शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पितृ पंधरवड्याच्या धास्तीने राजकीय घडामोडी थंडावल्या, गुरुवारनंतर वेगावणार

By राजाराम लोंढे | Updated: September 30, 2024 16:55 IST

राजाराम लोंढे  कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला ...

राजाराम लोंढे कोल्हापूर : विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर ज्या गतीने पक्ष प्रवेश, उमेदवारांची घोषणा हाेणे अपेक्षित हाेते, ते होताना दिसत नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी पितृपंधरवड्याची धास्ती घेतल्याने राजकीय घडामाेडी थंडावल्या आहेत.

गुरुवार (दि. ३) नंतर राज्यात उमेदवारांच्या घोषणा सुरू होतील आणि पक्षप्रवेशांचे पेवही फुटणार आहे. हिंदू संस्कृतीमध्ये राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात शुभमुहूर्तावरच केली जाते. काहीजण मानतात तर काहीजण मानतही नाहीत; पण राजकारणात या गोष्टीला फार महत्त्व दिले जाते. विधानसभा निवडणुकीचा बिगुल आठ-दहा दिवसांत वाजणारच आहे. महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे सूत्र बऱ्यापैकी पूर्णही झालेले आहे. पण, ते जाहीर करण्याबराेबरच ज्यांची उमेदवारी निश्चित आहे, त्यांची घोषणा करण्यास पितृपंधरवड्याचा अडथळा निर्माण झाला आहे.महायुती व महाविकास आघाडीमध्ये जागांचे बऱ्यापैकी वाटप झाल्याने कोणाला उमेदवार मिळणार आणि कोणाला थांबावे लागणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे अनेकांचे पक्षप्रवेश निश्चितही झालेले आहेत. 

पितृ पंधरवडा म्हणजे काय?भाद्रपद पौर्णिमेच्या नंतर अमावास्येपर्यंत जो पंधरवडा असतो, त्याला पितृ पंधरवडा म्हटले जाते. पित्र म्हणजे या कालावधीत आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवण्यासाठी प्रार्थना केली जाते. असे केल्याने त्यांच्या वंशजाच्या अडचणी कमी होतात, असे म्हटले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण