शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

..मात्र आजही अनेकांना आपल्या ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइल नंबर तोंडपाठ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 19:04 IST

स्मार्टफोन, मोबाइल आल्यापासून अनेकांची तोंडी आकडेमोड, मोबाइल आणि दूरध्वनी नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली

कोल्हापूर : स्मार्टफोन, मोबाइल आल्यापासून अनेकांची तोंडी आकडेमोड, मोबाइल आणि दूरध्वनी नंबर लक्षात ठेवण्याची सवय मोडली आहे. मात्र, आपल्या आयुष्यातील ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइलनंबर मात्र, बहुतांश जणांना तोंडपाठ आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने रविवारी कोल्हापुरात एक छोटासा सर्व्हे केला. त्यात दहापैकी आठ जणांना त्यांच्या व्हॅलेंटाइनचा मोबाईल नंबर पाठ असल्याचे दिसून आले.सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाजातील प्रत्येक घटकांतील अनेकांकडे स्मार्ट फोन आहेत. रोज विविध स्वरूपांतील आकडेमोड करणे, वेळ जाणून घेणे, मोबाइल अथवा दूरध्वनी क्रमांक नोंद करून ठेवण्यासाठी सर्रासपणे स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे बहुतांश जण त्यांच्या संपर्कात असणाऱ्या अधिकतर जणांचे मोबाइल नंबर पाठ करण्याऐवजी सेव्ह करून ठेवतात. या स्थितीत आपल्या ‘व्हॅलेंटाइन’चा मोबाइल नंबर मात्र, अनेकांना अगदी तोंडपाठ आहेत.

‘लोकमत’ जनता बझार चौकात

राजारामपुरीतील जनता बझार चौकात ‘लोकमत’ने मोबाइल नंबर तोंडपाठाबाबतचा छोटासा सर्व्हे केला. काही युवक-युवतींशी मोबाइलवरून संपर्क साधण्यात आला. त्यातील दहापैकी आठ जणांनी मोबाइल नंबर तोंडपाठ असल्याचे सांगितले. अवघ्या काही सेकंदात त्यांनी नंबरही सांगितला. एका ३० वर्षीय तरुणाने मोबाइल नंबरमधील शेवटचे दोन अंक आठवत नाहीत, पण स्मार्ट फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये ‘फेव्हरेट’ म्हणून नंबर सेव्ह असल्याचे सांगितले. दुसऱ्या एका २६ वर्षीय युवकाने नंबर पाठ नसल्याचे सांगितले.आम्ही कोणाला हे प्रश्न विचारले?वय वर्षे २६ ते ३६ वयोगटांतील दहा जणांना मोबाइल नंबर तोंडपाठबाबत ‘लोकमत’ने विचारणा केली. त्यात पाच पुरुष, तर पाच महिला होत्या. व्यावसायिक, नोकरदार, इंजिनीअर, इव्हेंट व्यवस्थापक या क्षेत्रातील पुरुष होते. गृहिणी, नोकरदार, आर्किटेक्ट, झुंबा प्रशिक्षक म्हणून काम करणाऱ्या महिला होत्या.

आई-वडील, बेस्ट फ्रेंडचा नंबर पाठ

या सर्व दहा जणांना त्यांचे आई-वडील, बेस्ट फ्रेंडचा नंबर तोंडपाठ आहे. त्यांनी अगदी शाळेपासून असलेल्या मित्र-मैत्रिणींचे नंबर सांगितले. 

स्मार्ट फोनमधील डाटा स्टोरेज करून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने मोबाइल नंबर त्यामध्ये सेव्ह केला जातो. काहींना नंबर पाठ करण्याची गरज वाटत नाही. मात्र, ज्यांना मोबाइलनंबर तोंडपाठ आहेत. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे. - डॉ.निखिल चौगुले, मानसोपचार तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMobileमोबाइल