शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतकरी संघातील वाढत्या खाबूगिरीने गोदामे मोकळी, किती कोटीचा तोटा.. जाणून घ्या

By राजाराम लोंढे | Updated: January 6, 2025 14:28 IST

गेल्या दहा वर्षात विविध शाखांत तीन कोटींपेक्षा अधिक गोलमाल 

राजाराम लोंढेकोल्हापूर : शेतकरी संघाच्या अधोगतीला तत्कालीन संचालकांसह काही कर्मचाऱ्यांची खाबुगिरी कारणीभूत ठरली आहे. गेल्या दहा वर्षांत संघात तब्बल तीन कोटींपेक्षा अधिकचा गोलमाल झाल्याने बसलेला संघाचा बैल उठलाच नाही. कार्वे (ता. चंदगड) सारख्या एका शाखेत तब्बल ८० लाखांचा अपहार झाला, यावरून अपहाराने संघाची गोदामे किती पोखरली आहेत, हे लक्षात येते. राजकीय अभय असल्याने कारवाईचा धाक नसल्यानेच असे धाडस होते. सध्या ३.८१ कोटींचा संचित तोटा संघाच्या मानगुटीवर आहे.गेल्या वीस वर्षांतील सगळेच संचालक कारभाराला दोषी आहेत, असे म्हणता येणार नाही. काहींनी प्रामाणिक प्रयत्न केला, पण संघाचा बैल इतक्या दलदलीत अडकला त्याला बाहेर काढणे त्यांच्याही आवाक्याबाहेर गेले. शासकीय प्रशासकीय मंडळाचे कामकाज समजावून घेऊन त्यांना शिस्त लावण्यातच वर्षाचा कालावधी गेला. त्यानंतर अशासकीय प्रशासक मंडळ आले, त्यांनीही खूप प्रयत्न केले तोपर्यंत नेत्यांना निवडणुकीची घाई झाली. अगोदरच कोट्यवधींच्या तोट्यात असलेल्या संघाच्या डोक्यावर २७ लाखांचा निवडणूक खर्च पडला.

पगार कमी आणि गरजा तेवढ्याच राहिल्याने काही कर्मचाऱ्यांकडून अधिकाराचा गैरवापर केल्याने अपहार झाला. त्याशिवाय कोट्यवधी रुपयांची उधारी प्रलंबित आहे. संघातील सर्वच कर्मचारी या वृत्तीचे नाहीत, संघ टिकला तरच आपला संसार वाचेल, या भावनेने काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. मात्र, राजकीय अभय असलेल्या काही कर्मचाऱ्यांमुळे संघातील अपहाराची मालिका खंडित होण्याचे नाव घेत नाही.संघाच्या ६३ पैकी ३० शाखा तोट्यातशेतकरी संघाच्या जिल्ह्यात ६३ शाखा कार्यरत आहेत. पण, पुरेसा माल व योग्य मार्केटिंग नसल्याने त्यातील तब्बल ३० शाखा तोट्यात आहेत. उर्वरित ३३ पैकी बहुतांशी शाखा तांत्रिक पातळीवरच नफ्यात दिसत आहेत. मग, संघ नफ्यात कसा येईल.क्षमतेपेक्षा खताचे निम्मेच उत्पादनसंघाचा रुकडी (ता. हातकणंगले) येथील खत कारखाना पूर्णक्षमतेने चालवण्याची गरज आहे. साधारणता सात हजार टनापेक्षा अधिक उत्पादन घेऊन त्याची विक्री चांगल्या प्रकारे केली तर त्यातून किमान एक कोटीचा नफा मिळू शकतो. पण, गेल्या हंगामात कसेबसे ‘दाणेदार’चे १७०० टन, तर हातमिश्रित खत २५०० टनाचे उत्पादन घेतले. मग, संघ नफ्यात कसा येणार?

कारभाऱ्यांचा हस्तक्षेपच कारणीभूतसंघात विशिष्ट संचालकांच्या मर्जीतील व्यक्तीविशेष अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनाच सोबत घेऊन कारभाऱ्यांचा हस्तक्षेप गरजेपेक्षा वाढला आहे, तोही कारणीभूत आहे.

पूर्वी हमालही काढत होते ताळेबंदपूर्वी शेतकरी संघातील नोकरीला प्रतिष्ठा होती. त्यामुळे शाखांच्या पातळीवर हमालापासून व्यवस्थापकांपर्यंत सगळेच तळमळीने काम करायचे. व्यवस्थापक उशिरापर्यंत शाखांमध्ये काम करून रोजचा रोज ताळमेळ घेत होते. आपल्या शाखेतील हमालाला सुद्धा ताळेबंद समजला पाहिजे या भावनेतून शिकवला जायचा. मात्र, आज संघात बोटावर मोजण्या इतपतच कर्मचाऱ्यांना ताळेबंद काढता येतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर