शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

उत्तरकार्य बाराव्याऐवजी सातव्या दिवशी पोर्ले तर्फ ठाणे गावचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:00 IST

पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील इतर गावांसमोर आदर्श, भेटवस्तू देण्याची प्रथाही बंद

पोर्ले तर्फ ठाणे : माणसांच्या मरणोत्तर होणाऱ्या विधीला समाज प्रबोधनाची जोड मिळत असल्याने या प्रक्रियेतील प्रथांना फाटा मिळत आहे. त्यापैकी मूठभर रक्षा नदीत, दशविधीवेळी भांडी वाटपाची परंपरा सर्वत्र बंद केली आहे. पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रक्षाविसर्जन तिसºया दिवशी, तर बाराव्या दिवशी केला जाणारा दुखवटा सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गावात राबविला जातआहे.माणसांच्या मरणोत्तर रक्षाविसर्जन, खवर करणे, दशविधी, आदी प्रक्रिया विधिवत पार पाडण्यासाठी एक चौकट ठरलेली असायची. या प्रक्रियेत अमावास्या, पौर्णिमेशिवाय आणखी अडथळा निर्माण करणार दिवस आला तर या विधी मागेपुढे घेताना दुखवट्याच्या कुटुंबात मॅरेथॉन चर्चा रंगायची. त्यानंतर मरणोत्तर प्रक्रिया पूर्ण व्हायची; परंतु यातील काही प्रथांमध्ये समाजमान्यतेनुसार बदल घडवून त्याला समाज प्रबोधनाची जोड मिळाल्याने जे काही निर्णय झाले त्याला विरोध झाला नाही, हेच या संघटित भूमिकेचे यश आहे. पाणी प्रदूषणाबाबतची जनजागृती म्हणून रक्षाविसर्जन नदीच्या पाण्यात करण्याऐवजी मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात सोडायची आणि उर्वरित रक्षा शेतात विसर्जित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रक्षाविसर्जनादिवशी अशुभ दिवस आला तर शुभ दिवस ठरवून रक्षाविसर्जन केले जायचे. गावातील ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन, मरणोत्तर येणाºया तिसºया दिवशी कोणताही मानला जाणारा अशुभ दिवस आला तरी रक्षाविसर्जन तिसºयादिवशीच करण्याचा ठामनिर्णय घेण्यात आला.पूर्वी दळणवळणाच्या सोयी नसल्यामुळे उत्तरकार्य बाराव्या दिवशी केले जात होते; परंतु आधुनिक युगात दळणवळणाच्या व संपर्क माध्यमांच्या सोयी जलद उपल्बध होत असल्याने नातेवाइकांपर्यंत माहिती पोहोचविणे सोपे झाले आहे.त्यामुळेच बाराव्या दिवशी होणारे उत्तरकार्य पोर्लेत सातव्या दिवशी घेण्याचा पायंडा गेल्या काही महिन्यांपासून राबवून इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे.रक्षादानचा उपक्रममरणोत्तर मूठभर रक्षा नदीच्या पाण्यात व उर्वरित रक्षा शेतात मिसळली जाते; पण ज्यांचे स्वत:च्या मालकीचे शेत नाही, त्यांनी आपली रक्षा झाडे लावण्यासाठी देऊन ‘त्या’ व्यक्तीच्या स्मृती झाडाच्या रूपाने जागविल्या जातील. ते झाड जगविण्याची हमी देणारे जनजागृती डिजिटल फलक पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील स्माशानशेडमध्ये लावण्याचा उपक्रम निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी राबविला आहे.पोर्ले गावात मरणोत्तर प्रक्रियेत मरण पावलेल्या व्यक्तीची स्मृती जागविण्यासाठी भेटवस्तू वाटप करण्याची प्रथा होती. अर्थिकदृष्ट्या न परवडणाºया प्रथाही बंद करून सामान्य व गरीब कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदी