शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

Kolhapur Flood: रेड झोन कागदावर, पूर रस्त्यावर; २०१९ पूर्वीच पूरक्षेत्रात मोठी बांधकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:23 IST

प्राधिकरणाने तरी सावध राहावे

कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात आलेल्या महापुरामुळे पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकून केलेली बांधकामे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. पूर क्षेत्रातील बांधकामे थांबविण्यासाठी तातडीने ब्ल्यू लाइन व रेड लाइन मार्किंग होणे आवश्यक होते; परंतु रेड झोन क्षेत्र अंतिम करण्याची प्रक्रियादेखील जाणीवपूर्वक रखडवली गेली. त्याचा फटका मात्र पुढे वर्षानुवर्षे नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने तरी सावध होऊन अशी चूक करू नये, अशी अपेक्षा आहे.जलसंपदा विभागाने रेडझोन निश्चित करून ब्ल्यू लाइन व रेड लाइनचे मार्किंग केले असून, त्याचे नकाशे महापालिका प्रशासनाला सादर केले आहेत. दि. ७-१२-२०१९ रोजी पहिली ब्ल्यू लाइन पूर्ण झाली, त्यानंतर दि. ३-०६-२०२२ रोजी दुसरी रेडलाइनही निश्चित केली गेली. त्यानंतर महापालिका नगररचना विभागाकडून सध्या बांधकामाबाबत कडक निर्बंध लादले आहेत; परंतु रेडझोन उशिरा जाहीर करण्याचा प्रकार म्हणजे ‘बैल गेला अन् झोपा केला’ असेच म्हणावे लागते.सन २०१९ पूर्वी शहरातील पूर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली. पूर क्षेत्रात बांधकामाला परवानगी देताना नगररचना विभागाला भविष्यकाळातील महापुराच्या काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरणार यांची शंका होती. त्यामुळे पूर क्षेत्रात बांधकाम परवानगी देताना भराव टाकायचा नाही, तीन मीटर उंचीवर स्लॅब टाकून बांधकामे करायची. खालची जागा ही वाहनतळ म्हणून वापरावी अशा अटी घालण्यात आल्या. दुर्दैवाने महापालिकेचे नियम म्हणजे मोडण्यासाठीच असतात असा समज झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी मोठे भराव टाकून इमारती उभारल्या. ही बांधकामे सुरू असताना आपणच घातलेल्या अटी पाळल्या आहेत की नाही याची खत्री नगररचना विभागाने करून घेतली नाही.सन २०१९ पूर्वी झालेल्या बेजबाबदार बांधकामे आणि भरावांमुळे २०१९ व २०२१ चे मोठे महापूर आले. त्यानंतरही आलेल्या महापुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यावर्षीही बऱ्याच घरांना, अपार्टमेंटना महापुराच्या पाण्याने विळखा घातला. यापुढील काळातही अशी समस्या वारंवार उद्भवणार आहे. कारण रेडझोन निश्चित झाला असला तरी पुढील काळात बांधकामे होणार नाहीत. मात्र, झालेली बांधकामे आहेत तशीच राहणार आहेत. त्याला काहीच करता येणार नाही.

इंद्रजित कॉलनीत टाकला भरावइंद्रजित कॉलनी, जाधववाडी येथे दरवर्षी पाणी येत आहे. वास्तविक जेव्हा ४७ फूट पाणी पातळी असेल तेव्हाच पाणी यायचे; परंतु या भागात व आसपासच्या भागात जो भराव टाकण्यात आला आहे, त्यामुळे यावर्षी हे पाणी कॉलनीमध्ये आले. गटारी, नाले तुंबून या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. त्याने हे पाणी तेथे साचून राहत आहे. या परिसरात भराव टाकल्यामुळे सर्वांना दरवर्षी स्थलांतरित होण्याची वेळ आली असल्याची तक्रार येथील नागरिकांनी केली आहे.

आता कशी परवानगी दिली जाते

  • नदीपात्र ते ब्ल्यू लाइन बांधकाम परवानगी नाही
  • ब्ल्यू लाइन ते रेडलाइन काही अटींवर परवानगी
  • भराव टाकायचा नाही, तीन मीटर स्टील्ड बांधकाम
टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर