शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून, बावडेकर आखाडा होता केंद्रस्थानी 

By संदीप आडनाईक | Updated: August 16, 2024 11:51 IST

भूमिगत सैनिकांना मिळे आसरा

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्य मिळून आज भारताला ७८ वर्षे पूर्ण झाली; परंतु त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि ठिकाणांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कोल्हापुरातही १९२४ पासूनच स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडली होती. या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार शिवाजी पेठेतून निघाला. येथील पंत अमात्य बावडेकर आखाडा या चळवळीच्या केंद्रस्थानी होता. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे ते आश्रयस्थान ठरले.

महात्मा गांधी यांची चळवळ १९२४ मध्ये सुरू झाली. याचे पहिले सत्याग्रही गोपाळ मेथे होते. कोल्हापुरात चरखा संघ आणि खादी उत्पादन संघ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वदेशी चळवळ, परदेशी कापडाची होळी, झेंडा सत्याग्रह अशी चळवळ सुरू झाली. त्यात कटकोळे, कट्टी आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते. १९२७ मध्ये महात्मा गांधी कोल्हापुरात आले. त्यांनी तपोवन येथे चरखा संघाच्या इमारतीची पायाभरणी केली.यावेळी सत्यशोधक चळवळीतील वासुदेवराव तोफखाने, गोपाळ मेथे, खंडेराव बागल, कटकोळ आदी कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत आले. १९३९ मध्ये भाई माधवराव बागल यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, त्यात माधवराव भोसले सहभागी झाले होते. ते शिवाजी पेठेतील. त्यांच्यामुळे अनेक सहकारी या चळवळीत ओढले गेले. तेथेच राष्ट्रसेवा दलाची शाखा त्यांनी सुरू केली.बावडेकर वाड्याच्या पलीकडील झाडीत चळवळीतील ज्येष्ठांच्या सभा व्हायच्या. पहिलवान भीमराव जाधव, श्रीराम चिंचलीकर, हरिभाऊ धर्माधिकारी, नाना धर्माधिकारी, प्रभाकर कोरगावकर येत. पुढे बावडेकर तालीम, वरुणतीर्थ तलावाच्या पश्चिमेस साळोखे हे शारीरिक शिक्षण आणि बौद्धिक घेऊ लागले. उभा मारुती चौकात श्रीपती चव्हाण, पत्नी बायनाबाई चव्हाण, मुलगी सुशीलाबाई, निवृती आडूरकर सूत कातत असत.कोल्हापूरसह सातारा, सांगली, तसेच अन्य जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होऊन पंत अमात्य बावडेकर आखाड्यात मुक्कामाला असायचे. या तालमीतूनच संदेश दिले जायचे. बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जायची.

पहिली प्रभातफेरी पेठेत१९४१ मध्ये महायुद्ध झाले. सैन्यात भरती करण्यासाठी ब्रिटिश प्रचार करत होते. त्याला विद्यार्थी संघटनांचा विरोध होता. कोल्हापुरात बापू पाटील यांनी प्रभात फेरी काढण्याची जबाबदारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यावर सोपवली. ३० जानेवारी आणि १४ नोव्हेंबरला पहिली प्रभात फेरी निघाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन