शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकार्य बाराव्याऐवजी सातव्या दिवशी पोर्ले तर्फ ठाणे गावचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:00 IST

पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील इतर गावांसमोर आदर्श, भेटवस्तू देण्याची प्रथाही बंद

पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रक्षाविसर्जन तिसºया दिवशी, तर बाराव्या दिवशी केला जाणारा दुखवटा सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गावात राबविला जातआहे.माणसांच्या मरणोत्तर रक्षाविसर्जन, खवर करणे, दशविधी, आदी प्रक्रिया विधिवत पार पाडण्यासाठी एक चौकट ठरलेली असायची. या प्रक्रियेत अमावास्या, पौर्णिमेशिवाय आणखी अडथळा निर्माण करणार दिवस आला तर या विधी मागेपुढे घेताना दुखवट्याच्या कुटुंबात मॅरेथॉन चर्चा रंगायची. त्यानंतर मरणोत्तर प्रक्रिया पूर्ण व्हायची; परंतु यातील काही प्रथांमध्ये समाजमान्यतेनुसार बदल घडवून त्याला समाज प्रबोधनाची जोड मिळाल्याने जे काही निर्णय झाले त्याला विरोध झाला नाही, हेच या संघटित भूमिकेचे यश आहे. पाणी प्रदूषणाबाबतची जनजागृती म्हणून रक्षाविसर्जन नदीच्या पाण्यात करण्याऐवजी मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात सोडायची आणि उर्वरित रक्षा शेतात विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रक्षाविसर्जनादिवशी अशुभ दिवस आला तर शुभ दिवस ठरवून रक्षाविसर्जन केले जायचे. गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन, मरणोत्तर येणाºया तिसºया दिवशी कोणताही मानला जाणारा अशुभ दिवस आला तरी रक्षाविसर्जन तिसºयादिवशीच करण्याचा ठामनिर्णय घेण्यात आला.पूर्वी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे उत्तरकार्य बाराव्या दिवशी केले जात होते; परंतु आधुनिक युगात दळणवळणाच्या व संपर्क माध्यमांच्या सोयी जलद उपल्बध होत असल्याने नातेवाइकांपर्यंत माहिती पोहोचविणे सोपे झाले आहे.त्यामुळेच बाराव्या दिवशी होणारे उत्तरकार्य पोर्लेत सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गेल्या काही महिन्यांपासून राबवून इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे.रक्षादानचा उपक्रममरणोत्तर मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात व उर्वरित रक्षा शेतात मिसळली जाते; पण ज्यांचे स्वत:च्या मालकीचे शेत नाही, त्यांनी आपली रक्षा झाडे लावण्यासाठी देऊन ‘त्या’ व्यक्तीच्या स्मृती झाडाच्या रूपाने जागविल्या जातील. ते झाड जगविण्याची हमी देणारे जनजागृती डिजिटल फलक पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील स्माशानशेडमध्ये लावण्याचा उपक्रम निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी राबविला आहे.पोर्ले गावात मरणोत्तर प्रक्रियेत मरण पावलेल्या व्यक्तीची स्मृती जागविण्यासाठी भेटवस्तू वाटप करण्याची प्रथा होती. अर्थिकदृष्ट्या न परवडणाºया प्रथाही बंद करून सामान्य व गरीब कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी