शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीचे संवर्धन झाले.. मूळ स्वरूप खुलले; आजपासून मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:06 IST

जिल्हाधिकाऱ्यांना आज देणार अहवाल

कोल्हापूर : आर्द्रतेमुळे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर पडलेले पांढरे डाग, यासह पूजाविधी आणि वातावरणाचा झालेला परिणाम कमी करत, केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी देवीच्या मूळ मूर्तीचे रूप खुलवले. मूर्ती अगदी नव्यासारखी भासावी अशा रीतीने हे काम करण्यात आले आहे.मंगळवारी मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून, आज बुधवारी धार्मिक विधी झाल्यानंतर दुपारी १२ नंतर मूळ मूर्तीचे दर्शन पूर्ववत सुरू होईल. दरम्यान, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संवर्धन प्रक्रियेची पाहणी केली.करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या संवर्धन प्रक्रियेसाठी सोमवारी रात्री साडे आठ वाजता केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे उपअधीक्षक डॉ.विनोदकुमार, नीलेश महाजन, सुधीर वाघ आणि मनोज सोनवणे हे तज्ज्ञ काेल्हापुरात दाखल झाले. सोमवारी रात्री त्यांनी देवीच्या मूर्तीची पाहणी केली व मंगळवारी सकाळीच संवर्धनाला सुरुवात केली. दिवसभर हे संवर्धनाचे काम चालले. अंबाबाई मूर्तीवरील पांढरे ठिपके रासायनिक प्रक्रियेद्वारे स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे पाषाणाचा मूळ नैसर्गिक रंग दिसू लागला.आज बुधवारी सकाळी अंबाबाईच्या मूळ मूर्तीत प्राणतत्त्व देण्याचा धार्मिक विधी, अभिषेक आरतीनंतर दुपारी १२ नंतर मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली होईल, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारीही भाविकांनी पितळी उंबरा येथूनच उत्सवमूर्ती व देवी कलशाचे दर्शन घेतले.

वाघ, गदा, नागाचे वेटोळे दिसू लागले..अंबाबाई मूर्तीवर पांढरे डाग पडल्याने पाषणाचा रंग वेगवेगळा दिसत होता, पण आता स्वच्छतेमुळे आणि मूर्तीवर संवर्धनाचा लेप लावल्याने अंबाबाईच्या मागील वाघ, गदा, दागिने, डोक्यावरील नागाचे वेटोळे ही चिन्हेही दिसू लागली आहेत. भविष्यात हे पांढरे डाग दिसणार नाहीत अशी अपेक्षा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना आज देणार अहवालअंबाबाई मूर्तीची स्थिती कशी आहे, याबाबत पुरातत्त्व खात्याचे अधिकारी आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीचे सहा महिन्याला संवर्धन करावे लागते, पण अंबाबाई मूर्तीच्या बाबतीत ते वर्षाला करावे लागेल.