शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

By संदीप आडनाईक | Updated: April 25, 2024 13:43 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वे कोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर ...

संदीप आडनाईककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वेकोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर असूनही सुविधांबाबत कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. १३२ वर्षे झाल्यानंतरही कोल्हापूरच्या संथ रेल्वेला पुरेशी ‘गती’ मिळालेली नाही. कोकण रेल्वे, लांब पल्ल्याच्या रेल्वे, वंदे भारतसारखे नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याबाबत अजूनही कोल्हापूरला ठेंगा दाखवला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची ‘शक्ती’ मिळण्याची गरज आहे.

गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी लोकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्या आता थोड्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. कोल्हापूर ते मुंबई आणि पुढे अन्यत्र वेगाने जाण्यासाठी कोल्हापूर ते पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण अत्यावश्यक होते. मात्र कोल्हापूर, मिरज ही स्थानके दक्षिण रेल्वे विभागामध्ये मोडत असल्याने कोल्हापूरचा कधी विचारच झाला नाही. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी १० तासांचा मोठा कालावधी लागत होता.आता दुहेरीकरण-विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण हाेत आहे. त्यामुळे नवीन रेल्वेगाड्यांचा मार्ग मोकळा होईल. मिरज-कुर्डूवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. दिल्ली, धनबाद, अहमदाबादसाठी रोज रेल्वेची मागणी असूनही ती आठवड्यातून एकदा सोडली जाते. यामुळे व्यापार, उद्योगाला मर्यादा आहेत.

कोकण रेल्वे कोल्हापूरला कधी जोडणारकोकणाला कोल्हापूर जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची तरतूद केली. पण ५० वर्षे होऊन गेली; परंतु ही मागणी अद्यापही सर्वेक्षणाच्याच पातळीवर आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी जोडल्या जाऊन उद्योग, व्यापाराला चालना मिळणार आहे. ही जमेची एक बाजू सोडल्यास अन्य सुविधांबाबत ठेंगाच दाखविला असेच म्हणावे लागेल.

मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतचतत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांची कोल्हापूर मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतच विरली. त्याचा पाठपुरावा कोणत्याच लोकप्रतिनिधींनी केला नाही. सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने उशिरा का होईना अमृतभारत योजनेतून पुनर्विकासाचे काम सुरू आहे; पण त्याला गती नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

  • १८९१ : मिरज ते कोल्हापूर पहिली रेल्वे सुरू
  • ४८ किलोमीटरचा पहिला ट्रॅक शाहू महाराजांच्या वैयक्तिक निधीतून
  • १९७१ : मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन
  • २०२० : कोल्हापर-मिरज एकेरी विद्युतीकरण मार्ग

 

  • ४ एकूण प्लॅटफाॅर्म
  • ११ एक्स्प्रेस
  • ४ डेमू गाड्या
  • २ सुपरफास्ट
  • १७ : एकूण धावणाऱ्या रेल्वे

कोल्हापूर रेल्वेस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. डेमू गाड्यांची संख्या वाढवणे, सांगली, पुणे शटल सर्व्हिस सुरू करणे, कोल्हापूर ते वैभववाडी, मुंबईसाठी नवीन गाडी सुरू करणे, फेऱ्या वाढवणे, वंदे भारत या गाड्या होणे अपेक्षित आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

दुसरे रेल्वे टर्मिनल केल्यास नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होतील, कोल्हापूर-मिरज दुसरी रेल्वे लाइन टाकणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा पाठपुरावा करणे, कऱ्हाड-बेळगाव नवीन रेल्वे मार्ग कोल्हापूरला महामार्गाशी समांतर करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या; पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. ते मार्गी लागल्यास जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी येतील. - मधुसूदन पावसकर, अध्यक्ष, युनिटी करवीर विकास संघ मंच, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे