शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

धामणी नदीवरील बंधारा गेला वाहून, शेतीचे नुकसान; कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 11:19 IST

शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

महेश आठल्ये   म्हासुर्ली (राधानगरी): पाटबंधारे विभागाने गत आठवड्यात केलेल्या मनमानी उपसा बंदीमुळे बंधाऱ्यात वरून वाहून आलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे धामणी नदीवरील बळपवाडी (ता. पन्हाळा) गवशी पाटीलवाडी (ता. राधानगरी ) या दरम्यान असणारा मातीचा बंधारा आज सकाळच्या सुमारास फुटला. बंधारा फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच पनोरे (ता. पन्हाळा) परिसरात पाणी गेल्याने त्या परिसरातील विद्युत पंप पाण्यात बुडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.धामणी खोऱ्यात धामणी धरणाचे काम अपूर्ण असल्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्याकडून ठिकठिकाणी मातीचे बंधारे घातले जातात. अंबर्डे (ता. पन्हाळा) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी यावर्षी त्यात उशिराने पाणीसाठा केल्यामुळे हा बंधारा रिकामा राहिला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाने एकतर्फी निर्णय घेत गत आठवड्यात उपसा बंदी जाहीर केली होती. या उपसा बंदीच्या निर्णयामुळे या परिसरात तीव्र असंतोष पसरला होता. उपसा बंदीमुळे वरील धरणातील पाणी गवशी पाटील वाडी -बळपवाडी बंधाऱ्यात येऊन साठले होते. अंबर्डे बंधारा रिकामा असल्यामुळे या मातीच्या बंधार्‍यावर पाण्याचा दाब वाढल्याने हा बंधारा मध्येच फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. तर, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार असून या बंधाऱ्याच्या खालील बाजूस असणाऱ्या दोन्ही नदी तीरावरील शेकडो मोटर पंप पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांमधून पाटबंधारे विभागाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूर