
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
5
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
6
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
7
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
8
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
9
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
10
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
11
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
12
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
13
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 
14
एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
15
“५१ वर्षे ठाकरेंशी प्रामाणिक अन् एका क्षणात...”; बड्या नेत्याचा उद्धवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
16
VIDEO: घोडा बनला 'डान्सिंग स्टार' !! 'राणा' घोड्याचा अफलातून डान्स, सारेच होताहेत अवाक्
17
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
18
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
19
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
20
बापरे! लांब निमूळती सुंदर नखं फॅशन नाही तर भयानक 'बॅक्टेरियाचं घर'; जेवताना पोटात जाते घाण आणि..

काळा दिन: सीमाभागातील मराठी बांधवांनी निर्णायक लढ्यासाठी तयार रहावे, प्रा अच्युत मानेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 15:48 IST

लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत.

निपाणी : गेल्या साठ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सीमाभागातील मराठी भाषिक अन्याय सहन करत आहे. लोकशाही मार्गाने व शांततेच्या मार्गाने करत असलेल्या आंदोलनाला कर्नाटक पोलीस मात्र दडपशाहीची भूमिका घेत आहेत. यामुळे आता सीमाभागातील मराठी भाषिकांनी निर्णायक लढ्याची तयारी ठेवण्याची गरज आहे. त्याचबरोबर या पुढचा लढा हा अधिक सक्षमपणे लढण्यात यावा यासाठी मराठी भाषिकांनी व नवीन पिढीने यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. अच्युत माने यांनी केले.निपाणी भाग मराठीकरण समिती, शिवसेना. म ए युवा समिती व समस्त मराठी भाषकांच्यावतीने निपाणी येथे काळा दिनानिमित्त निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.  यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर म ए समितीचे जयराम मिरजकर, प्रा एन आय खोत, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबासाहेब खांबे, युवा समिती कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, प्रा भारत पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.माने पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नाचा हा लढा सर्वाधिक जुना व कायदेशीर व न्यायालयीन मार्गाने लढला जात आहे. या साठ वर्षाच्या काळात कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकप्रतिनिधींकडून आश्वासनांची खैरात केली जाते. यापलीकडे सीमा वासियांसाठी काही केले जात नाही. आज निपाणी पोलीस प्रशासन मराठी भाषिकांवर दडपशाही करत आहे. यापूर्वी रस्त्यावरील लढाईला परवानगी होती.  आता बंद दाराआड चळवळीची सभा घेतली जात आहे. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशा धमक्या हे प्रशासन देत आहे. यामुळे आता मराठी भाषिकांनी याचा विचार करून संघर्ष केला पाहिजे.जयराम मिरजकर म्हणाले की, भाषावर प्रांत रचना होताना बहुसंख्य मराठी भाषिक असलेला हा भाग मात्र कर्नाटकात डांबण्यात आला. पण आता न्यायालयाच्या अंतिम प्रक्रियेत हा प्रश्न असल्याने लवकरच हा प्रश्न सुटणार आहे. निपाणी येथील प्रशासन व्यापारी व मराठी भाषिकांवर दबाव आणत आहे. हे प्रशासनाने न करता आमचा आंदोलन करण्याचा घटनेने दिलेला हक्क येथील मराठी भाषिकांना द्यायला पाहिजे.बाबासाहेब खांबे म्हणाले की, एक नोव्हेंबर रोजी परंपरेने काळा दिन पाळून रस्त्यावर आंदोलन करण्याची आमची तयारी होती पण पोलीस प्रशासनाने आदल्या दिवशी उशिरा रात्रीपर्यंत आम्हाला परवानगी नाकारली. रस्त्यावर उतरला तर अटक करू अशी धमकी दिली व त्याचबरोबर वारंवार विनंती केल्यानंतर बंद दाराआड निषेध करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला नवनाथ चव्हाण, स्वरूप परीट, नंदकुमार कांबळे, बाबासाहेब मगदूम, प्रकाश इंगवले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहिले होते. रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे...या कार्यक्रमात रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे... निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटक