शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पुराची पातळी वाढणार, पाणी नाकातोंडात जाणार; ठेकेदाराच्या मग्रुरीला ‘राष्ट्रीय महामार्ग’ची संमती 

By राजाराम लोंढे | Updated: March 12, 2025 16:00 IST

शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारीत

राजाराम लोंढेकोल्हापूर : बालिंगे पुलाच्या पश्चिमेकडे दहा फुटाने मातीचा भराव घातल्याने पुराच्या पाण्याची उंची ७ फुटाने वाढणार आहे. ही उंची वाढत असताना त्यापेक्षा चार पटीने पाणी विस्तारणार असून, तेवढी घरे आणि जमीन पाण्याखाली जाणार आहे. संपूर्ण गावेच विस्थापित होणार असून, राष्ट्रीय महामार्गाने भरावात घातलेल्या मातीबरोबर पुराचे पाणीही शेतकऱ्यांच्या नाकातोंडात जाणार आहे. करवीर व पन्हाळा तालुक्यांतील शेतकरी जेल भरो आंदोलनाच्या तयारी आहेत.ठेकेदार बड्या माजी केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय असल्याने तो ग्रामस्थांना दाद देत नाही.रस्त्याच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी आहेत. राष्ट्रीय महामार्ग म्हणता, मग त्याच्या निकषानुसार रस्ता झाला का? बालिंगे ते खांडसरी दरम्यान शिवतेज ढाब्याजवळ तर रस्ता चक्क एकपाकी केला आहे. सोयीनुसार बाजूपट्ट्यांची रुंदी ठेवली आहे. पुढे रस्ता सुरू असतानाच मागे रस्ता उखडला आहे. बालिंगेकडील बाजूला तर आरसीसीची भिंत उभी केल्याने पाणी तुंबून ते बालिंगे गावात घुसणार आहे.

एकीकडे रस्त्याचा दर्जा सुमार असताना पुलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले जात आहे. आताच पन्नास गावे निम्मी स्थलांतरित करावी लागतात. जुलैनंतर ‘कुंभी’, ‘राधानगरी’, ‘तुळशी’, ‘कोदे’ ही धरणे भरली की त्यातून विसर्ग वाढतो. त्यात लहरी हवामानामुळे एकाच दिवशी गगनबावड्यासारख्या ठिकाणी १०० ते १५० मिलिमीटर पाऊस पडतो. अशा वेळी भोगावतीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग खूप वेगाने होतो. तो बालिंगे पुलातून त्याच गतीने पुढे सरकला नाहीतर मागील गावांना जलसमाधीच मिळणार आहे.कोगे पुलाच्या भराव्याने तुंबी वाढलीचार-पाच वर्षांपूर्वी कोगे (ता. करवीर) येथे कुंभी नदीवर पूल बांधताना पिलर कमी करून मातीचा भराव टाकला, तेव्हापासून करवीर व पन्हाळा तालुक्यांतील गावांत पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. आता, बालिंगे पुलाच्या भराव्याने ग्रामस्थांच्या नाकातोंडात पाणी जाणार आहे.

खासदार साहेब, जरा लक्ष द्यामहामार्ग कामाच्या दर्जासह मातीच्या भराव्याबाबत गेले तीन-चार महिने नागरिक व शेतकरी टाहो फोडत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभाग दखल घेईना आणि ठेकेदार जुमानत नाही. महापुराने गावांना जलसमाधी मिळाल्यानंतर सांत्वनासाठी लोकप्रतिनिधी येणार का? खासदार साहेब, जरा लक्ष द्या, असा संताप जनतेतून व्यक्त होत आहे.बाजूपट्ट्यांवर व्यावसायिकांचे फलकबालिंगे ते कळेपर्यंत या मार्गावर हॉटेलसह इतर व्यावसायिक आहेत. अगोदरच काँक्रिटीकरणाच्या बाजूपट्ट्याला लागून गटर्स केली आहेत. व्यावसायिकांचे फलक बाजूपट्ट्यांवर असल्याने रस्ता एकेरीच सुरू राहतो. त्यात मध्यभागी दुभाजक नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.पाटबंधारेने ‘एनओसी’ दिली कशी?बालिंगे ते दोनवडे फाटा येथपर्यंत पुराच्या काळात सात फुटाने पाणी वाहते. प्रतिसेकंद किती घनफूट पाण्याचा विसर्ग त्यावेळी हाेतो, याची माहिती पाटबंधारे विभागाकडे आहे. ढिगाऱ्यामुळे तेवढे पाणी थांबून मागे दाबत नेणार आहे. मग, महामार्ग विभागाने ‘पाटबंधारे’ची ‘एनओसी’ घेतली का आणि कशी दिली? अशीही विचारणा होत आहे.

२०२१ च्या महापुरात बाधित कुटुंबेतालुका  - २०२१ बाधित - नवीन रस्त्यामुळे संभाव्य बाधितकरवीर  - ४५००  - ७७००पन्हाळा  -  १६००  - २५५०

अगोदरच कळे आणि कोगे पुलांच्या भराव्यामुळे गावे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. या पुलामुळे तर शेतकरी उद्ध्वस्तच होणार आहे. हा भराव काढून तेथून संपूर्ण पिलरचा पूल उभा करावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावरची लढाई करावी लागेल. - बाळासाहेब खाडे (संचालक, गोकुळ)रस्ता व पुलाचे काम नागरिकांच्या सोयीसाठी नव्हे, गैरसोयीसाठीच आहे. पुलाचे पिलर व मोऱ्यांची संख्या कमी करून सरकार पैसे वाचवत आहे. पण, दरवर्षी या भराव्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी जे पैसे द्यावे लागतील, तेवढे आताच खर्ची केले तर मनस्ताप कमी होईल. - बाबासाहेब देवकर (माजी सदस्य, जिल्हा परिषद) 

दोन्ही बाजूला आरसीसी भिंत घालून भराव टाकल्याने पन्नास-साठ गावे विस्थापित होणार आहेत. ठेकेदार व महामार्ग विभागाला जनतेचा आक्राेश समजत नाही, पालकमंत्र्यांनी यावर मार्ग काढला तर ठीक, अन्यथा जनआंदोलन उभा करू. - अमर पाटील (शिंगणापूरकर)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गfloodपूर