शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

दगडफेकीतील ४०० संशयितांवर गुन्हे, ३६ अटकेत; कोल्हापूर बंदला लागले होते हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:34 IST

शहर पूर्वपदावर, अपर पोलिस महासंचालकांकडून शहराची पाहणी

कोल्हापूर : सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेज आणि स्टेटसच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी बुधवारी (दि. ७) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने शहरात दंगल उसळली. दगडफेक करून नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात ४०० संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी ३६ जणांना अटक केली. तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी (दि. ८) शहरातील दंगलग्रस्त परिसराची पाहणी केली.शहरात ठिकठिकाणी दगडफेक करून दंगलखोरांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. विशिष्ट समाजाची घरे, दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करून एकूण सुमारे ४०० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमावबंदीचे उल्लंघन करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जमावाला चिथावणी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून पोलिसांनी ३६ संशयितांना अटक केली. सर्व संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.तोडफोडीच्या ३० तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. दंगलीत सुमारे ३० रिक्षा, १० कार, ४० दुकाने, १८ दुचाकी, चिकनच्या दोन गाड्या, फळांच्या आठ हातगाड्या आणि एका चहाच्या गाडीचे सुमारे सहा लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. तक्रारींचा ओघ अजूनही सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. राज्याचे गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.अटकेतील संशयित

  • लक्ष्मीपुरी - १७
  • जुना राजवाडा - १६
  • शाहूपुरी - ३
  • अल्पवयीन ताब्यात - ३

१९ ते २५ वयोगटातील तरुणांचा तोडफोडीत समावेश

तोडफोडीच्या घटनांमध्ये बहुतांश तरुण १९ ते २५ वयोगटातील होते. अटकेतही याच वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. सर्व तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांचे शिक्षण १२ वी ते पदवीपर्यंत झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.तरुणांचे नातेवाईक हवालदिलअटकेतील तरुणांचे नातेवाईक गुरुवारी दिवसभर पोलिस ठाण्यांच्या बाहेर थांबून होते. आपल्या मुलाने दगडफेक केल्याचे त्यांना पटतच नव्हते. तरुणांना बुधवारी शिवाजी चौकात बोलवणाऱ्या नेत्यांपैकी एकही नेता गुरुवारी मुलांच्या जामिनासाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर