शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'भटक्या विमुक्त' विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला सरकारचाच खो; शासनाचे नवे निकष अडचणीचे

By संदीप आडनाईक | Updated: September 10, 2024 13:53 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : भटक्या विमुक्त ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या योजनेचा लाभ दिल्याची जाहिरात राज्य सरकारने ...

संदीप आडनाईककोल्हापूर : भटक्या विमुक्त ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या योजनेचा लाभ दिल्याची जाहिरात राज्य सरकारने केली. दुसरीकडे शासन आदेशातील अटीनुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच नाही याचीही तजवीज केली आहे. यामुळे मोठ्या मेहनतीने इयत्ता दहावी पार केलेल्या या समाजातील उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या दुसऱ्या पिढीच्या वाटेत सरकारनेच कोलदांडा घातला आहे. वसतिगृहातील प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण व ६० टक्के गुण ही अट विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत आहे.राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील ३६ जिल्ह्यांत १०० मुले आणि १०० मुली अशी विद्यार्थी संख्या असणारी वसतिगृहे सुरू केली. तेथे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी शिक्षण, वास्तुकला शिक्षण तसेच तत्सम महाविद्यालयातून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारने ज्या प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या, या दोन्ही योजनांमध्ये दहावीनंतर शिक्षण घेणारे विद्यार्थीच विविध शासन आदेशानुसार वंचित ठेवले आहेत.खऱ्या अर्थाने या योजनांचे लाभ त्यांना मिळू नयेत असेच निकष, अटी आणि शर्ती या आदेशात आहेत. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दि. ११ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार प्रवेशासाठी घातलेले निकषच मारक ठरत आहेत. यात पदविका शिक्षण घेणाऱ्या दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांचा विचारच केलेला नाही.

मी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आहे. कोल्हापुरातील एका संस्थेत पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला, परंतु मला वसतिगृहाचा लाभ मिळू शकत नाही. उच्च शिक्षण घेऊ इच्छितो परंतु शासकीय योजनेसाठी मला अपात्र ठरवलेले आहे. -अविनाश वायफळकर, पंढरपूर, डवरी समाज. 

भटके विमुक्त ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडण्याऐवजी पुन्हा त्यांना गुलामगिरीत ढकलण्याचाच हा प्रकार आहे. एकीकडे दिले असे दाखवायचे, त्याची जाहिरात करायची, परंतु दुसरीकडे शासन आदेश काढून त्याचा लाभ मिळणार नाही याची तजवीज करून राज्य सरकार त्यांच्या पुढच्या पिढीचे शिक्षणच बंद करत आहे. -दिगंबर लोहार, राज्य संघटक, ओबीसी बहुजन पार्टी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षणGovernmentसरकार