शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

परीक्षा उत्तीर्ण होऊनही सीमा भागातील विद्यार्थी अपात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 12:51 IST

बेळगावचा मराठी भाषक प्रदेश आमचाच आहे आणि येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा घोषणा महाराष्ट्रातील नेते वारंवार करत असतात; पण येथील विद्यार्थ्यांवर मात्र महाराष्ट्राकडून नेहमीच अन्याय

निपाणी : बेळगाव सीमा भागातील ८६५ गावांवर महाराष्ट्र शासनाने दावा दाखल करून या संपूर्ण गावांचे पालकत्व घेण्याची घोषणा केली होती. बेळगावचा मराठी भाषक प्रदेश आमचाच आहे आणि येथील नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा घोषणा महाराष्ट्रातील नेते वारंवार करत असतात; पण येथील विद्यार्थ्यांवर मात्र महाराष्ट्राकडून नेहमीच अन्याय होत असल्याचे दिसत आले आहे. याची पुन्हा प्रचीती गुरुवारी आली. कोडणी तालुका निपाणी येथील विद्यार्थी सनमकुमार पंडित माने यांंना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व, मुख्य व शारीरिक चाचणी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या निर्णयाने सीमा भागातील मराठी भाषकांत नाराजी पसरली आहे.२०२० साली वृत्तपत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. जाहिरातीमध्ये कारवार, बीदर व बेळगाव या जिल्ह्यांतील परीक्षार्थी जात प्रवर्गासहित अर्ज दाखल करू शकत होते. यानुसार सनमकुमार माने यांनी मागास प्रवर्गातून अर्ज केला. आयोगाची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी त्यांना यशदा पुणे येथे मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते; पण याठिकाणी कागदपत्रांची तपासणी केली असता महाराष्ट्र राज्याचा जातीचा दाखला नसल्याचे कारण सांगत सनमकुमार माने यांना मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले.

पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही अशा पद्धतीने सीमा भागातील विद्यार्थ्याला अपात्र ठरवणे हा सीमा भागातील विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा अन्याय असल्याची भावना मराठी भाषकांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षाinterviewमुलाखत