शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

Kolhapur: विद्यापीठाला विद्यार्थ्यांचीच वानवा: दहा वर्षांत विद्यार्थी संख्येत आलेख उतरताच, तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ

By पोपट केशव पवार | Updated: January 3, 2025 15:44 IST

पोपट पवार  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेचा विषय बनला असून गेल्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा ...

पोपट पवार कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंतेचा विषय बनला असून गेल्या दहा वर्षातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा आलेख उतरताच राहिला आहे. घटत्या संख्येवर उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या समितीनेही विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचा निष्कर्ष काढला होता. त्याअनुषंगाने उपाययोजना करण्याचे सुचविले होते. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्येही यात तितकासा फरक पडला नसल्याचे दिसून आले. यंदाच्या शैक्षणिक वर्षात जवळपास २५ हून अधिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने तीन-तीन वेळा प्रवेश परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली.ज्या अधिविभागातील अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश क्षमतेपेक्षा कमी झाले आहेत त्यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेऊन त्याबाबत कारणमीमांसा व उपाययोजना सुचविण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने घटत्या विद्यार्थी संख्येला काही प्रमाणात विद्यापीठालाही जबाबदार धरले आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे कारण समितीने दिले होते. शिवाय, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवरील काही टप्पे प्रवेशाला अडथळा निर्माण करणारे आहेत, असाही अभिप्राय नोंदवला होता. त्यावर या समितीने काही शिफारसी सुचवल्या होत्या. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षातही अधिविभागातील विद्यार्थी संख्या घटल्याने समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी केली नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची खिरापत कशासाठी?पूर्वी पदव्युत्तर शिक्षण हे विद्यापीठांमधील अधिविभागांमध्ये दिले जात होते. मात्र, दूरच्या विद्यार्थ्यांची गैरसाेय टाळण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांना मान्यता देण्यात आली. महाविद्यालय स्तरावर असणाऱ्या पदव्युत्तर शिक्षण केंद्रांमध्ये भौतिक सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. येथील परीक्षा पारदर्शक होतात का?, प्रॅक्टिकल कसे घेतले जाते? यावर नेहमीच शंका उपस्थित केली जाते. महाविद्यालय स्तरावर अशी शेकडोंनी शिक्षण केंद्रे उभी राहिल्याने अधिविभागातील विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला आहे.

दहा वर्षांतील अधिविभागातील प्रवेशाची स्थितीवर्ष  - प्रवेश क्षमता - प्रवेशित विद्यार्थी२०१४-१५ - २४३५  - २०४५२०१५-१६ - २७१४ - २४३०२०१६-१७ - २४९०  - २२७२२०१७-१८ - २६०० - २१०१२०१८-१९ - २८४३  - २३६७२०१९-२० - २८६५  - २२५०२०२०-२१ - २९२६ - २२४७२०२१-२२ - २८५९ - २४४५२०२२-२३ - २९०४ - २३६०२०२३-२४ - २९२६ - २४१७

एम.ए., एम.कॉम. यासह शास्त्र विभागातील काही विषय यांचे महत्त्व कमी झाले आहे. यातून किती रोजगार मिळतो हा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थी आता व्यावहारिक शहाणपण घेत कमीत कमी कालावधीत लवकर रोजगार मिळवून देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. शिवाय महाविद्यालयीन स्तरावरच पी. जी. अभ्यासक्रम सुरू केल्याने अधिविभागांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. - डॉ. बी. एम. हिर्डेकर, माजी परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठकोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र