शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार कोल्हापुरातील शिवाजी पेठेतून, बावडेकर आखाडा होता केंद्रस्थानी 

By संदीप आडनाईक | Updated: August 16, 2024 11:51 IST

भूमिगत सैनिकांना मिळे आसरा

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्य मिळून आज भारताला ७८ वर्षे पूर्ण झाली; परंतु त्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि ठिकाणांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. कोल्हापुरातही १९२४ पासूनच स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी पडली होती. या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला हुंकार शिवाजी पेठेतून निघाला. येथील पंत अमात्य बावडेकर आखाडा या चळवळीच्या केंद्रस्थानी होता. अनेक भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांचे ते आश्रयस्थान ठरले.

महात्मा गांधी यांची चळवळ १९२४ मध्ये सुरू झाली. याचे पहिले सत्याग्रही गोपाळ मेथे होते. कोल्हापुरात चरखा संघ आणि खादी उत्पादन संघ स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. स्वदेशी चळवळ, परदेशी कापडाची होळी, झेंडा सत्याग्रह अशी चळवळ सुरू झाली. त्यात कटकोळे, कट्टी आणि इतर कार्यकर्ते सहभागी होते. १९२७ मध्ये महात्मा गांधी कोल्हापुरात आले. त्यांनी तपोवन येथे चरखा संघाच्या इमारतीची पायाभरणी केली.यावेळी सत्यशोधक चळवळीतील वासुदेवराव तोफखाने, गोपाळ मेथे, खंडेराव बागल, कटकोळ आदी कार्यकर्ते राष्ट्रीय चळवळीत आले. १९३९ मध्ये भाई माधवराव बागल यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला, त्यात माधवराव भोसले सहभागी झाले होते. ते शिवाजी पेठेतील. त्यांच्यामुळे अनेक सहकारी या चळवळीत ओढले गेले. तेथेच राष्ट्रसेवा दलाची शाखा त्यांनी सुरू केली.बावडेकर वाड्याच्या पलीकडील झाडीत चळवळीतील ज्येष्ठांच्या सभा व्हायच्या. पहिलवान भीमराव जाधव, श्रीराम चिंचलीकर, हरिभाऊ धर्माधिकारी, नाना धर्माधिकारी, प्रभाकर कोरगावकर येत. पुढे बावडेकर तालीम, वरुणतीर्थ तलावाच्या पश्चिमेस साळोखे हे शारीरिक शिक्षण आणि बौद्धिक घेऊ लागले. उभा मारुती चौकात श्रीपती चव्हाण, पत्नी बायनाबाई चव्हाण, मुलगी सुशीलाबाई, निवृती आडूरकर सूत कातत असत.कोल्हापूरसह सातारा, सांगली, तसेच अन्य जिल्ह्यांतील स्वातंत्र्यसैनिक भूमिगत होऊन पंत अमात्य बावडेकर आखाड्यात मुक्कामाला असायचे. या तालमीतूनच संदेश दिले जायचे. बैठकीतून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जायची.

पहिली प्रभातफेरी पेठेत१९४१ मध्ये महायुद्ध झाले. सैन्यात भरती करण्यासाठी ब्रिटिश प्रचार करत होते. त्याला विद्यार्थी संघटनांचा विरोध होता. कोल्हापुरात बापू पाटील यांनी प्रभात फेरी काढण्याची जबाबदारी अण्णासाहेब चव्हाण यांच्यावर सोपवली. ३० जानेवारी आणि १४ नोव्हेंबरला पहिली प्रभात फेरी निघाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन