शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

वनविभागाकडे पुरेशी रोपेच नाहीत, १० कोटी झाडं लावणार तरी कशी?

By समीर देशपांडे | Updated: June 16, 2025 18:01 IST

लहान रोपे लावून नाही फायदा, कसा पूर्ण होणार वायदा

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यात १० कोटी झाडे लावण्याची घोषणा मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसा शासन आदेशही महसूल आणि वन विभागाने ११ जून रोजी काढला आहे. परंतु, यावर्षी इतकी झाडे लावण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी रोपेच उपलब्ध नसल्याचे वास्तव याच शासन आदेशात मांडण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळतील ती रोपे लावून उद्दिष्टपूर्ती झाली तरी अशी झाडे जगणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राष्ट्रीय वननीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक असताना सध्या महाराष्ट्रात २१.२५ टक्के वनआच्छादन आहे. त्यामुळेच ४ जून रोजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही योजना जाहीर करण्यात आली आहे.याआधी तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शतकोटी वृक्षलागवडीची घोषणा केली होती. परंतु, ती तितकशी यशस्वी झाली नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. अनेक शासकीय कार्यालयांच्या दारात लावलेली झाडे केवळ दुर्लक्षामुळे मरून गेल्याचे नंतर दिसून आले. आता शासनाने राज्यातील २६ विभागांना १० टक्के जादा यानुसार ११ कोटी झाडे लावण्याचे उद्दिष्ट दिले आहे.परंतु, वनविभागाकडे पुरेशी रोपे नसल्याने आता खासगी नर्सरीमधून ही रोपे खरेदी करावी लागणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने रोपे लागणार असल्याने साहजिकच सरसकट रोप खरेदी केली जाणार असून, यामध्ये अधिक वयाची झाडे नसतील तर साहजिकच त्यांचे मरण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे झाडे लावल्याची नोंद होईल, परंतू जगली किती, हा महत्त्वाचा प्रश्न उरणार आहे.

कर्नाटक पॅटर्न आवश्यककर्नाटक शासन याचे दरवर्षी नियोजन करून पाच, सहा फुटांच्याच रोपांची लागवड करते. त्यामुळे जनावरे खाण्यापासून त्यांचा बचाव होतो आणि रोपे जगण्याचे तेथील प्रमाण अधिक आहे. याचे अनुकरण महाराष्ट्रात होण्याची गरज आहे.

शासनाने मोठ्या घोषणा करण्यापेक्षा एकच कोटी झाडे दरवर्षी लावावीत. परंतु, ती मोठी लावावीत आणि ती जगवून दाखवावीत. नाही तर केवळ हे वृक्षारोपण कागदाेपत्री राहील. याआधीही असा प्रकार अनेक वेळा झाला आहे. शासनाची प्रामाणिक भूमिका असेल, तर गडबड न करता एक धोरण ठरवण्यात यावे. - डॉ. मधुकर बाचूळकर वनस्पीतज्ज्ञ, कोल्हापूर