शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: विद्यापीठाला विद्यार्थ्यांचीच वानवा: दहा वर्षांत विद्यार्थी संख्येत आलेख उतरताच, तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ

By पोपट केशव पवार | Updated: January 3, 2025 15:44 IST

पोपट पवार  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेचा विषय बनला असून गेल्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा ...

पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेचा विषय बनला असून गेल्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा आलेख उतरताच राहिला आहे. घटत्या संख्येवर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचा निष्कर्ष काढला होता. त्याअनुषंगाने उपाययोजना करण्याचे सुचविले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्येही यात तितकासा फरक पडला नसल्याचे दिसून आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात जवळपास २५ हून अधिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली.ज्या अधिविभागातील अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाले आहेत त्यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन त्याबाबत कारणमीमांसा व उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने घटत्या विद्यार्थी संख्येला काही प्रमाणात विद्यापीठालाही जबाबदार धरले आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे कारण समितीने दिले होते. शिवाय, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवरील काही टप्पे प्रवेशाला अडथळा निर्माण करणारे आहेत, असाही अभिप्राय नोंदवला होता. त्यावर या समितीने काही शिफारसी सुचवल्या होत्या. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अधिविभागातील विद्यार्थी संख्या घटल्याने समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची खिरापत कशासाठी?पूर्वी पदव्युत्तर शिक्षण हे विद्यापीठांमधील अधिविभागांमध्ये दिले जात होते. मात्र, दूरच्या विद्यार्थ्यांची गैरसाेय टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांना मान्यता देण्यात आली. महाविद्यालय स्तरावर असणाऱ्या पदव्युत्तर शिक्षण केंद्रांमध्ये भौतिक सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. येथील परीक्षा पारदर्शक होतात का?, प्रॅक्टिकल कसे घेतले जाते? यावर नेहमीच शंका उपस्थित केली जाते. महाविद्यालय स्तरावर अशी शेकडोंनी शिक्षण केंद्रे उभी राहिल्याने अधिविभागातील विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे.

दहा वर्षांतील अधिविभागातील प्रवेशाची स्थितीवर्ष  - प्रवेश क्षमता - प्रवेशित विद्यार्थी२०१४-१५ - २४३५  - २०४५२०१५-१६ - २७१४ - २४३०२०१६-१७ - २४९०  - २२७२२०१७-१८ - २६०० - २१०१२०१८-१९ - २८४३  - २३६७२०१९-२० - २८६५  - २२५०२०२०-२१ - २९२६ - २२४७२०२१-२२ - २८५९ - २४४५२०२२-२३ - २९०४ - २३६०२०२३-२४ - २९२६ - २४१७

एम.ए., एम.कॉम. यासह शास्त्र विभागातील काही विषय यांचे महत्त्व कमी झाले आहे. यातून किती रोजगार मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थी आता व्यावहारिक शहाणपण घेत कमीत कमी कालावधीत लवकर रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. शिवाय महाविद्यालयीन स्तरावरच पी. जी. अभ्यासक्रम सुरू केल्याने अधिविभागांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. - डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठकोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र