शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

'भटक्या विमुक्त' विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला सरकारचाच खो; शासनाचे नवे निकष अडचणीचे

By संदीप आडनाईक | Updated: September 10, 2024 13:53 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : भटक्या विमुक्त ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या योजनेचा लाभ दिल्याची जाहिरात राज्य सरकारने ...

संदीप आडनाईककोल्हापूर : भटक्या विमुक्त ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या योजनेचा लाभ दिल्याची जाहिरात राज्य सरकारने केली. दुसरीकडे शासन आदेशातील अटीनुसार त्यांना या योजनेचा लाभ मिळणारच नाही याचीही तजवीज केली आहे. यामुळे मोठ्या मेहनतीने इयत्ता दहावी पार केलेल्या या समाजातील उच्च शिक्षणाकडे वाटचाल करणाऱ्या दुसऱ्या पिढीच्या वाटेत सरकारनेच कोलदांडा घातला आहे. वसतिगृहातील प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण व ६० टक्के गुण ही अट विद्यार्थ्यांना अडचणीची ठरत आहे.राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राज्यातील ३६ जिल्ह्यांत १०० मुले आणि १०० मुली अशी विद्यार्थी संख्या असणारी वसतिगृहे सुरू केली. तेथे प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवाय तांत्रिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, फार्मसी शिक्षण, वास्तुकला शिक्षण तसेच तत्सम महाविद्यालयातून ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्य सरकारने ज्या प्रोत्साहनपर योजना जाहीर केल्या, या दोन्ही योजनांमध्ये दहावीनंतर शिक्षण घेणारे विद्यार्थीच विविध शासन आदेशानुसार वंचित ठेवले आहेत.खऱ्या अर्थाने या योजनांचे लाभ त्यांना मिळू नयेत असेच निकष, अटी आणि शर्ती या आदेशात आहेत. इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दि. ११ मार्च २०२४ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार प्रवेशासाठी घातलेले निकषच मारक ठरत आहेत. यात पदविका शिक्षण घेणाऱ्या दहावीनंतरच्या विद्यार्थ्यांचा विचारच केलेला नाही.

मी दहावी उत्तीर्ण विद्यार्थी आहे. कोल्हापुरातील एका संस्थेत पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला, परंतु मला वसतिगृहाचा लाभ मिळू शकत नाही. उच्च शिक्षण घेऊ इच्छितो परंतु शासकीय योजनेसाठी मला अपात्र ठरवलेले आहे. -अविनाश वायफळकर, पंढरपूर, डवरी समाज. 

भटके विमुक्त ओबीसी विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे उघडण्याऐवजी पुन्हा त्यांना गुलामगिरीत ढकलण्याचाच हा प्रकार आहे. एकीकडे दिले असे दाखवायचे, त्याची जाहिरात करायची, परंतु दुसरीकडे शासन आदेश काढून त्याचा लाभ मिळणार नाही याची तजवीज करून राज्य सरकार त्यांच्या पुढच्या पिढीचे शिक्षणच बंद करत आहे. -दिगंबर लोहार, राज्य संघटक, ओबीसी बहुजन पार्टी.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षणGovernmentसरकार