शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

By संदीप आडनाईक | Updated: April 25, 2024 13:43 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वे कोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर ...

संदीप आडनाईककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वेकोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर असूनही सुविधांबाबत कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. १३२ वर्षे झाल्यानंतरही कोल्हापूरच्या संथ रेल्वेला पुरेशी ‘गती’ मिळालेली नाही. कोकण रेल्वे, लांब पल्ल्याच्या रेल्वे, वंदे भारतसारखे नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याबाबत अजूनही कोल्हापूरला ठेंगा दाखवला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची ‘शक्ती’ मिळण्याची गरज आहे.

गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी लोकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्या आता थोड्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. कोल्हापूर ते मुंबई आणि पुढे अन्यत्र वेगाने जाण्यासाठी कोल्हापूर ते पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण अत्यावश्यक होते. मात्र कोल्हापूर, मिरज ही स्थानके दक्षिण रेल्वे विभागामध्ये मोडत असल्याने कोल्हापूरचा कधी विचारच झाला नाही. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी १० तासांचा मोठा कालावधी लागत होता.आता दुहेरीकरण-विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण हाेत आहे. त्यामुळे नवीन रेल्वेगाड्यांचा मार्ग मोकळा होईल. मिरज-कुर्डूवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. दिल्ली, धनबाद, अहमदाबादसाठी रोज रेल्वेची मागणी असूनही ती आठवड्यातून एकदा सोडली जाते. यामुळे व्यापार, उद्योगाला मर्यादा आहेत.

कोकण रेल्वे कोल्हापूरला कधी जोडणारकोकणाला कोल्हापूर जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची तरतूद केली. पण ५० वर्षे होऊन गेली; परंतु ही मागणी अद्यापही सर्वेक्षणाच्याच पातळीवर आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी जोडल्या जाऊन उद्योग, व्यापाराला चालना मिळणार आहे. ही जमेची एक बाजू सोडल्यास अन्य सुविधांबाबत ठेंगाच दाखविला असेच म्हणावे लागेल.

मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतचतत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांची कोल्हापूर मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतच विरली. त्याचा पाठपुरावा कोणत्याच लोकप्रतिनिधींनी केला नाही. सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने उशिरा का होईना अमृतभारत योजनेतून पुनर्विकासाचे काम सुरू आहे; पण त्याला गती नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

  • १८९१ : मिरज ते कोल्हापूर पहिली रेल्वे सुरू
  • ४८ किलोमीटरचा पहिला ट्रॅक शाहू महाराजांच्या वैयक्तिक निधीतून
  • १९७१ : मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन
  • २०२० : कोल्हापर-मिरज एकेरी विद्युतीकरण मार्ग

 

  • ४ एकूण प्लॅटफाॅर्म
  • ११ एक्स्प्रेस
  • ४ डेमू गाड्या
  • २ सुपरफास्ट
  • १७ : एकूण धावणाऱ्या रेल्वे

कोल्हापूर रेल्वेस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. डेमू गाड्यांची संख्या वाढवणे, सांगली, पुणे शटल सर्व्हिस सुरू करणे, कोल्हापूर ते वैभववाडी, मुंबईसाठी नवीन गाडी सुरू करणे, फेऱ्या वाढवणे, वंदे भारत या गाड्या होणे अपेक्षित आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

दुसरे रेल्वे टर्मिनल केल्यास नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होतील, कोल्हापूर-मिरज दुसरी रेल्वे लाइन टाकणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा पाठपुरावा करणे, कऱ्हाड-बेळगाव नवीन रेल्वे मार्ग कोल्हापूरला महामार्गाशी समांतर करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या; पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. ते मार्गी लागल्यास जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी येतील. - मधुसूदन पावसकर, अध्यक्ष, युनिटी करवीर विकास संघ मंच, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे