शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
2
Kolhapur Mahadevi Elephant : अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
3
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
4
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
5
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
6
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
7
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
8
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
9
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
10
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
11
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
12
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
13
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
14
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
15
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
16
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...
17
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
18
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
19
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
20
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी

..त्यावेळी महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा हेतू होता, मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

By समीर देशपांडे | Updated: November 3, 2022 18:44 IST

बच्चू कडू आणि रवि राणा यांच्यातील वादाबाबत केसरकर म्हणाले, ..तर निर्णय घ्यावा लागेल

कोल्हापूर : आम्ही जेव्हा पक्षातून बाहेर पडलो त्या परिस्थितीचा गैरफायदा घेवून राज्यात दंगली घडवण्याचा अनेकांचा हेतू होता असा गौप्यस्फोट शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.         केसरकर म्हणाले, या दरम्यान आम्ही जी मनापासून भूमिका मांडली, आमच्यावर झालेला अन्याय मांडला, वस्तुस्थिती सांगितली त्यावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला म्हणून दंगली झाल्या नाहीत. पुढे ते म्हणाले, आमच्यावर १०० वेळा तेच तेच खोटे बोलून आरोप करणाऱ्यांचे ढोंग लवकरच उघडकीस आणणार आहे.जेव्हा आम्ही बाहेर पडलो. त्यावरून खूप आरोप केले जात आहेत. जे आमच्या पक्षात नव्हते असेही काहीजण वाट्टेल ते घरबंध सोडून बोलत आहेत. छोट्या छोटया गोष्टींचे भांडवल केले जात आहे. ज्या चुकीच्या गोष्टींना हे जबाबदार आहेत त्याची उलट जबाबदारी आमच्यावर ढकलली जात आहे. म्हणूनच वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर आणणार आहे. कारण आम्ही पक्ष सोडताना नेमकी काय वस्तुस्थिती होती हे पुन्हा एकदा सर्व महाराष्ट्राला समजले पाहिजे.पार्टी म्हणून निर्णय घ्यावा लागेलबच्चू कडू आणि रवि राणा यांच्यातील वादाबाबत केसरकर म्हणाले, तडजोड केल्यानंतर जर त्याचा सन्मान राखला जात नसेल तर पार्टी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. तो अधिकार माझा नाही. सुषमा अंधारे यांच्याबद्दल आदर आहे. परंतू त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही असेही केसरकर म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDipak Kesarkarदीपक केसरकर