शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आगामी विधानसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, 'या' मतदारसंघांची होऊ शकते अदलाबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 17:28 IST

महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढण्याचा तिन्ही पक्षांचा ठाम निर्धार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. सध्या तरी जागा वाटप आणि संभाव्य उमेदवार यांची महाविकास आघाडीकडून चाचपणी सुरू झाली आहे. तिन्ही पक्ष आपापल्या पातळीवर सर्वेक्षण करून जागावाटपावर चर्चा करणार आहेत. एक-दोन जागा इकडे-तिकडे होतील; पण महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे लढण्याचा तिन्ही पक्षांचा ठाम निर्धार आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच महाविकास आघाडीची बैठक मुंबईत पार पडली. त्यामध्ये एकत्रित लढण्यावर आणि मतदार संघाचे सर्वेक्षण करून जागावाटपासंदर्भात चर्चा करण्याचे ठरले आहे. जेव्हा आघाडी होत असते तेव्हा ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे आमदार आहेत, ती जागा त्या पक्षाला सोडण्याचा; तसेच जेथे घटक पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर असतो ती जागा त्या पक्षाला दिली जाते, हा एक राजकीय संकेत आहे.हाच न्याय यंदा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी लावला गेला तर काँग्रेस पक्षाला चार, ‘उबाठा’ला तीन व राष्ट्रवादीला तीन जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्ह्यात चार आमदार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचा एक, जनसुराज्य पक्षाचा एक, तर अपक्ष दोन असे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसला चार जागा सोडाव्याच लागणार आहेत; मात्र काँग्रेसला कोल्हापूर किंवा राधानगरी यापैकी एक मतदारसंघ घ्यावा लागेल. राष्ट्रवादीला तीन, तर ‘उबाठा’ तीन मतदारसंघ मिळायला पाहिजेत. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार दोन-तीन जागांची अदलाबदल करावी लागणार आहे.

आघाडीबाबत योग्य खबरदारी : पाटील

  • महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्यावर आम्ही तिन्ही पक्ष ठाम आहोत; परंतु कोण किती जागा लढविणार याची जाहीर चर्चा होणार नाही. वाद वाढणार नाहीत, याची खबरदारी आम्ही घेतली आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
  • तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेतील. त्यामुळे काँग्रेस अमुक जागा लढणार, राष्ट्रवादी, उबाठा अमुक जागा लढणार याला आता काही अर्थ नाही; मात्र एक नक्की आहे की, महाविकास आघाडीकडून नव्यांना संधी मिळेल. सभागृहात देखील नवीन टीम दिसेल, असे पाटील यांनी सांगितले.
  • सांगलीच्या निवडणुकीवरून झालेले समज, गैरसमज बाजूला केले जातीत. राज्यात महायुतीची सत्ता येणे हेच तिन्ही पक्षांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे वाद घालत न बसता एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मतदारसंघ - सध्याचा पक्ष - संभाव्य पक्षइचलकरंजी - अपक्ष - राष्ट्रवादीशिरोळ - अपक्ष - उबाठाशाहूवाडी - जनसुराज्य - उबाठाहातकणंगले - काँग्रेस - काँग्रेसकोल्हापूर उत्तर - काँग्रेस - काँग्रेस किंवा उबाठाकोल्हापूर दक्षिण - काँग्रेस - काँग्रेसकरवीर - काँग्रेस - काँग्रेस - काँग्रेसकागल - राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रवादी किंवा उबाठाराधानगरी - शिवसेना - उबाठा किंवा काँग्रेसचंदगड - राष्ट्रवादी काँग्रेस - राष्ट्रवादी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी