शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

चांदोली विस्थापित मूळ गावाकडे परतू लागले; कोल्हापुरात गेले ३२ दिवस होता ठिय्या 

By संदीप आडनाईक | Published: February 29, 2024 7:30 PM

कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस ...

कोल्हापूर : गेले ३२ दिवस आपल्या मागण्यांवर ठाम राहिलेल्या चांदोली विस्थापितांना अखेर सरकारी यंत्रणेपुढे पराभव पत्करावा लागला. इतके दिवस वनविभागाच्या दारात ठिय्या मांडून बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा बांध फुटल्यामुळे त्यांनी आता थेट मूळ गावाकडे चालत जाण्यास प्रारंभ केला. बुधवारपासून चालायला सुरुवात केलेल्या या आंदोलकांनी गुरुवारी निवळे वाठार तर्फ वडगावात मुक्काम केला.मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर गेले ३२ दिवस आंदोलन करणाऱ्या सुमारे ८०० हून अधिक चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी १०० प्रकल्पग्रस्तांना वनविभागासमोर ठिय्या आंदोलन करण्यासाठी मागे ठेवून मूळ गावी चालत जाण्याचा पर्याय स्वीकारला. बुधवारी या आंदोलकांची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था शालन पाटील यांनी केली. गुरुवारी सकाळी टोप संभापूर या ठिकाणी पेठ वडगाव सोनाळी येथील केजीएन कमिटीने आंदोलकांना जेवणाची व्यवस्था केली तर निवळे वाठार तर्फे वडगावच्या ग्रामकमिटीने त्यांची गुरुवारी रात्रीची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली.नवे पारगाव येथील शेतकरी आंदोलकांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज, शुक्रवार दि. १ मार्च रोजी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था नवे पारगाव येथे माजी सभापती प्रदीप राजाराम देशमुख आणि नवे पारगावचे सरपंच करणार आहेत. आंदोलकांचे साहित्य नेण्यासाठी गाडीची व्यवस्था प्रदीप पाटील यांनी केली आहे.या आंदोलनात मारुती पाटील, दाऊद पटेल, रफिक पटेल, आनंदा आमकर, विनोद बडदे, एम. डी. पाटील, जगन्नाथ कुडतुडकर, नजीर चौगुले, पांडुरंग कोठारी, पांडुरंग पवार, दगडू बोडके, प्रदिप पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील, दगडू टेलर, सुभाष पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरagitationआंदोलन