शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ठाकरेंवरील टीका सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:55 IST

कोल्हापूर : दोनवेळा विधानसभेला पराभूत झालेल्या नारायण राणे यांना त्यांच्या राज्यात जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे. मात्र, यापुढे ठाकरेंवरील टीका शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला.शुक्रवारी कोल्हापूर च्या सभेत ...

कोल्हापूर : दोनवेळा विधानसभेला पराभूत झालेल्या नारायण राणे यांना त्यांच्या राज्यात जनाधार राहिलेला नाही. त्यामुळेच केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीच राणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाचे काम करावे. मात्र, यापुढे ठाकरेंवरील टीका शिवसेना सहन करणार नाही, असा इशारा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिला.शुक्रवारी कोल्हापूरच्या सभेत राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुधवडकर यांनीरविवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार वैभव नाईक, दुर्गेश लिंग्रस उपस्थित होते.दुधवडकर म्हणाले, राणे यांनी तिच-तिच कॅसेट वाजविण्यापेक्षा त्यांचे चरित्रच लिहून लोकांना वाटावे. १२ वर्षांपूर्वी त्यांचा आमचा संबंध संपला आहे. ‘मातोश्री’वरील टीका यापुढे शिवसैनिक सहन करणार नाहीत. तुम्ही नवा पक्ष काढला आहे. तुमच्या पक्षाची चांगली बांधणी करा, त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र, शिवसेना आणि ठाकरेंवर तोंडसुख घेण्याचे कारण नाही.सर्व प्रचार मोहिमा कोकणातून सुरू करणाºया राणेंना कोल्हापुरात येण्याची गरज का पडावी, असा सवाल उपस्थित करून त्यांनी विनय कोरे, महादेव जानकर यांच्या पक्षाची काय अवस्था आहे ती पाहावी, असा सल्लाही यावेळी दिला.काँग्रेसमध्ये असताना सोनियांचे पाय यांना सोन्याचे दिसले. आता यांना मुख्यमंत्री आदरणीय वाटायला लागलेत. आम्ही त्यांना विरोध केला नाही. त्यांना मंत्री करणार की संत्री हे त्यांनीच त्यांना ज्यांनी ‘शब्द’ दिलाय त्यांना विचारावं, असा टोलाही दुधवडकर यांनी यावेळी राणे यांना लगावला.सभेला सुरेश साळोखेसुद्धा नव्हतेकोल्हापूरच्या सभेला कोल्हापूरचे कोण होते, असा प्रश्न उपस्थित करून त्यांचे जुने सहकारी सुरेश साळोखे हे देखील या सभेला नव्हते. ती कोल्हापूरचे करमणूक करणारी सभा होती. कोल्हापूरच्या सहा आमदारांचे काय ते आम्ही बघू. चंद्रकांतदादा पाटील यांनीही काही प्रयत्न केले; परंतु पुढच्या वेळी आणखी दोन आमदार वाढवून आणू, असे दुधवडकर म्हणाले.सिंधुदुर्गात संपलेले, कोल्हापुरात शिवसेना आमदारांना काय संपविणार?जे स्वत: सिंधुदुर्गात संपले आहेत, ते कोल्हापुरातील शिवसेनेच्या आमदारांना काय संपविणार, असा सवाल यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय राक्षसी महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या राणे यांची आमचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यांची लायकी तरी काय आहे, अशा शब्दांत क्षीरसागर यांनी राणेंवर टीका केली. विधानसभेच्या आधी होणाºया लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचा खासदार येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले.भाजपचे बांडगूळराणे यांचा पक्ष म्हणजे भाजपचे बांडगूळ असल्याची टीका यावेळी आमदार वैभव नाईक यांनी केली. त्यांना शिवसेनेने घेतले नाही, काँग्रेसवाले कं टाळले, म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी पक्ष काढलाय. यांना आमदार करायचे, मंत्री करायचे हे उद्धव ठाकरेच ठरवणार. कारण त्यांना ‘शब्द’ देणारे उद्धव ठाकरे यांचा सल्ला घेतात. यांना यांच्या मुलाची काळजी आहे. मात्र, यांच्यासोबत शिवसेना सोडणाºयांची तेवढी काळजी केली का, असा सवाल नाईक यांनी केला. हे आणि यांची दोन मुलं यांचा हा पक्ष म्हणजे खºया अर्थानं प्रा. लि. कंपनी आहे.ठाकरे विधान भवनात पाठवितातउद्धव यांनी विधान भवन कधी पाहिले का, असे नारायण विचारतात; पण ठाकरे विधान भवनात जात नाहीत तर तेथे शिवसैनिकांना पाठवितात. ही लिमिटेड कंपनी नसल्यानेच मिल कामगाराचा मुलगा ‘बेस्ट’ अध्यक्ष झाला. वैभव नाईक, राजेश क्षीरसागर आमदार झाले असे दुधवडकर म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर