शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

By संदीप आडनाईक | Updated: April 25, 2024 13:43 IST

संदीप आडनाईक कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वे कोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर ...

संदीप आडनाईककोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वेकोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर असूनही सुविधांबाबत कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. १३२ वर्षे झाल्यानंतरही कोल्हापूरच्या संथ रेल्वेला पुरेशी ‘गती’ मिळालेली नाही. कोकण रेल्वे, लांब पल्ल्याच्या रेल्वे, वंदे भारतसारखे नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याबाबत अजूनही कोल्हापूरला ठेंगा दाखवला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची ‘शक्ती’ मिळण्याची गरज आहे.

गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी लोकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्या आता थोड्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. कोल्हापूर ते मुंबई आणि पुढे अन्यत्र वेगाने जाण्यासाठी कोल्हापूर ते पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण अत्यावश्यक होते. मात्र कोल्हापूर, मिरज ही स्थानके दक्षिण रेल्वे विभागामध्ये मोडत असल्याने कोल्हापूरचा कधी विचारच झाला नाही. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी १० तासांचा मोठा कालावधी लागत होता.आता दुहेरीकरण-विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण हाेत आहे. त्यामुळे नवीन रेल्वेगाड्यांचा मार्ग मोकळा होईल. मिरज-कुर्डूवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. दिल्ली, धनबाद, अहमदाबादसाठी रोज रेल्वेची मागणी असूनही ती आठवड्यातून एकदा सोडली जाते. यामुळे व्यापार, उद्योगाला मर्यादा आहेत.

कोकण रेल्वे कोल्हापूरला कधी जोडणारकोकणाला कोल्हापूर जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची तरतूद केली. पण ५० वर्षे होऊन गेली; परंतु ही मागणी अद्यापही सर्वेक्षणाच्याच पातळीवर आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी जोडल्या जाऊन उद्योग, व्यापाराला चालना मिळणार आहे. ही जमेची एक बाजू सोडल्यास अन्य सुविधांबाबत ठेंगाच दाखविला असेच म्हणावे लागेल.

मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतचतत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांची कोल्हापूर मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतच विरली. त्याचा पाठपुरावा कोणत्याच लोकप्रतिनिधींनी केला नाही. सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने उशिरा का होईना अमृतभारत योजनेतून पुनर्विकासाचे काम सुरू आहे; पण त्याला गती नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

  • १८९१ : मिरज ते कोल्हापूर पहिली रेल्वे सुरू
  • ४८ किलोमीटरचा पहिला ट्रॅक शाहू महाराजांच्या वैयक्तिक निधीतून
  • १९७१ : मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन
  • २०२० : कोल्हापर-मिरज एकेरी विद्युतीकरण मार्ग

 

  • ४ एकूण प्लॅटफाॅर्म
  • ११ एक्स्प्रेस
  • ४ डेमू गाड्या
  • २ सुपरफास्ट
  • १७ : एकूण धावणाऱ्या रेल्वे

कोल्हापूर रेल्वेस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. डेमू गाड्यांची संख्या वाढवणे, सांगली, पुणे शटल सर्व्हिस सुरू करणे, कोल्हापूर ते वैभववाडी, मुंबईसाठी नवीन गाडी सुरू करणे, फेऱ्या वाढवणे, वंदे भारत या गाड्या होणे अपेक्षित आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती 

दुसरे रेल्वे टर्मिनल केल्यास नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होतील, कोल्हापूर-मिरज दुसरी रेल्वे लाइन टाकणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा पाठपुरावा करणे, कऱ्हाड-बेळगाव नवीन रेल्वे मार्ग कोल्हापूरला महामार्गाशी समांतर करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या; पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. ते मार्गी लागल्यास जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी येतील. - मधुसूदन पावसकर, अध्यक्ष, युनिटी करवीर विकास संघ मंच, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे