शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: धनराज नाकाडेंसह कारीदकर, बीडकर निलंबित; 'उच्च शिक्षण'मधील अनियमितता भोवली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:57 IST

भरतीमुळेच अडकले तिघे, अनेकांचे धाबे दणाणले

कोल्हापूर : शून्य प्रलंबितता व दैनंदिन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राबवलेल्या मोहिमेअंतर्गत कामकाजात अनियमितता आढळल्याचा ठपका ठेवत राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कोल्हापूर विभागाचे तत्कालीन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे, तत्कालीन प्रशासन अधिकारी धैर्यशील कारीदकर आणि वरिष्ठ लिपिक बाबासाहेब बीडकर यांना गुरुवारी निलंबित केले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने कक्ष अधिकारी हे. प. बाविस्कर यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. डॉ. नाकाडे सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. कोल्हापूरसह राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील पहिलीच मोठी धडक कारवाई केल्याने शिक्षण विभागातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.तत्कालीन सहसंचालक डॉ. नाकाडे यांच्या कार्यकाळात कोल्हापूर विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. ही भरती प्रक्रिया अनियमित असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. काही महिन्यांपूर्वी उच्च शिक्षण विभागाने शून्य प्रलंबितता व दैनंदिन प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्यभरातील सहसंचालक कार्यालयांत विशेष मोहीम राबविली.मोहिमेअंतर्गत कोल्हापूर विभागीय सहसंचालक, कार्यालयाच्या तपासणीदरम्यान अनियमितता आढळून आली. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संदीप पाटील व केशव तुपे यांची द्विसदस्यीय समिती नेमली. नियुक्त समितीने त्यांचा अहवाल ७ मे रोजी शासनास सादर केला. अहवालामध्ये तत्कालीन सहसंचालक डॉ. नाकाडे, तत्कालीन प्रभारी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी धैर्यशील कारीदकर आणि वरिष्ठ लिपिक बाबासाहेब बीडकर या तिघांवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार तिघांचे निलंबन केले आहे.

भरतीमुळेच अडकले तिघेमहाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र, हा नियम डावलत डॉ. नाकाडे यांच्या कार्यकाळात जवळपास शंभर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचा आरोप झाला. विशेष म्हणजे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यालयाला अचानक भेट दिल्यानंतर त्यांनाही यातील काही ऑर्डर आढळून आल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी ॲक्शन मोडवर येत थेट कारवाईचा बडगा उगारला.

ई-ऑफिसशिवाय कामकाज भोवलेउच्च शिक्षण विभागात पारदर्शकता आणण्यासाठी ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यात आली. मात्र, कोल्हापूर विभागीय कार्यालयाचे कामकाज ई-ऑफिसशिवाय सुरू असल्याचे मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आले होते. शिवाय झिरो पेंडन्सी उपक्रम सुरू असतानाही अनेक प्रकरणे प्रलंबित व अनियमित असल्याचे दिसून आल्याने याच्या चौकशीसाठी समिती नेमली होती.