शहरं
Join us  
Trending Stories
1
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
2
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
3
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
4
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
5
बुलेट ट्रेनचं देशातील पहिलं रेल्वे स्टेशन बांधून तयार, या दोन स्थानकांदरम्यान धावणार पहिली ट्रेन
6
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
7
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
8
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
9
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?
10
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
11
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
12
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
13
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
14
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
15
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
16
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
17
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
18
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
19
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
20
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 

Kolhapur: समोरील वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने डोळे दिपले अन् घात झाला, दुचाकीवरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:22 IST

आता मुलींच्या शिक्षणाचीच चिंता!

राम मगदूम

गडहिंग्लज : झिरमीट पावसात दुचाकीवरून घरी जाताना समोरून आलेल्या वाहनाच्या हेडलाईटच्या प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले अन् घात झाला. दुचाकीवरून पडलेल्या  कष्टाळू शेतकऱ्याचा दुर्देवी अंत झाला. रूद्रगोंडा बाबूराव पाटील (वय ४८, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) असे त्यांचे नाव आहे.हकीकत अशी, रूद्रगोंडा हे प्रयोगशील शेतकरी. घरची शेती स्वत:च कसण्याबरोबरच इतरांची शेती त्यांनी खंडाणे कसायला घेतली आहे. ऊस, भातासह भाजीपाला उत्पादन व दुभत्या जनावरांवरच संसाराचा गाडा ओढत होते. दरम्यान, त्यांना हर्षदा उर्फ किर्ती व दुर्वा अशा दोन मुली झाल्या. मात्र, मुलगा-मुलगी भेद न करता त्यांना चांगले शिकवायचे, स्वत:च्या पायावर उभे करायचे असा चंगच  त्यांनी बांधला. मुलीदेखील हुशार असल्यामुळे खाजगी अकॅडमीत घालून त्यांची नवोदय प्रवेशाची तयारी करून घेण्याचा निर्णय घेतला.किर्तीला कागलच्या नवोदय विद्यालयात पाचवीला प्रवेश मिळाला होता. नुकतीच ती दहावी उत्तीर्ण झाली आहे. दुर्वादेखील नवोदयची तयारी करीत असून किर्तीच्या अकरावी प्रवेशासाठी ते दुचाकीवरून कागलला गेले होते. परंतु, घरी परतताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, बहिण, दोन भाऊ असा परिवार आहे. गडहिंग्लज पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.

अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन !रूद्रगोंडा यांनी बारावीनंतर कांहीवर्षे कोल्हापूरच्या एमआयडीसीत नोकरी केली. मात्र, लग्नानंतर ते शेतीतच रमले. सेंद्रीय शेतीचा प्रयोगही केला. भाजीपाला, कांदा उत्पादनात त्यांचा हातखंडा होता. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करीत होते.

लवकरच पोचतो, काळजी नको !जनावरांच्या चारापाण्याची व्यवस्था करून दुपारनंतर ते कागलला गेले होते. उशीर झाल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास वडीलांनी फोन केला असता निपाणीच्या पुढे आलोय लवकरच पोहचतो, काळजी करू नका, असे त्याने सांगितले. परंतु, साडेदहाच्या सुमारास गडहिंग्लज-आजरा महामार्गावरील बेळगुंदीनजीकच्या वळणावर दुचाकीवरून पडलेल्यामुळे ते बेशुद्ध झाले. छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना  उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

आता मुलींच्या शिक्षणाचीच चिंता!रूद्रगोंडा यांचे आईवडील वयोवृद्ध आहेत. तुटपुंज्या शेतीशिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नी भारती यांना आता मुलींच्या शिक्षणाचीच काळजी लागली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू