शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दगडफेकीतील ४०० संशयितांवर गुन्हे, ३६ अटकेत; कोल्हापूर बंदला लागले होते हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:34 IST

शहर पूर्वपदावर, अपर पोलिस महासंचालकांकडून शहराची पाहणी

कोल्हापूर : सोशल मीडियातील आक्षेपार्ह मेसेज आणि स्टेटसच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी बुधवारी (दि. ७) पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने शहरात दंगल उसळली. दगडफेक करून नागरिकांच्या मालमत्तांचे नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात ४०० संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी ३६ जणांना अटक केली. तीन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी (दि. ८) शहरातील दंगलग्रस्त परिसराची पाहणी केली.शहरात ठिकठिकाणी दगडफेक करून दंगलखोरांनी प्रचंड दहशत निर्माण केली होती. विशिष्ट समाजाची घरे, दुकाने आणि वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल करून एकूण सुमारे ४०० संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जमावबंदीचे उल्लंघन करणे, मालमत्तांचे नुकसान करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, जमावाला चिथावणी देणे अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून पोलिसांनी ३६ संशयितांना अटक केली. सर्व संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.तोडफोडीच्या ३० तक्रारी पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. दंगलीत सुमारे ३० रिक्षा, १० कार, ४० दुकाने, १८ दुचाकी, चिकनच्या दोन गाड्या, फळांच्या आठ हातगाड्या आणि एका चहाच्या गाडीचे सुमारे सहा लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. तक्रारींचा ओघ अजूनही सुरू असून, नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. राज्याचे गृह विभागातील कायदा सुव्यवस्था विभागाचे अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी गुरुवारी शहरातील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली.अटकेतील संशयित

  • लक्ष्मीपुरी - १७
  • जुना राजवाडा - १६
  • शाहूपुरी - ३
  • अल्पवयीन ताब्यात - ३

१९ ते २५ वयोगटातील तरुणांचा तोडफोडीत समावेश

तोडफोडीच्या घटनांमध्ये बहुतांश तरुण १९ ते २५ वयोगटातील होते. अटकेतही याच वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. सर्व तरुण सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांचे शिक्षण १२ वी ते पदवीपर्यंत झाले आहे. अनेक तरुण बेरोजगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.तरुणांचे नातेवाईक हवालदिलअटकेतील तरुणांचे नातेवाईक गुरुवारी दिवसभर पोलिस ठाण्यांच्या बाहेर थांबून होते. आपल्या मुलाने दगडफेक केल्याचे त्यांना पटतच नव्हते. तरुणांना बुधवारी शिवाजी चौकात बोलवणाऱ्या नेत्यांपैकी एकही नेता गुरुवारी मुलांच्या जामिनासाठी प्रयत्न करताना दिसला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर