शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

Kolhapur: पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या नावलीपैकी धारवाडीचा डोंगर खचला, नागरिकांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:00 IST

प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या नावलीपैकी धारवाडी येथील डोंगर भेगा पडून खचू लागल्याने भूस्खलनाचा धोका वाढला आहे. संभाव्य धोका ओळखून धारवाडीतील ४५, तर जाधववाडील ३ अशा ४८ कुटुंबांना पन्हाळा प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. भैरवनाथ मंदिराच्या भिंतींना तडे गेल्याने तेथूनच जमीन भेगाळायला सुरुवात झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.पन्हाळ्याच्या पायथ्याशी आपटीनजीक नावली गावाचा काही भाग धारवाडीत वसला आहे. धारवाडीच्या वर डोंगर, तर खाली उतार आहे. पन्हाळा परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेली भेग मंगळवारी सकाळी रुंदावताना शेतकऱ्यांना दिसली. साधारणत: अर्धा किलोमीटर अंतर डोंगर खचत जाऊन भेग पडल्याचे शेतकऱ्यांनी पन्हाळा प्रशासनाच्या लक्षात आणून दिो. त्यानंतर सायंकाळनंतर प्रशासनाने तातडीने संभाव्य धोक्याचे गांभीर्य ओळखून नावलीपैकी धारवाडीतील आणि आपटीपैकी जाधववाडीतील ४८ कुटुंबातील २२३ लोकांना जवळील देवाळे गावातील शाळेत आणि मंदिरात स्थलांतरित केले आहे.प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचेयेथील डोंगरात भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत असल्याने इर्शाळवाडी किंवा माळीणसारखा प्रकार घडू नये म्हणून तालुका प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अलीकडील पाच-सहा वर्षात पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या डोंगरीत भूस्खलनाचे आणि दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये मराठवाडी, धारवाडी, जांभळेवाडी आणि आपटीत भूस्खलन होण्याच्या घटना घडत आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासन अतिदक्षता आणि सतर्कतेबाबत नोटीस देण्याचे काम करते; परंतु पूर्वानुभव पाहता या गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. रात्री-अपरात्री भूस्खलनासारखी गंभीर घटना घडली तर इर्शाळवाडी किंवा माळीणसारखी घटना घडायला वेळ लागणार नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlandslidesभूस्खलन