शहरं
Join us  
Trending Stories
1
भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
2
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
3
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
4
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
5
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
6
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
7
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
8
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
9
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
10
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
11
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
12
SMAT 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचं आणखी एक विक्रमी शतक! महाराष्ट्र संघाविरुद्ध तळपली बॅट
13
पहिल्या दिवशीच जोरदार आपटला; शेअर बाजारात उतरताच 'धडाम'; १२१ रुपयांचा शेअर आला ७३ वर
14
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
15
HCL Tech-एअरटेलसह 'या' ५ कंपन्या देणार मोठा परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस
16
"सॉरी पप्पा, 'त्या' मुलीनं माझ्या भावनांचा खेळ केला..."; २६ वर्षीय युवकानं केला आयुष्याचा शेवट
17
जग हादरलं! भीषण पाणी टंचाईमुळे 'या' देशाची राजधानी रिकामी करावी लागणार? दीड कोटी जनतेवर होणार परिणाम!
18
आमदार संतोष बांगरांनी नियम बसवले धाब्यावर; महिलेला बटन दाबण्यास सांगितले, मोबाईल घेऊन केंद्रात गेले
19
"मला iPhone 17 Pro Max हवाय"; तरुणाचा भाजपा खासदाराला फोन, मजेदार ऑडिओ व्हायरल
20
Bus Fire: ट्रकला धडकल्यानंतर बस पेटली; ३ जणांचा होरपळून मृत्यू, २३ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने डोळे दिपले अन् घात झाला, दुचाकीवरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:22 IST

आता मुलींच्या शिक्षणाचीच चिंता!

राम मगदूम

गडहिंग्लज : झिरमीट पावसात दुचाकीवरून घरी जाताना समोरून आलेल्या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले अन् घात झाला. दुचाकीवरून पडलेल्या  कष्टाळू शेतकऱ्याचा दुर्देवी अंत झाला. रूद्रगोंडा बाबूराव पाटील (वय ४८, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) असे त्यांचे नाव आहे.हकीकत अशी, रूद्रगोंडा हे प्रयोगशील शेतकरी. घरची शेती स्वत:च कसण्याबरोबरच इतरांची शेती त्यांनी खंडाणे कसायला घेतली आहे. ऊस, भातासह भाजीपाला उत्पादन व दुभत्या जनावरांवरच संसाराचा गाडा ओढत होते. दरम्यान, त्यांना हर्षदा उर्फ किर्ती व दुर्वा अशा दोन मुली झाल्या. मात्र, मुलगा-मुलगी भेद न करता त्यांना चांगले शिकवायचे, स्वत:च्या पायावर उभे करायचे असा चंगच  त्यांनी बांधला. मुलीदेखील हुशार असल्यामुळे खाजगी अकॅडमीत घालून त्यांची नवोदय प्रवेशाची तयारी करून घेण्याचा निर्णय घेतला.किर्तीला कागलच्या नवोदय विद्यालयात पाचवीला प्रवेश मिळाला होता. नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली आहे. दुर्वादेखील नवोदयची तयारी करीत असून किर्तीच्या अकरावी प्रवेशासाठी ते दुचाकीवरून कागलला गेले होते. परंतु, घरी परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन !रूद्रगोंडा यांनी बारावीनंतर कांहीवर्षे कोल्हापूरच्या एमआयडीसीत नोकरी केली. मात्र, लग्नानंतर ते शेतीतच रमले. सेंद्रीय शेतीचा प्रयोगही केला. भाजीपाला, कांदा उत्पादनात त्यांचा हातखंडा होता. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करीत होते.

लवकरच पोचतो, काळजी नको !जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करून दुपारनंतर ते कागलला गेले होते. उशीर झाल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास वडीलांनी फोन केला असता निपाणीच्या पुढे आलोय लवकरच पोहचतो, काळजी करू नका, असे त्याने सांगितले. परंतु, साडेदहाच्या सुमारास गडहिंग्लज-आजरा महामार्गावरील बेळगुंदीनजीकच्या वळणावर दुचाकीवरून पडलेल्यामुळे ते बेशुद्ध झाले. छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना  उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

आता मुलींच्या शिक्षणाचीच चिंता!रूद्रगोंडा यांचे आईवडील वयोवृद्ध आहेत. तुटपुंज्या शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी भारती यांना आता मुलींच्या शिक्षणाचीच काळजी लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू