शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

पालकमंत्री साहेब, अंबाबाई मंदिर विकासाला निधी कधी? विकास आराखडा कागदावरच

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: January 7, 2023 14:16 IST

अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा गेल्या तीन वर्षांपासून रखडला

इंदुमती गणेशकोल्हापूर : मोठा गाजावाजा करत मंजूर झालेला ८० कोटींचा करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा गेल्या तीन वर्षांपासून रखडला आहे. पहिल्या टप्प्यातील पहिल्या कामासाठी सन २०१८-१९ साली आलेल्या ८.२० कोटींनंतर मंदिरासाठी निधीच आलेला नाही. पार्किंग व भक्तनिवासाच्या बदललेल्या आराखड्याला पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची मंजुरी मिळालेली नाही. केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेसाठी पाठवलेली फाइल अजून अजून पर्यटन विभागाकडेच अडकली आहे.वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली. म्हणून दहा वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखड्याचे काय झाले याचा शोध लोकमतने घेतला.अंबाबाई मंदिराला दरवर्षी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच जाते, पण त्या तुलनेत सोयीसुविधांची वानवा आहे. कोल्हापुरात प्रवेश केल्यापासून त्यांच्या अडचणी सुरू होतात. मंदिराला नेमक्या कोणत्या रस्त्यांवरून जायचे. पार्किंग कुठे करायचे, ते फुल्ल असेल तर पर्यायी व्यवस्था काय?, इथून प्रश्न सुरू होतात. स्वच्छतागृहांच्या बाबतीत तर महिलांची प्रचंड आबाळ होते. राहण्यासाठी खासगी यात्री निवास व हॉटेलचा आधार घ्यावा लागतो, देवस्थानचे अन्नछत्र नाही.या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी मंदिर विकास आराखडा दहा वर्षांपूर्वी बनवण्यात आला. त्यात वारंवार बदल करून तो २२५ कोटींचा झाला. अखेर पहिल्या टप्प्यासाठी मंदिराच्या ८० कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळून २०१८-१९ मध्ये ८ कोटी २० लाख रुपये आले. आराखड्यातील पहिले काम दर्शन मंडपचे होते; पण विद्यापीठ दरवाज्यासमोर दर्शन मंडप बनवण्याला विरोध झाल्याने हा निधी सरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंगकडे वळवण्यात आला. या कामासाठीदेखील जवळपास ९ कोटी ४१ लाख रुपये इतका निधी लागणार होता. तो आता भक्त निवासामुळे वाढणार आहे.

निधी कधी मिळणार?मंदिरासाठी २०१९ साली मिळालेल्या ८.२० कोटीनंतर निधीच आलेला नाही. मधली दोन वर्षे तर कोरोनातच गेली. गेल्या वर्षभरात राज्याच्या सत्ताकारणातच इतक्या उलथापालखी झाल्या की अंबाबाई मंदिराकडे बघणार कोण? अशी स्थिती होती; पण आता सगळ्या गोष्टी पूर्वपदावर येऊन विकासकामे मार्गी लागत असताना अंबाबाई मंदिराच्या कामासाठी निधीची तरतूद होणे अपेक्षित आहे.

बदललेल्या प्लॅनसाठी हवी मंजुरीव्हिनस कॉर्नर येथे पुराचे पाणी येत असल्याने येथील गाडी अड्ड्यातील भक्त निवासाचा प्लॅन रद्द करून तो सरस्वती टॉकीजसमोरील पार्किंगच्यावर करण्यात येणार आहे. येथे आता ग्राऊंड फ्लोअरपासून पहिले पाच मजले पार्किंग होणार आहे. सहावा आणि सातव्या मजल्यावर भक्त निवास असेल, तेथे एकूण ४७ खोल्या, ४ डॉर्मेटरी ५० लोकांचे मोठे हॉल असणार आहे. त्यासाठी वाढीव निधी लागणार असून महापालिकेने २५ कोटींची मागणी केली आहे. या बदललेल्या आराखड्याला अजून जिल्हास्तरीय समितीची मान्यता मिळालेली नाही. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात.

प्रसाद योजनेच्या फाइलचे पुढे काय?केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेतून तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी दिला जातो. त्यासाठी महापालिकेने पाठवलेला प्रस्ताव अजून पर्यटन विभागाकडेच धूळखात आहे. पर्यटन विभागाने प्रस्तावाची पडताळणी केली की ते शिफारस करून प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवतात, अशी त्याची प्रक्रिया आहे; पण ही फाईलदेखील पुढे गेलेली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर