शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्च घाईघाईने.. बिले मात्र जमा होतात दमादमाने; शासकीय खर्च कळेना

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: August 6, 2024 14:17 IST

उमेदवारांना तेवढे निकष

इंदुमती गणेशकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर महिन्याभरात उमेदवारांना खर्चाची बिले सादर करण्याचा नियम लावणाऱ्या शासनाला निवडणुकीवर शासनाकडून झालेल्या खर्चाची मात्र अजिबात घाई झालेली नाही. निवडणुकीला तीन महिने झाले तरी विधानसभानिहाय शासकीय विभागांनी झालेल्या खर्चाची बिले जिल्हा निवडणूक विभागाला सादर केलेली नाहीत. त्यामुळे शासनाची नेमकी किती रक्कम खर्ची पडली याचा ताळमेळच अजून लागलेला नाही. सध्या विभागाला खर्चासाठी २० कोटी रुपये मिळाले आहेत, तर निवडणूक आयोगाने झालेल्या खर्चाचा सुधारीत प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास सांगितले आहे.जिल्ह्यात लोकसभेसाठी ७ मे रोजी मोठ्या चुरशीने मतदान झाले. त्यानंतर एक महिन्याने म्हणजे ४ जूनला मतमोजणी झाली. निवडणूक म्हटली की, उमेदवारांकडून खर्च होणे साहजिकच आहे. उमेदवारांना ९५ लाख रुपये खर्च करता येतात. पण जिल्ह्यात निवडणुकीची यंत्रणा राबविण्यासाठी निवडणूक विभागाला असे निकष नसतात. विभागाने निवडणुकीआधीच अंदाजित अपेक्षित रक्कम शासनाला कळवायची असते. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने मार्च महिन्यातच शासनाला ४५ कोटी ८० लाख ही रक्कम कळवून त्यासाठी तरतूद करून घेतली.मतदानाला तीन महिने आणि मतमोजणीला दाेन महिने झाले तरी विविध शासकीय कार्यालयांकडून जिल्हा निवडणूक विभागाला खर्चाची बिले सादर झालेली नाहीत. दुसरीकडे निवडणूक आयोगाने झालेल्या एकूण खर्चाचा सुधारीत खर्चाचा अहवाल तत्काळ पाठविण्यास सांगितले आहे.

अजून तपासणीच सुरूयाबाबत विचारणा केली असता, सहायक निवडणूक अधिकाऱ्यांच्या पातळीवर अजून बिलांची तपासणी सुरू असल्याचे समजले. निवडणूक विभागाने यावर शुक्रवारी बैठक घेऊन सर्व विधानसभानिहाय सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना लवकरात लवकर खर्च सादर करण्यास सांगितले. त्यांच्याकडून बिले तपासून आल्यानंतर मुख्य कार्यालयाकडून बिले अदा केली जातात.

उमेदवारांना तेवढी महिन्याची मुदतउमेदवारांनी निवडणुकीवर केलेला खर्च मतमोजणीनंतर एक महिन्याच्या आत विभागाला सादर करायचा असताे. रोजच्या रोज खर्चाची बिले सादर करावी लागतात. शिवाय निवडणूक सुरू असतानाच्या काळात तीन ते चार वेळा निवडणूक खर्च अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाते. उमेदवाराने जास्त रक्कम खर्च केली किंवा वेळेत खर्च सादर केला नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची तरतूद आहे.

कर्मचारी भत्त्यावर १३ कोटीनिवडणूक कामावरील नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भत्त्याची रक्कम अदा करण्याची अधिसूचना ३ तारखेला निघाली आहे. जिल्ह्यासाठी भत्त्याची रक्कम १३ कोटी ११ लाख इतकी होते, मात्र तेवढा निधी नसल्याने आता सर्वांना ठरलेल्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक 2024