शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एकीकरण समितीची 'चलो मुंबई'ची हाक!, शरद पवारांशी चर्चा करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 12:33 IST

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बेळगावात झाली बैठक

बेळगाव : सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यावर असलेल्या सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जाग आणून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली ''चलो मुंबई''ची हाक देण्यात आली आहे. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी हजारो सीमावासीय मुंबईला धडकणार आहेत. येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. बेळगाव येथे गुरुवारी झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बेळगावमध्ये आयोजिण्यात आलेला महामेळावा दडपण्यासाठी समिती नेत्यांना अटक करण्यात आली. यानंतर महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समितीने ‘चलो कोल्हापूर’ची हाक देत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन छेडले. सीमाप्रश्न सध्या अंतिम टप्प्यात आला असून महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या तारखा लांबणीवर पडत आहेत.कर्नाटक सरकारकडून खटल्यासाठी दरमहा ६० लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, सीमाप्रश्नी खटला चालविण्यासाठी वकिलांना फी देण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे. ही परिस्थिती अशी असेल तर सीमाप्रश्नी खटला कुणाच्या आशेवर लढवायचा? असा प्रश्नही या बैठकीत उपस्थित करण्यात आला. यामुळे महाराष्ट्राला जाग आणून देण्यासाठी २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे.बैठकीत शहर समितीचे दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, रणजित चव्हाण पाटील, बी. डी. मोहनगकर आदींसह इतर समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकSharad Pawarशरद पवार