शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

वनविभागाकडे पुरेशी रोपेच नाहीत, १० कोटी झाडं लावणार तरी कशी?

By समीर देशपांडे | Updated: June 16, 2025 18:01 IST

लहान रोपे लावून नाही फायदा, कसा पूर्ण होणार वायदा

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यात १० कोटी झाडे लावण्याची घोषणा मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसा शासन आदेशही महसूल आणि वन विभागाने ११ जून रोजी काढला आहे. परंतु, यावर्षी इतकी झाडे लावण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी रोपेच उपलब्ध नसल्याचे वास्तव याच शासन आदेशात मांडण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळतील ती रोपे लावून उद्दिष्टपूर्ती झाली तरी अशी झाडे जगणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय वननीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना सध्या महाराष्ट्रात २१.२५ टक्के वनआच्छादन आहे. त्यामुळेच ४ जून रोजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.याआधी तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शतकोटी वृक्षलागवडीची घोषणा केली होती. परंतु, ती तितकशी यशस्वी झाली नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. अनेक शासकीय कार्यालयांच्या दारात लावलेली झाडे केवळ दुर्लक्षामुळे मरून गेल्याचे नंतर दिसून आले. आता शासनाने राज्यातील २६ विभागांना १० टक्के जादा यानुसार ११ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.परंतु, वनविभागाकडे पुरेशी रोपे नसल्याने आता खासगी नर्सरीमधून ही रोपे खरेदी करावी लागणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने रोपे लागणार असल्याने साहजिकच सरसकट रोप खरेदी केली जाणार असून, यामध्ये अधिक वयाची झाडे नसतील तर साहजिकच त्यांचे मरण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे झाडे लावल्याची नोंद होईल, परंतू जगली किती, हा महत्त्वाचा प्रश्न उरणार आहे.

कर्नाटक पॅटर्न आवश्यककर्नाटक शासन याचे दरवर्षी नियोजन करून पाच, सहा फुटांच्याच रोपांची लागवड करते. त्यामुळे जनावरे खाण्यापासून त्यांचा बचाव होतो आणि रोपे जगण्याचे तेथील प्रमाण अधिक आहे. याचे अनुकरण महाराष्ट्रात होण्याची गरज आहे.

शासनाने मोठ्या घोषणा करण्यापेक्षा एकच कोटी झाडे दरवर्षी लावावीत. परंतु, ती मोठी लावावीत आणि ती जगवून दाखवावीत. नाही तर केवळ हे वृक्षारोपण कागदाेपत्री राहील. याआधीही असा प्रकार अनेक वेळा झाला आहे. शासनाची प्रामाणिक भूमिका असेल, तर गडबड न करता एक धोरण ठरवण्यात यावे. - डॉ. मधुकर बाचूळकर वनस्पीतज्ज्ञ, कोल्हापूर