शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

धनगरवाड्यांवरील लोकांची पायपीट कमी होणार, सोईसुविधांसह रोजगार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 10:39 IST

सेवा निलयंम फाउंडेशनचा उपक्रम

इंदुमती गणेश

कोल्हापूर : राधानगरी, शाहुवाडीसारख्या दुर्गम भागातील धनगरवाडे म्हणजे साधी काडेपेटी आणायची असेल, तरी ६ किलोमीटरची पायपीट... दळण आणणे, किराणा माल, वस्तूंची दुरुस्ती कोणतेही काम असो, दूरवरचा प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही, पण ही पायपीट आता कमी होणार आहे... येथील नागरिकांसाठी वाड्यांवरच किराणा मालाचे दुकान, गिरणी, वस्तूंची विक्री व दुरुस्ती केंद्र सुरू करून रोजगारनिर्मिती केली जाणार आहे. सेवा निलयंम फाउंडेशन या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेली सेवा निलयंम ही संस्था जिथे कमी तिथे आम्ही या उद्देशाने विशेषत: प्रामुख्याने दुर्गम भागातील वाड्यावस्त्या, वंचितांसाठी काम करते. सन २०१९ साली आलेल्या महापुरातील नागरिकांना वाचवायचे असो किंवा कोरोना आपत्तीच्या काळात रोज २०० लोकांना जेवण पुरवायचे असो, सॅनिटायझर, मास्क, औषधे धान्याचे किट घरपोच करायचे असो, दिवाळीचे साहित्य भेट देणे अशा कामांसाठी संस्था कायम लोकांच्या मदतीला पुढे येते.

राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली किंवा रातांबीचा येथील धनगरवाडे असो किंवा शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात आजही धनगरवाड्यांवरील नागरिकांचे हाल संपलेले नाही. आयुष्य सगळे तेथेच खर्ची घातलेले लोक गावठाणात येऊन राहायला तयार नसतात. हे वाडे गावापासून इतके दूर असतात की, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या असल्या, तरी त्यांना किमान पाच-सहा किलोमीटर चालत यावे लागते. या ठिकाणी अजूनही रस्त्यांची सोय नाही. पावसाळ्यात या वाड्यांचा गावांशी संपर्कही तुटतो. गुडघाभर चिखल आणि पावसाने दैना उडविलेली असते. त्यांचा हा जगण्याचा संघर्ष कमी कसा करता येईल, यासाठी सेवा निलयंम फाउंडेशन सातत्याने काम करते. दळणाची सोय व्हावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी आटाचक्की(गिरण) देण्यात आली. त्यामुळे महिलांचा त्रास कमी झाला. त्याचप्रमाणे, पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने धनगरवाड्यांवरील लोकांसाठी रोजगार निर्मिती करून दिली जाणार आहे. सगळ्यांना सोईस्कर पडेल, अशा ठिकाणी किराणा मालाचे दुकान सुरू करून देणे, गिरण सुरू करणे, सायकल दुरुस्तीचे साहित्य देणे असे लघुउद्योग सुरू करून दिले जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर