शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

धनगरवाड्यांवरील लोकांची पायपीट कमी होणार, सोईसुविधांसह रोजगार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 10:39 IST

सेवा निलयंम फाउंडेशनचा उपक्रम

इंदुमती गणेश

कोल्हापूर : राधानगरी, शाहुवाडीसारख्या दुर्गम भागातील धनगरवाडे म्हणजे साधी काडेपेटी आणायची असेल, तरी ६ किलोमीटरची पायपीट... दळण आणणे, किराणा माल, वस्तूंची दुरुस्ती कोणतेही काम असो, दूरवरचा प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही, पण ही पायपीट आता कमी होणार आहे... येथील नागरिकांसाठी वाड्यांवरच किराणा मालाचे दुकान, गिरणी, वस्तूंची विक्री व दुरुस्ती केंद्र सुरू करून रोजगारनिर्मिती केली जाणार आहे. सेवा निलयंम फाउंडेशन या संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गेल्या चार वर्षांपासून कार्यरत असलेली सेवा निलयंम ही संस्था जिथे कमी तिथे आम्ही या उद्देशाने विशेषत: प्रामुख्याने दुर्गम भागातील वाड्यावस्त्या, वंचितांसाठी काम करते. सन २०१९ साली आलेल्या महापुरातील नागरिकांना वाचवायचे असो किंवा कोरोना आपत्तीच्या काळात रोज २०० लोकांना जेवण पुरवायचे असो, सॅनिटायझर, मास्क, औषधे धान्याचे किट घरपोच करायचे असो, दिवाळीचे साहित्य भेट देणे अशा कामांसाठी संस्था कायम लोकांच्या मदतीला पुढे येते.

राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली किंवा रातांबीचा येथील धनगरवाडे असो किंवा शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम भागात आजही धनगरवाड्यांवरील नागरिकांचे हाल संपलेले नाही. आयुष्य सगळे तेथेच खर्ची घातलेले लोक गावठाणात येऊन राहायला तयार नसतात. हे वाडे गावापासून इतके दूर असतात की, दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करायच्या असल्या, तरी त्यांना किमान पाच-सहा किलोमीटर चालत यावे लागते. या ठिकाणी अजूनही रस्त्यांची सोय नाही. पावसाळ्यात या वाड्यांचा गावांशी संपर्कही तुटतो. गुडघाभर चिखल आणि पावसाने दैना उडविलेली असते. त्यांचा हा जगण्याचा संघर्ष कमी कसा करता येईल, यासाठी सेवा निलयंम फाउंडेशन सातत्याने काम करते. दळणाची सोय व्हावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी आटाचक्की(गिरण) देण्यात आली. त्यामुळे महिलांचा त्रास कमी झाला. त्याचप्रमाणे, पुढील वर्षात टप्प्याटप्प्याने धनगरवाड्यांवरील लोकांसाठी रोजगार निर्मिती करून दिली जाणार आहे. सगळ्यांना सोईस्कर पडेल, अशा ठिकाणी किराणा मालाचे दुकान सुरू करून देणे, गिरण सुरू करणे, सायकल दुरुस्तीचे साहित्य देणे असे लघुउद्योग सुरू करून दिले जाणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर