शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

धनगरवाड्यांवरील लोकांची पायपीट कमी होणार, सोईसुविधांसह रोजगार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 10:39 IST

सेवा निलयंम फाउंडेशनचा उपक्रम

इंदुमती गणेश

कोल्हापूर : राधानगरी, शाहुवाडीसारख्या दुर्गम भागातील धनगरवाडे म्हणजे साधी काडेपेटी आणायची असेल, तरी ६ किलोमीटरची पायपीट... दळण आणणे, किराणा माल, वस्तूंची दुरुस्ती कोणतेही काम असो, दूरवरचा प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही, पण ही पायपीट आता कमी होणार आहे... येथील नागरिकांसाठी वाड्यांवरच किराणा मालाचे दुकान, गिरणी, वस्तूंची विक्री व दुरुस्ती केंद्र सुरू करून रोजगारनिर्मिती केली जाणार आहे. सेवा निलयंम फाउंडेशन या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेली सेवा निलयंम ही संस्था जिथे कमी तिथे आम्ही या उद्देशाने विशेषत: प्रामुख्याने दुर्गम भागातील वाड्यावस्त्या, वंचितांसाठी काम करते. सन २०१९ साली आलेल्या महापुरातील नागरिकांना वाचवायचे असो किंवा कोरोना आपत्तीच्या काळात रोज २०० लोकांना जेवण पुरवायचे असो, सॅनिटायझर, मास्क, औषधे धान्याचे किट घरपोच करायचे असो, दिवाळीचे साहित्य भेट देणे अशा कामांसाठी संस्था कायम लोकांच्या मदतीला पुढे येते.

राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली किंवा रातांबीचा येथील धनगरवाडे असो किंवा शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात आजही धनगरवाड्यांवरील नागरिकांचे हाल संपलेले नाही. आयुष्य सगळे तेथेच खर्ची घातलेले लोक गावठाणात येऊन राहायला तयार नसतात. हे वाडे गावापासून इतके दूर असतात की, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या असल्या, तरी त्यांना किमान पाच-सहा किलोमीटर चालत यावे लागते. या ठिकाणी अजूनही रस्त्यांची सोय नाही. पावसाळ्यात या वाड्यांचा गावांशी संपर्कही तुटतो. गुडघाभर चिखल आणि पावसाने दैना उडविलेली असते. त्यांचा हा जगण्याचा संघर्ष कमी कसा करता येईल, यासाठी सेवा निलयंम फाउंडेशन सातत्याने काम करते. दळणाची सोय व्हावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी आटाचक्की(गिरण) देण्यात आली. त्यामुळे महिलांचा त्रास कमी झाला. त्याचप्रमाणे, पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने धनगरवाड्यांवरील लोकांसाठी रोजगार निर्मिती करून दिली जाणार आहे. सगळ्यांना सोईस्कर पडेल, अशा ठिकाणी किराणा मालाचे दुकान सुरू करून देणे, गिरण सुरू करणे, सायकल दुरुस्तीचे साहित्य देणे असे लघुउद्योग सुरू करून दिले जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर